शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

महिलांनो आत्मशक्ती जागृत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2016 04:52 IST

महिला ही शक्ती आहे. मात्र आता ती कमकुवत होताना दिसत आहे. ग्रामीण भागातील जनता आजही उपाशी आहे.

जळगाव : महिला ही शक्ती आहे. मात्र आता ती कमकुवत होताना दिसत आहे. ग्रामीण भागातील जनता आजही उपाशी आहे. महिलांनी आपल्यातील आत्मशक्ती जागृत करून स्वत:ला सिद्ध करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भूदान चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या कृष्णमल जगन्नाथन यांनी महिला परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी केले. जळगाव येथील जैनहिल्सवरील गांधीतीर्थ येथे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय महिला परिषदेला रविवारी सकाळी प्रारंभ झाला. गांधी रिसर्च फांउडेशनचे अध्यक्ष व माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या झिल कार हरिस, पी. व्ही.राजगोपाल, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, सेवादास दलुभाऊ जैन, अनूभुती स्कूलच्या निशा जैन, मार्गारेट ट्युबलेट (स्वित्झर्लंड), आयडा गामुया (कोलंबो), सॅरिना (अमेरिका), आयरिल साडिईगो, सुमैय्या यांच्यासह देशविदेशातील सुमारे दोन हजार महिला परिषदेत सहभागी झाल्या आहेत.गांधी रिसर्च फाउंडेशन, इंटरनॅशनल गांधीयन इन्स्टिट्यूट फॉर नॉन वायसन्स अ‍ॅण्ड पीस, एकता फाउंडेशन, भोपाळ यांनी या परिषदेचे आयोजन केले आहे. कृष्णमल जगन्नाथन म्हणाल्या, नारी शक्ती काय आहे. हे पश्चिम बंगामध्ये ममता बॅनर्जी यांनी दाखवून दिले. टाटा समुहाने नॅनो कारसाठी प्रकल्पाची उभारणी केली होती. मात्र आपल्या जमिनीच्या रक्षणासाठी तेथील महिलांनी सलग २६ दिवस आंदोलन सुरु ठेवत आपली जमीन मिळविली. या जगात अशक्य काहीच नाही. फक्त महिलांनी आपली आत्मशक्ती जागृती करावी. प्रारंभी देशविदेशातील महिलांनी सोबत आणलेली माती व्यासपीठावरील भांड्यात टाकून ‘जल, जंगल व जमिनी’ वाचविण्याचा संकल्प करण्यात आला. ही सर्व माती कृष्णमल जगन्नाथन यांच्याकडे सोपविण्यात आली. (प्रतिनिधी) ५० महिलांचा सन्मानमहिलांच्या हक्कसाठी काम करणाऱ्या देशभरातील ५० महिलांचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व शाल देऊन सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन रितूपर्णा मोहंती यांनी तर आभार लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी मानले. अमेरिका, कॅनडा, कोलंबिया, इटली, केनिया, ब्राझिल, फिलीपीन्स, स्वीडन, दक्षिण आफ्रिका, नेपाळ, बांग्लादेश, कंबोडिया, जर्मनीसह, देशातील विविध राज्यांतून दीड ते दोन हजार महिला सहभागी झाल्या आहेत.जळगाव येथील जैन हिल्स येथे रविवारी आंतरराष्ट्रीय महिला परिषदेस प्रारंभ झाला. यावेळी देश-विदेशातून आलेल्या महिलांनी आपल्या देशातील माती एका भांड्यात टाकून जल व जमीन वाचविण्याचा संकल्प केला.