शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

पैसे लांबविणाºया चोरट्याला महिलेनेच पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 22:00 IST

नवीन बसस्थानकात बसची प्रतिक्षा करीत असलेल्या महिलेची नजर चुकवून बॅगेतून साडे तीन हजार रुपये लांबविण्यात आले. पैसे गेल्याने हताश होऊन बसलेल्या असतानाच हा चोरटा दोन तासांनी पुन्हा नवीन सावज शोधायला आला असता तो या महिलेच्या नजरेस पडला. त्या महिलेने मोठ्या धाडसाने त्याला पकडून कानाखाली आवाज काढला नंतर लोकांच्या मदतीने पोलिसांच्या स्वाधीन केले.

ठळक मुद्देनवीन बसस्थानकातील घटना दुसरे सावज शोधायला आला अन् जाळ्यात अडकलाअन् दोन तासांनी आला चोरटा

आॅनलाईन लोकमतजळगाव दि, २ : नवीन बसस्थानकात बसची प्रतिक्षा करीत असलेल्या महिलेची नजर चुकवून बॅगेतून साडे तीन हजार रुपये लांबविण्यात आले. पैसे गेल्याने हताश होऊन बसलेल्या असतानाच हा चोरटा दोन तासांनी पुन्हा नवीन सावज शोधायला आला असता तो या महिलेच्या नजरेस पडला. त्या महिलेने मोठ्या धाडसाने त्याला पकडून कानाखाली आवाज काढला नंतर लोकांच्या मदतीने पोलिसांच्या स्वाधीन केले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सुलोचना गणेश पारधी (रा.मुंबई, मुळ रा.पाळधी) या सोमवारी मुंबई जाण्यासाठी जामनेर बसने जळगावात आल्या होत्या. मुंबई बसला वेळ असल्याने १०.३० वाजता बसची प्रतिक्षा करीत असताना प्रफुल्ल वसंतराव देशमुख (वय ३२ रा.अकोला, ह.मु.जामनेर) हा त्यांच्याशेजारी येऊन बसला. सुलोचना यांनी डोळे लावल्याचे पाहून त्याने त्यांच्या बॅगेतील साडे तीन हजार रुपये काढले व क्षणातच तेथून गायब झाला. देशमुख या सुलोचना यांच्यासोबत असल्याच्या संशयामुळे त्याच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. थोड्या वेळाने सुलोचना बॅगेची चैन उघडी दिसली.त्यांनी पैसै तपासले असता गायब झाले होते.

अन् दोन तासांनी आला चोरटापैसे चोरी झाल्याने सुलोचना पारधी या हताश झाल्या होत्या. एस.टी.चे कर्मचारी व सह प्रवाशी त्यांना धीर देत होते. दोन तास त्या जागेवरच बसून होता. ज्या महिलेचे पैसे चोरले ती महिला आता गेली असेल या हेतूने नवीन सावज शोधासाठी तो मद्याच्या नशेत बसस्थानकात आला. त्याला पाहताच या महिलेने धाव घेऊन पकडले. चोरटा असल्याचे समजल्यानंतर सह प्रवाशांनीही त्यांची मदत केली. हा गोंधळ सुरु असताना जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी अल्ताफ पठाण यांनी चोरट्याला लोकांच्या तावडीतून सोडून पोलीस ठाण्यात नेले.तेथे चौकशी केली असता त्याने कबुली देत महिलेचे पैसे परत केले. महिलेने फिर्यान दिल्याने चोरट्याविरुध्द १०९  प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. देशमुख हा जामनेर येथे एका हॉटेलमध्ये कूक असल्याचे सांगण्यात आले. बसस्थानकात सातत्याने चोºया होत असतानाही पोलिसांचा कानाडोळा होत असल्याचा आरोप गोपाळ पाटील यांनी केला.