जळगाव : रथ चौक परिसरातील माहेरवाशिन असलेल्या उज्ज्वला नीलेश पंड्या (वय-३५, रा.खंडवा, इंदूर) ही प्रवासी महिला धावत्या रेल्वेत चढत असताना खाली पडल्याने गुरुवारी सकाळी रेल्वे स्टेशनवर दुर्दैवी मृत्यू झाला. या महिलेला टी.सी.ने ढकलल्याचा आरोप करीत त्याला बेदम मारहाण केली. या प्रकरणी टी.सी.संपत गणपत साळुंखे (रा.सीएसटी रेल्वे स्टेशन परिसर, मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जळगाव येथे माहेरी आलेल्या उज्ज्वला पंड्या या गुरुवारी सकाळी राजेंद्र नगर एक्स्प्रेसने सासरी खंडवा येथे जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर आल्या. यावेळी त्यांना सोडण्यासाठी त्यांचा भाचा राहुल पुरोहित स्टेशनवर आला होता. त्या सामान चढवित असताना अचानक एक्स्प्रेस सुरू झाली. या दरम्यान उज्ज्वला पंड्या या गाडीत चढण्यासाठी धावल्या.यावेळी दरवाजात उभ्या असलेल्या संपत साळुंखे याच्यामुळे त्यांना चढता आले नाही आणि त्या खाली कोसळून जागीच ठार झाल्या. नातेवाईकांना ही घटना माहित झाल्यानंतर त्यांनी मद्यपी टी.सी.साळुंखे याने उज्ज्वला पंड्या यांना ढकलल्याचा आरोप करीत बेदम मारहाण केली. यावेळी तणाव वाढल्याने अपर पोलीस अधीक्षक एन.अंबिका यांच्यासह अधिकारी व कर्मचार्यांनी या ठिकाणी धाव घेत शांतता प्रस्थापित केली.गाडीत चढण्यासाठी टी.सी.ने केली मदतया प्रकरणात राहुल पुरोहित याने दिलेल्या फिर्यादीवरून संपत साळुंखे याच्यावर भादंवि कलम ३०४ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, मनमाड विभागाचे उपअधीक्षक हरिचंद्र राठोड यांनी दुपारी जळगावात येऊन घटनेची माहिती घेतली. पोलिसांनी रेल्वे स्टेशवरून सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केले आहेत. या फुटेजमध्ये टीसी साळुंखे हा उज्ज्वला पंड्या यांना हात देऊन गाडीत चढण्यासाठी मदत करीत असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.कोटआरोपी साळुंखे याच्याविरुद्ध देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार त्याला अटक केली आहे. शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येईल. सीसीटीव्हीचे फुटेजची सीडी अजून प्राप्त झालेली नाही.हरिचंद्र राठोड, उपअधीक्षक, भुसावळ विभाग
धावत्या रेल्वेत चढतांना महिलेचा मृत्यू
By admin | Updated: May 30, 2014 13:18 IST