मनपा : आयुक्त पठाण यांची माहिती
धुळे : पावसाळ्य़ात कोणतेही डांबरीकरणाचे काम करता येत नाही, पंरतु शहरातील काही रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यावर लगेच सायंकाळी पाऊस पडल्याने कामाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या कामांची बिले काढण्यात येणार नसल्याची माहिती आयुक्त दौलतखाँ पठाण यांनी पत्रकारांना दिली. मनपातर्फे रस्त्यांच्या कामांच्या निविदा काढण्यात आल्याआहेत. परंतु या रस्त्यांची कामे पावसाळ्य़ापूर्वीच म्हणजे ७ जूनच्या आधीच होणे अपेक्षित होते. परंतु ठेकेदार पावसाळा सुरू होऊनही कामे करीत असल्याचे निदर्शनास आलेआहे. विशेष म्हणजे मनपाच्या मागील राजवाडे बँकेजवळी रस्त्याचे काम करण्यात आल्यानंतर लगेच पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे या रस्त्यावरील कामाचा काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे अशा कामांची बिले न काढण्याचा निर्णय आयुक्त पठाण यांनी घेतला असून संबंधितांना तसा आदेश ही देण्यात येणार आहेत.