शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

महिलांची दारूबंदी, तर पुरुषांची वाळूबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमळनेर : तालुक्यातील मांडळ येथे तब्बल दीड वर्षाच्या खंडानंतर झालेल्या महिलांच्या ग्रामसभेत दारूबंदी, तर सर्वसाधारण ग्रामसभेत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : तालुक्यातील मांडळ येथे तब्बल दीड वर्षाच्या खंडानंतर झालेल्या महिलांच्या ग्रामसभेत दारूबंदी, तर सर्वसाधारण ग्रामसभेत वाळूबंदी करण्यात आली.

कोरोनामुळे ग्रामीण भागात ग्रामसभा घेण्यासदेखील बंदी होती. ग्रामस्थांना तक्रारीदेखील करता येत नव्हत्या, तसेच उपोषण, आंदोलनेही करता येत नव्हती. त्यामुळे अवैध दारू विक्री, अवैध वाळू विक्री फोफावली होती. कोरोनाचे नियम शिथिल होताच दीड वर्षानंतर ग्रामसभा घेण्यास परवानगी मिळताच मांडळ येथे आधी महिलांची ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेस सरपंच विद्याबाई पाटील, उपसरपंच हंसराज भील, सदस्य सुदर्शन पवार, विजय कोळी, दीपक पाटील, मंगलदास कांबळे, कल्पनाबाई पाटील, कुसुमबाई पाटील, मीनल कोळी, कविता बडगुजर, सुरेखा पाटील, वेणूबाई भील, सुमनबाई पारधी, ग्रामसेवक ज्ञानेश्वर पाटील, लिपिक अशोक कोळी हजर होते.

यावेळी संगीताबाई कोळी, सुरेखा कोळी, रत्नाबाई कोळी, भुराबाई कोळी, सुनंदाबाई पारधी या महिलांनी गावात दारूबंदी झालीच पाहिजे, अशी मागणी केली. दारूबंदी विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही बेकायदेशीर दारू विक्रीला आळा घातला जात नाही, नवरा दारू पिऊन आल्यावर भांडणे होतात, कोणाचा नवरा दारूत मेला, तर कोणाचा मुलगा दारू पितो, तरुण पिढी बिघडत चालली आहे, दारूमुळे गावात भांडणे होतात आदी मुद्दे उपस्थित करून दारूबंदीचा ठराव करण्यास भाग पाडले.

सर्वसाधारण सभेत महसूल विभागाने काढलेला वाळू लिलाव गट रद्द करून गावातून वाळू बंदी करावी, अशी मागणी पुरुषांनी लावून धरली. काही दिवसांपूर्वी वाळूमुळे दंगल घडली होती. त्यामुळे वाळूबंदीचा ठरावही मंजूर करण्यात आला, तसेच गेल्या अनेक दिवसांपासून घरकुल मिळत नसल्याची तक्रारदेखील ग्रामसभेत करण्यात आली.

ग्रामसभेत झालेले ठराव विविध विभागांना पाठवण्यात येतील, अशी माहिती ग्रामसेवक ज्ञानेश्वर पाटील यांनी दिली.

ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. अशोक पाटील होते. यावेळी नारायण कोळी, किरण जैन, बाळासाहेब पवार, विजय पाटील, सुरेश कोळी, राजू धनगर, रमेश पाटील, संतोष कोळी, संतोष पाटील, रोहित पाटील, सुरेश कांबळे हजर होते.