शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

ममुराबादला गटारीतील गाळ काढण्याचे काम पुन्हा थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद : गावातील तुंबलेल्या गटारी आणि त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष या विषयी वृत्त 'लोकमत'मध्ये प्रसिद्ध ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ममुराबाद : गावातील तुंबलेल्या गटारी आणि त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष या विषयी वृत्त 'लोकमत'मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर ग्रामपंचायतीने लगेच गाळ काढण्यास सुरूवात केली होती. मात्र, काही दिवसानंतर लगेच हे काम पुन्हा थांबल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नियमितपणे सफाई होत नसल्याने गावातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या लहान व मोठ्या गटारी काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात तुंबल्या आहेत. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याने गटारींची संपूर्ण स्वच्छता करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यासंदर्भात सचित्र वृत्त 'लोकमत'मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर ग्रामपंचायतीने गटारींमधील गाळ काढण्याचे काम हाती घेतले होते.

गावातील सर्व गटारींची संपूर्ण सफाई खाजगी ठेका देऊन केली जाणार असल्याची माहिती ग्रामसेवक आर. आर. मनोरे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली होती. त्यासंदर्भात ग्रामपंचायतीच्या मासिक सभेतही विषय घेण्यात आला होता. प्रत्यक्षात ग्रामपंचायतीने कोणताही ठेका अद्याप दिलेला नाही. उलट जेवढे काही रोजंदारी मजूर गटारीतील गाळ काढण्यासाठी कार्यरत होते त्यांचे काम थांबविण्यात आले. गटारींची समस्या कायम असून डासांचे प्रमाण वाढून आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.

-----------

फोटो-

ममुराबाद येथे शिंदेवाड्याच्या परिसरात सफाईअभावी गटारी अशा तुंबल्या आहेत. (जितेंद्र पाटील)