शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

महिलांनो आत्मशक्ती जागृत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2016 04:52 IST

महिला ही शक्ती आहे. मात्र आता ती कमकुवत होताना दिसत आहे. ग्रामीण भागातील जनता आजही उपाशी आहे.

जळगाव : महिला ही शक्ती आहे. मात्र आता ती कमकुवत होताना दिसत आहे. ग्रामीण भागातील जनता आजही उपाशी आहे. महिलांनी आपल्यातील आत्मशक्ती जागृत करून स्वत:ला सिद्ध करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भूदान चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या कृष्णमल जगन्नाथन यांनी महिला परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी केले. जळगाव येथील जैनहिल्सवरील गांधीतीर्थ येथे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय महिला परिषदेला रविवारी सकाळी प्रारंभ झाला. गांधी रिसर्च फांउडेशनचे अध्यक्ष व माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या झिल कार हरिस, पी. व्ही.राजगोपाल, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, सेवादास दलुभाऊ जैन, अनूभुती स्कूलच्या निशा जैन, मार्गारेट ट्युबलेट (स्वित्झर्लंड), आयडा गामुया (कोलंबो), सॅरिना (अमेरिका), आयरिल साडिईगो, सुमैय्या यांच्यासह देशविदेशातील सुमारे दोन हजार महिला परिषदेत सहभागी झाल्या आहेत.गांधी रिसर्च फाउंडेशन, इंटरनॅशनल गांधीयन इन्स्टिट्यूट फॉर नॉन वायसन्स अ‍ॅण्ड पीस, एकता फाउंडेशन, भोपाळ यांनी या परिषदेचे आयोजन केले आहे. कृष्णमल जगन्नाथन म्हणाल्या, नारी शक्ती काय आहे. हे पश्चिम बंगामध्ये ममता बॅनर्जी यांनी दाखवून दिले. टाटा समुहाने नॅनो कारसाठी प्रकल्पाची उभारणी केली होती. मात्र आपल्या जमिनीच्या रक्षणासाठी तेथील महिलांनी सलग २६ दिवस आंदोलन सुरु ठेवत आपली जमीन मिळविली. या जगात अशक्य काहीच नाही. फक्त महिलांनी आपली आत्मशक्ती जागृती करावी. प्रारंभी देशविदेशातील महिलांनी सोबत आणलेली माती व्यासपीठावरील भांड्यात टाकून ‘जल, जंगल व जमिनी’ वाचविण्याचा संकल्प करण्यात आला. ही सर्व माती कृष्णमल जगन्नाथन यांच्याकडे सोपविण्यात आली. (प्रतिनिधी) ५० महिलांचा सन्मानमहिलांच्या हक्कसाठी काम करणाऱ्या देशभरातील ५० महिलांचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व शाल देऊन सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन रितूपर्णा मोहंती यांनी तर आभार लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी मानले. अमेरिका, कॅनडा, कोलंबिया, इटली, केनिया, ब्राझिल, फिलीपीन्स, स्वीडन, दक्षिण आफ्रिका, नेपाळ, बांग्लादेश, कंबोडिया, जर्मनीसह, देशातील विविध राज्यांतून दीड ते दोन हजार महिला सहभागी झाल्या आहेत.जळगाव येथील जैन हिल्स येथे रविवारी आंतरराष्ट्रीय महिला परिषदेस प्रारंभ झाला. यावेळी देश-विदेशातून आलेल्या महिलांनी आपल्या देशातील माती एका भांड्यात टाकून जल व जमीन वाचविण्याचा संकल्प केला.