शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
4
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
5
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
6
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
7
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
8
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
11
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
12
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
13
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
14
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
15
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
16
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
17
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
18
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
19
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
20
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!

न्यूनगंड बाजूला ठेवून महिलांनी प्रशासनात यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 11:59 IST

-निता कायटे

महिला पोलीस अधिकारी म्हणून काम करीत असताना अन्यायग्रस्त व पीडित महिला निकोचपणे म्हणणे मांडतात..त्यामुळे त्यांच्या मनाची अवस्था व बेतलेल्या प्रसंगाची जाणीव होते आणि त्यातूनच अशा महिलांना न्याय देता येते...महिला अधिकारी म्हणून यापेक्षा कोणता मोठा आनंद असू शकत नाही..असे स्पष्ट मत सहायक पोलीस निरीक्षक निता कायटे यांनी ‘लोकमत’ जवळ व्यक्त केले.निता कायटे या मुळच्या सिल्लोड, जि.औरंगाबाद येथील रहिवाशी आहेत. औरंगाबाद विद्यापीठातून त्यांनी एम.एससी आॅरगेनिक केमिस्ट्रीची पदवी घेतली. त्यानंतर महाराष्टÑ लोकसेवा आयोगाची परिक्षा दिली. २०१० मध्ये उपनिरीक्षक म्हणून त्यांची पोलीस दलात निवड झाली. जळगाव व भुसावळ बाजार पेठ पोलीस स्टेशनला काम केल्यानंतर पदोन्नतीने त्यांची जळगावला बदली झाली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पोलीस निरीक्षक म्हणून पाच वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर आता सध्या स्थानिक गुन्हे शाखेत सहायक निरीक्षक व महिला सहाय्य कक्षाच्या प्रमुख म्हणून त्या जबाबदारी पार पाडत आहेत. सिल्लोड येथे घरी असताना शेजारीच प्रांताधिकारी वर्षा ठाकूर या वास्तव्याला होत्या. त्यांना दररोज घरी घ्यायला व सोडायला लाल दिव्याचे सरकारी वाहन येत होते. एक महिला असूनही त्यांचा रुबाब किती होता..हे मी पाहिल..त्यामुळे आपणही मेहनत घेतली तर असे लाल दिव्याचे वाहन मिळू शकते असा निश्चिय केला आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन महाराष्टÑ लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली व त्यात उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. लाल दिव्याचे वाहन मिळाल्याचे स्वप्न पूर्ण झाले, मात्र ते वाहन घरी घेऊन जाता येते. मुळ रहिवाशी असलेल्या गावी नियुक्ती मिळत नाही.सण,उत्सव नशिबात नाहीपोलीस खात्यात असल्याने सण, उत्सव हे कधीच कुटुंबासोबत साजरा करता आले नाहीत. दोन दिवसापूर्वी पतीचा वाढदिवस होता. रात्री साजरा करण्याचे नियोजन केले.मात्र अचानक आॅपरेशन आॅल आऊटचा वायरलेस संदेश आला आणि सर्व कामे सोडून ड्युटीवर जावे लागले..महिला पोलीस अधिकारी म्हणून काम करताना वरिष्ठ किंवा सहकारी यांच्याकडून कधीही त्रास झाला नाही..उलट मदतच मिळाली. आपण महिला असल्याने तक्रारदार महिला आवर्जून जवळ येवून त्यांच्या व्यथा मनमोकळ्यापणाने मांडतात..त्या पुरुष अधिकारी व कर्मचाऱ्यांजवळ मांडता येत नाही. त्यामुळे भावी पीढीतील तरुणींनी पोलीस दलात निंकोचपणे यावे...कोणताही न्यूनगंड ठेवू नये..पोलीस म्हणून आपण एखाद्याला कायद्याची जाणीव करुन देतो..तेव्हा लोक विश्वास ठेवतात..महिलांना न्याय देण्याची व त्यांचे मनोबल उंचावण्याची एक ताकद निर्माण होते.-निता कायटे,सहा. पोलीस निरीक्षक