शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

महिलेची दोघा मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 22:11 IST

टाकरखेडा येथील घटना

अमळनेर : आपल्या दोन लहान मुलांसह तरुण विवाहित महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील टाकरखेडा येथे गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली.टाकरखेडा येथील सचिन जिजाबराव पाटील हा २१ रोजी सकाळी सहा वाजता गावातील एक तरुण मजुराला घेऊन शेतात ठिबक नळ्या टाकण्यासाठी शेतात गेला होता नंतर सात वाजेच्या त्याची पत्नी भारती (वय ३२) ही आपले लहान मुले गजानन (वय १२) व स्वामी ( वय ७) या दोन्ही मुलांना घेऊन मदतीसाठी शेतात गेली जाताना तिने जेवणाचा डबा देखील सोबत नेला होता. सकाळी साडेनऊ वाजता वीज गेल्यानंतर सर्वांनी सोबत जेवण केले अकरा वाजेनंतर सचिनने सोबत आणलेल्या मुलाला घरी जाण्यास सांगितले. मात्र तो पायी जाईल त्यापेक्षा मी तुला सोडून देतो म्हणून तो त्याला घेऊन निघाला. मात्र २०० मीटर अंतरावर गेल्यावर त्याने शेताकडे नजर मारली असताना त्याला त्याची पत्नी दोघा मुलांना घेऊन विहिरीकडे येताना दिसली त्याला वाटले की, पत्नीला देखील घरी यायचे आहे म्हणून तो वाट पाहत उभा राहिला. नंतर झाडाआड ते दिसले नाहीत. म्हणून बघायला गेला असता त्याला तिघे विहिरीत पडलेले दिसले. तेथेच त्याने आक्रोश सुरू केला. आजूबाजूला दोर व काहीच सुविधा नसल्याने गावातील लोकांना बोलावण्यात आले. सरपंच मंगलाबाई पाटील , पोलीस पाटील कविता पाटील यांच्यासह गावातील लोक घटनास्थळी पोहचले मात्र विहिर ७५ फूट खोल आणि त्यात सुमारे ४० फूट पाणी होते. मातेसह दोघे मुले तळाशी गेले होते. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी तीन मोटारी मागवून विहिरीतुन पाणी काढणे सुरू केले. तब्बल अडीच तासांनंतर पाणी कमी झाल्यावर दहिवद येथील संदीप पाटील व तुषार पाटील यांनी विहिरीतून प्रेत बाहेर काढले. तिघांचे शव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. सचिन पाटील यांच्याकडे ७ बिघे शेती आहे. त्यांचे वडील निवृत्त वायरमन आहे. भारतीने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही