शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
3
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
4
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
5
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
6
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
7
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
8
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
9
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
10
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
11
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
12
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
13
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
14
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
15
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
16
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
17
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

संतप्त जनतेची महिला सरपंचाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 16:14 IST

परस्परविरोधी तक्रारी : वराड बुद्रूक येथील पाणी प्रश्न पेटला

धरणगाव : तालुक्यातील वराड बुद्रूक येथे ग्रामपंचायतीच्या नियोजनाअभावी २५ दिवसांनंतर पाणी पुरवठा होत आहे. त्यातच २५ दिवसांनंतरही अल्प पाणी सोडल्यामुळे संतप्त झालेल्या काही नागरिकांनी महिला सरपंच मंगलाबाई अभिमन पाटील यांना व त्यांचा पती, मुलगा यांना १३ रोजी रात्री मारहाण केली. यानंतर सरपंच यांना जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.वराड बुद्रूक येथे पाणीटंचाई असल्याने ग्रामस्थांना एक-दोन किलोमीटर अंतरावरुन पाणी आणावे लागत आहे. दरम्यान, भारत निर्माण योजनेंतर्गत ५० लाख रुपये खर्च करुन गावाला २० ते २५ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच सरपंचांनी आपल्या मर्जीतील लोकांना अवैध नळ कनेक्शन दिल्याचा आरोप आहे. हा सरपंचावरील रोष नागरिकांनी काढला.१३ रोजी रात्री ग्रा.पं.ने पाणी सोडल्यानंतर सरपंच मगला पाटील, पती अभिमन पाटील, मुलगा पंकज हे गावात येवून पाणी बचतीचा सल्ला देत होते. एक तर २० ते २५ दिवसांनंतर पाणी सोडले व वरुन शहाणपण शिकवत आहात का? असा संताप लोकांनी व्यक्त करुन सरपंच, त्यांचा पती, मुलगा यांना बदडले. तेव्हा त्यांनी पाळधी औट पोस्टला धाव घेऊन हकिकत सांगितली. पोलिसांनी त्यांना पहिल्यांदा उपचार घ्या म्हणत मेमो दिल्याने ते जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले आहेत. या घटनेसंदर्भात सरपंच मंगलाबाई अभिमन पाटील यांनी तक्रार दिल्यावरून गावातील महारू भिल यांनी त्याच्याविरुद्ध तक्रार अर्ज दिला आहे. मात्र अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.