शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

ममुराबादला वित्त आयोगाची कामे ठप्पच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद : ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगाच्या अखर्चित निधीतून निवडणुकीपूर्वी सुरू केलेली विकासकामे गेल्या काही दिवसांपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ममुराबाद : ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगाच्या अखर्चित निधीतून निवडणुकीपूर्वी सुरू केलेली विकासकामे गेल्या काही दिवसांपासून बंद पडली आहेत. रस्त्यासाठी वापरण्यात येणारी खडी, तसेच वाळू विखुरल्याने ग्रामस्थांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, वित्त आयोगाचे काम का बंद पडले त्याबद्दल आता उलटसुलट चर्चा सुरू आहे.

१४ व्या वित्त आयोगाचा अखर्चित निधी तत्कालीन पदाधिकाऱ्यांमधील बेबनावामुळे मुदतीत खर्च होऊ शकला नव्हता. मात्र, ग्रामपंचायतीची मुदत संपल्यानंतरच्या १५ दिवसांच्या काळात रखडलेल्या विकासकामांची पूर्तता करण्यासाठी काही जणांकडून युद्धपातळीवर प्रयत्न झाले. त्यासाठी आवश्यक मानली जाणारी ई-टेंडरिंगची सर्व प्रक्रियासुद्धा पार पाडण्यात आली. ग्रामपंचायत प्रशासनाकडून संबंधितांना रीतसर कार्यादेशही देण्यात आले. त्यानंतर बसस्थानक परिसरात व अन्य एका ठिकाणी रस्त्याचे काँक्रिटीकरणसुद्धा हाती घेण्यात आले. त्यासाठी लागणारी खडी, वाळू व सिमेंट मागवून ठेवले गेले. बसस्थानक परिसरातील रामगंगा नगराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरणही सुरू करण्यात आले होते. मात्र, त्यादरम्यान ग्रामपंचायतीची निवडणूक घोषित झाली आणि सुरू असलेल्या कामांना अचानक ब्रेक लागला.

सध्या रस्त्यालगत पडलेले खडी व वाळूचे ढीग ठिकठिकाणी अडचणीचे ठरू लागले आहेत. काही ठिकाणी अर्धवट कामामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. त्याबद्दल नाराजीसुद्धा व्यक्त होत आहे.

--------------------

फोटो-

ममुराबाद येथे बसस्थानकालगत अपूर्णावस्थेतील रस्त्याची खडी अशी उखडली आहे. त्यामुळे त्या भागातील ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. (छाया : जितेंद्र पाटील)