शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

महिला विक्रेत्याने मनपा कर्मचाऱ्यांसमोर फेकला पैशांचा गल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एका महिला विक्रेती व मनपा कर्मचाऱ्यांमध्ये व्यवसाय बंद करण्यावरून गुरुवारी सकाळी वाद झाला. त्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : एका महिला विक्रेती व मनपा कर्मचाऱ्यांमध्ये व्यवसाय बंद करण्यावरून गुरुवारी सकाळी वाद झाला. त्यात संतापलेल्या महिलेने पैशांचा गल्ला मनपा कर्मचाऱ्यांच्या दिशेने फेकून मारला. मनपा कर्मचाऱ्यांनी संबंधित महिलेला इशारा दिल्यानंतर देखील वाद सुरूच असल्याने उपायुक्तांनी मुख्य बाजार पेठ परिसरात असलेल्या सर्व भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. कारवाईदरम्यान २० हून अधिक विक्रेत्यांचा माल जप्त करण्यात आला.

मनपा पथकाने कारवाई सुरू केल्यानंतर वाद वाढला. त्यानंतर शहर व शनिपेठ पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांना देखील बोलाविण्यात आले. पोलिसांचे पथक दाखल झाल्यानंतर मनपा कर्मचारी व विक्रेत्यांमधील वाद शांत झाला. काही वेळातच मुख्य बाजारपेठ परिसरातील सर्व विक्रेत्यांनी आपली दुकाने जमा करून पळ काढला. दरम्यान, गुरुवारीदेखील शहरातील दाणा बाजार, फुले मार्केट परिसर व सराफ बाजार या भागात नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती.

शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवेच्या दुकानांना व्यवसाय करण्यास सकाळी ७ ते सकाळी ११ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. मात्र, प्रशासनाने आखून दिलेल्या निर्धारित वेळेपेक्षा पुढेही व्यवसाय करत असलेल्या भाजीपाला विक्रेत्यांवर मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे.

शहरात आता अनेक भागांमध्ये निर्धारित वेळेपेक्षाही पुढे व्यवसाय थाटले जात आहे. विशेष म्हणजे नागरिकांची गर्दीदेखील दुपारी बारा वाजेपर्यंत कायम राहत असून, अनेक नागरिक नियमांकडे दुर्लक्ष करीत आहेत. मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून दररोज मुख्य बाजारपेठ परिसर असो वा उपनगरांमधील परिसर असो ज्या ठिकाणी अनधिकृतपणे दुकाने थाटली जात आहेत, अशा ठिकाणी दररोज कारवाई केली जात आहे. गुरुवारीदेखील शहरातील सुभाष चौक, बळीराम पेठ, दाणा बाजार, घाणेकर चौक, टॉवर चौक, चित्रा चौक व राजकमल टॉकीज परिसर या भागात सकाळी ११ वाजेनंतर देखील अनेक विक्रेत्यांची दुकाने सुरू होती. तसेच भाजीपाला विक्रेतेदेखील रस्त्यावर आपले व्यवसाय थाटून होते.

उपायुक्त यांचे पथक आल्यानंतर पळापळ आणि गोंधळ

सकाळी ११.१५ वाजेदरम्यान मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या पथकाने शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात पाहणी केली. उपायुक्तांची पथक दाखल होताच बाजार पेठेत विक्रेत्यांनी पळ काढला, तर अनेक विक्रेते दुकाने थाटून उभेच होती. उपायुक्तांनी संबंधित विक्रेत्यांना लवकरात लवकर माल जमा करून व्यवसाय बंद करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, काही विक्रेते व्यवसाय बंद करीत नसल्याने, मनपा कर्मचाऱ्यांनी विक्रेत्यांना कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यावर काही कर्मचारी व विक्रेत्यांमध्ये वादाला सुरुवात झाली.