शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
3
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
4
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
5
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
6
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
7
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
8
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
9
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
10
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
11
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
12
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
13
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
14
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
15
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
16
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
17
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
18
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
19
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
20
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा

महिलेची दोघा मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 22:11 IST

टाकरखेडा येथील घटना

अमळनेर : आपल्या दोन लहान मुलांसह तरुण विवाहित महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील टाकरखेडा येथे गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली.टाकरखेडा येथील सचिन जिजाबराव पाटील हा २१ रोजी सकाळी सहा वाजता गावातील एक तरुण मजुराला घेऊन शेतात ठिबक नळ्या टाकण्यासाठी शेतात गेला होता नंतर सात वाजेच्या त्याची पत्नी भारती (वय ३२) ही आपले लहान मुले गजानन (वय १२) व स्वामी ( वय ७) या दोन्ही मुलांना घेऊन मदतीसाठी शेतात गेली जाताना तिने जेवणाचा डबा देखील सोबत नेला होता. सकाळी साडेनऊ वाजता वीज गेल्यानंतर सर्वांनी सोबत जेवण केले अकरा वाजेनंतर सचिनने सोबत आणलेल्या मुलाला घरी जाण्यास सांगितले. मात्र तो पायी जाईल त्यापेक्षा मी तुला सोडून देतो म्हणून तो त्याला घेऊन निघाला. मात्र २०० मीटर अंतरावर गेल्यावर त्याने शेताकडे नजर मारली असताना त्याला त्याची पत्नी दोघा मुलांना घेऊन विहिरीकडे येताना दिसली त्याला वाटले की, पत्नीला देखील घरी यायचे आहे म्हणून तो वाट पाहत उभा राहिला. नंतर झाडाआड ते दिसले नाहीत. म्हणून बघायला गेला असता त्याला तिघे विहिरीत पडलेले दिसले. तेथेच त्याने आक्रोश सुरू केला. आजूबाजूला दोर व काहीच सुविधा नसल्याने गावातील लोकांना बोलावण्यात आले. सरपंच मंगलाबाई पाटील , पोलीस पाटील कविता पाटील यांच्यासह गावातील लोक घटनास्थळी पोहचले मात्र विहिर ७५ फूट खोल आणि त्यात सुमारे ४० फूट पाणी होते. मातेसह दोघे मुले तळाशी गेले होते. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी तीन मोटारी मागवून विहिरीतुन पाणी काढणे सुरू केले. तब्बल अडीच तासांनंतर पाणी कमी झाल्यावर दहिवद येथील संदीप पाटील व तुषार पाटील यांनी विहिरीतून प्रेत बाहेर काढले. तिघांचे शव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. सचिन पाटील यांच्याकडे ७ बिघे शेती आहे. त्यांचे वडील निवृत्त वायरमन आहे. भारतीने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही