शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

संतप्त जनतेची महिला सरपंचाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 16:14 IST

परस्परविरोधी तक्रारी : वराड बुद्रूक येथील पाणी प्रश्न पेटला

धरणगाव : तालुक्यातील वराड बुद्रूक येथे ग्रामपंचायतीच्या नियोजनाअभावी २५ दिवसांनंतर पाणी पुरवठा होत आहे. त्यातच २५ दिवसांनंतरही अल्प पाणी सोडल्यामुळे संतप्त झालेल्या काही नागरिकांनी महिला सरपंच मंगलाबाई अभिमन पाटील यांना व त्यांचा पती, मुलगा यांना १३ रोजी रात्री मारहाण केली. यानंतर सरपंच यांना जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.वराड बुद्रूक येथे पाणीटंचाई असल्याने ग्रामस्थांना एक-दोन किलोमीटर अंतरावरुन पाणी आणावे लागत आहे. दरम्यान, भारत निर्माण योजनेंतर्गत ५० लाख रुपये खर्च करुन गावाला २० ते २५ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच सरपंचांनी आपल्या मर्जीतील लोकांना अवैध नळ कनेक्शन दिल्याचा आरोप आहे. हा सरपंचावरील रोष नागरिकांनी काढला.१३ रोजी रात्री ग्रा.पं.ने पाणी सोडल्यानंतर सरपंच मगला पाटील, पती अभिमन पाटील, मुलगा पंकज हे गावात येवून पाणी बचतीचा सल्ला देत होते. एक तर २० ते २५ दिवसांनंतर पाणी सोडले व वरुन शहाणपण शिकवत आहात का? असा संताप लोकांनी व्यक्त करुन सरपंच, त्यांचा पती, मुलगा यांना बदडले. तेव्हा त्यांनी पाळधी औट पोस्टला धाव घेऊन हकिकत सांगितली. पोलिसांनी त्यांना पहिल्यांदा उपचार घ्या म्हणत मेमो दिल्याने ते जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले आहेत. या घटनेसंदर्भात सरपंच मंगलाबाई अभिमन पाटील यांनी तक्रार दिल्यावरून गावातील महारू भिल यांनी त्याच्याविरुद्ध तक्रार अर्ज दिला आहे. मात्र अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.