शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी महिलांची ग्रा.पं.वर धडक

By admin | Updated: March 23, 2017 00:37 IST

दोन दिवसापासून ठणठणाट : कंडारी ग्रामपंचायतीचा वीजपुरवठा खंडितमुळे उद्भवली स्थिती

भुसावळ : शहराजवळील कंडारी येथील पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा वीज बिल थकल्याने खंडित करण्यात आला. त्यामुळे पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. पाण्यासाठी गावातील महिलांनी बुधवारी दुपारी साडेतीन ते चार वाजेदरम्यान दरम्यान, मोर्चाद्वारे ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली. गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची  मागणी ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली.दोन दिवसांपूर्वी वीजपुरवठा खंडित करण्यात आला. आज बुधवारी शंभर महिलांचा सहभाग असलेला मोर्चा ग्रा.पं.कार्यालयावर नेण्यात आला. सरपंच योगिता संदीप शिंगणारे यांनी मोर्चाबाबत सांगितले की, पाण्यासाठी महिलांनी ग्रा. पं. कार्यालयावर मोर्चा आणला               होता. ग्रामस्थांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येऊ नये म्हणून ग्रामपंचायत प्रशासन  सर्व उपाययोजना करीत आहे. प्रथम गावात असलेले सुमारे वीसपेक्षाही जास्त हॅण्डपंप तातडीने सुरू करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे या शिवाय गावातील पाणी प्रश्न अधिक गंभीर होऊ नये म्हणून पाण्याच्या टँकरचा वापर करून पाणी प्रश्नाची तीव्रता कमी करण्यावर भर आहे, असे योगिता शिंगारे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)१८ हजार लोकसंख्येचे गाव...४भुसावळला लागूनच असलेल्या आणि रेल्वे कॉलनी लगतच्या कंडारी या गावाची लोकसंख्या सुमारे १८ हजारांपेक्षा जास्त आहे. यात कंडारी प्लॉटचा भाग आहे.या ठिकाणी बहुतांश रेल्वे कर्मचाºयांचे वास्तव्य आहे. सहा प्रभाग असलेला या गावाचा वीजपुरवठा वीज बिल थकल्याने खंडित करण्यात आला आहे.  त्यामुळे दोन दिवसांपासून ग्रामस्थांची पाण्यासाठी दमछाक होत आहे. विशेष करून महिलावर्गाला पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. रेल्वे क्वॉर्टर व कार्यालयातून पाणी आणावे लागत असल्याची स्थिती आहे.पाण्यासाठी टॅँकर४ वीज बिल थकल्याने शहराजवळील कंडारी येथील वीजपुरवठा खंडित झाला आहे. या घटनेला दोन दिवस उलटले आहेत. कंडारीचा पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. कंडारी गाव तापी नदीच्या काठावर आहे.तरीदेखील येथे दरवर्षी पाणी प्रश्न पेटतो.या वेळी मात्र ग्रा.पं.ने उपाययोजना केली आहे. ग्रामस्थांना पाण्याची अडचण येऊ नये म्हणून टँकरची व्यवस्था  केली जात आहे,असे सरपंच योगिता शिंगारे यांनी ‘लोकमत’ला           सांगितले.वीज बिल थकल्याने वीज वितरण कंपनीने पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केला आहे. ग्रामस्थांची पाण्यासाठी गैरसोय होऊ नये म्हणून गावातील सर्व हॅण्डपंप सुरू करण्यात आले आहेत. शिवाय काही ठिकाणी टँकरचादेखील वापर केला जाणार आहे.निमुळत्या गल्लींमध्ये टँकर नेता येणार नाही.ते रस्त्यावर थांबविले जाईल. ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी कोणतीही गैरसोय होणार नाही, अशी उपाययोजना करण्यावर प्रशानाचा भर आहे. घाबरण्याचे कारण नाही.- योगिता संदीप शिंगारे,  सरपंच, कंडारी, ता.भुसावळ.