शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त जनतेची महिला सरपंचाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 16:14 IST

परस्परविरोधी तक्रारी : वराड बुद्रूक येथील पाणी प्रश्न पेटला

धरणगाव : तालुक्यातील वराड बुद्रूक येथे ग्रामपंचायतीच्या नियोजनाअभावी २५ दिवसांनंतर पाणी पुरवठा होत आहे. त्यातच २५ दिवसांनंतरही अल्प पाणी सोडल्यामुळे संतप्त झालेल्या काही नागरिकांनी महिला सरपंच मंगलाबाई अभिमन पाटील यांना व त्यांचा पती, मुलगा यांना १३ रोजी रात्री मारहाण केली. यानंतर सरपंच यांना जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.वराड बुद्रूक येथे पाणीटंचाई असल्याने ग्रामस्थांना एक-दोन किलोमीटर अंतरावरुन पाणी आणावे लागत आहे. दरम्यान, भारत निर्माण योजनेंतर्गत ५० लाख रुपये खर्च करुन गावाला २० ते २५ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच सरपंचांनी आपल्या मर्जीतील लोकांना अवैध नळ कनेक्शन दिल्याचा आरोप आहे. हा सरपंचावरील रोष नागरिकांनी काढला.१३ रोजी रात्री ग्रा.पं.ने पाणी सोडल्यानंतर सरपंच मगला पाटील, पती अभिमन पाटील, मुलगा पंकज हे गावात येवून पाणी बचतीचा सल्ला देत होते. एक तर २० ते २५ दिवसांनंतर पाणी सोडले व वरुन शहाणपण शिकवत आहात का? असा संताप लोकांनी व्यक्त करुन सरपंच, त्यांचा पती, मुलगा यांना बदडले. तेव्हा त्यांनी पाळधी औट पोस्टला धाव घेऊन हकिकत सांगितली. पोलिसांनी त्यांना पहिल्यांदा उपचार घ्या म्हणत मेमो दिल्याने ते जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले आहेत. या घटनेसंदर्भात सरपंच मंगलाबाई अभिमन पाटील यांनी तक्रार दिल्यावरून गावातील महारू भिल यांनी त्याच्याविरुद्ध तक्रार अर्ज दिला आहे. मात्र अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.