शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग वापरकर्त्यांना नवीन वर्षात मोठे गिफ्ट! १ फेब्रुवारीपासून 'KYV' ची कटकट संपणार; NHAI चा मोठा निर्णय
2
एक चूक आणि बँक अकाउंट रिकामं! सायबर फसवणूक करणाऱ्यांच्या ५ पद्धती जाणून घ्या अन् काळजी घ्या
3
नैनीतालमध्ये गर्लफ्रेंडसोबत फिरत होता नवरा, अचानक समोर आली बायको; मग जे झालं...
4
१ फेब्रुवारी २०२६ पासून सिगरेट महागणार, कोणत्या Cigarette ची किती वाढणार किंमत?
5
निसर्गाचा कोप! अफगाणिस्तानात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; १७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जण गाडले गेले
6
Indian Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,४२० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
7
२०२६चा पहिला गजकेसरी राजयोग: ८ राशींना सुबत्ता, पद-पैसा वाढ; लक्षणीय यश, ३ दिवस वरदान काळ!
8
एअर इंडियाच्या पायलटचा कॅनडात 'हायव्होल्टेज' ड्रामा; उड्डाणापूर्वीच झिंगला, मग जे घडलं ते धक्कादायक!
9
२०२६ची पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी: ३ गोष्टी करा, बाप्पा संकट दूर करेल; सगळे मनासारखे होईल!
10
कर महसुलात महाराष्ट्रच ‘किंग’; देशाच्या एकूण तिजोरीत २२% वाटा एकट्या महाराष्ट्राचा
11
‘फॅमिली फर्स्ट’! शिंदेसेनेच्या मुंबईतील उमेदवारांत नेत्यांच्या नातेवाईकांचाच भरणा; माजी आमदार चक्क नगरसेवक पदासाठी रिंगणात 
12
कर्जाच्या जाळ्यात अडकली तरुणाई, विना गॅरंटी कर्जाची थकबाकी वाढतेय; बँकांवर ताण - आरबीआय
13
फडणवीस-शिंदे यांचा उद्या मुंबईत संयुक्त मेळावा, मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फुटणार
14
ग्रंथदिंडीतून साहित्याचा जागर; तब्बल ५६ चित्ररथांच्या दोन किलोमीटर ग्रंथदिंडीने फेडले डोळ्याचे पारणे
15
आजचे राशीभविष्य २ जानेवारी २०२६ : नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आजचा मुहूर्त उत्तम
16
महापालिका निवडणूक : मिशन 'थंड'खोरी! आमचे काय चुकले..? निष्ठावंतांचा सवाल
17
बंडोबांना थंड करून बिनविरोध निवडीचा नवा फंडा; मांडवली, पदांचे आमिष नाहीतर...; काही बंडखोर अज्ञात स्थळी रवाना 
18
‘मी कुठे चुकले, प्रश्न विचारण्याचा मला हक्क’; भाजपच्या इच्छुक उमेदवाराचा घरचा आहेर
19
‘शिंदेसेनेचे उमेदवार बिनविरोध यावे म्हणून विरोधकांचे उमेदवारी अर्ज करताहेत बाद’
20
मला मराठीचा आदर, मुंबईचा महापौर मराठीच होणार; भाजपनेते कृपाशंकर सिंह यांनी अखेर नमते घेतले
Daily Top 2Weekly Top 5

दहा दिवसांपूर्वी सिझेरीयन झालेल्या महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सिझेरियन झालेल्या जळगावातील रथ चौकातील रहिवासी महिला गायत्री रोशन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सिझेरियन झालेल्या जळगावातील रथ चौकातील रहिवासी महिला गायत्री रोशन पाटील (वय २३) यांचा शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. याआधी गेल्या पंधरा दिवसात जीएमसीमध्ये तीन गर्भवती महिलांचा मृत्यू झाला आहे. हा या कालावधीतील चौथा मृत्यू आहे. दरम्यान, गायत्री यांच्या मृत्यूमुळे त्यांचे अवघ्या दहा दिवसांचे बाळ आईपासून पोरके झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

गायत्री पाटील यांना ३० जुलै रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले होते. ३१ जुलै रोजी सिझेरियन करण्यात आले. यात गायत्री यांनी एका मुलीला जन्म दिला. यानंतर त्या याच ठिकाणी दाखल होत्या. मध्यंतरी त्यांची प्रकृती खालावत गेली. बुधवारी त्यांना उलटी झाली. मात्र, त्या बेशुद्ध असल्याने त्याचे कण फुफ्फुसात गेल्यामुळे त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली होती. यातच सुरुवातीला त्यांची किडनी निकामी झाली. अतिदक्षता विभागात गुरुवारी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी ७ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. श्रीकृष्ण चव्हाण यांनी दिली.

गेल्या पंधरा दिवसात चौथ्या महिलेचा मृत्यू

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या पंधरा दिवसात चार महिलांचा मृत्यू झाला आहे. यात तीन गर्भवती, तर एका महिलेचा प्रसुतीनंतर मृत्यू झाला. यात पुरेसे पोषण न मिळाल्याने बुधवारी रात्री एका महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेला एक दिवस उलट नाही तोच दुसऱ्या दिवशी एका महिलेचा मृत्यू झाला.

माहिती देण्यास उशीर

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घटना घडल्यानंतर ती लपविण्याचा प्रयत्न होत असल्याचे चित्र समोर येत आहे. विभागात चौकशी केली असता अतिदक्षता विभागात मृत्यू झाल्याचे कारण सांगून हात झटकले जातात, तर आपत्कालीन विभागात कक्षातील डॉक्टरच सांगतील, अशी उत्तरे दिली जात आहेत. शिवाय डॉक्टरांकडूनही ही माहिती मिळत असल्याने माहिती लपविली जात आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

केवळ चौकशी समित्या...पुढे काय?

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर डॉक्टरांवर विविध प्रकारचे आरोप करण्यात आल्याच्या घटना वाढल्या आहेत. यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या. मात्र, या समित्यांनी नेमके केले काय, हे समोर आलेले नाही. त्यातच काही दिवसांपूर्वी अतिदक्षता विभागात एका मृत महिलेचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. या तक्रारीनंतर तातडीने कार्यवाही सोडून एक समिती नेमण्यात आली. या समितीची बैठक घेण्यात आली. त्यामुळे केवळ समित्या नेमून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न होत आहे का? असाही एक प्रश्न निर्माण झाला आहे.