शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

अपघातानंतर आली जाग, उपमहापौरांच्या आदेशानंतर बुजविली चारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:12 IST

जळगाव : शहरातील रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झाली असून जागोजागी खड्डे पडले आहेत. आता तर काही ठिकाणी चारी खोदून ठेवण्यात ...

जळगाव : शहरातील रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झाली असून जागोजागी खड्डे पडले आहेत. आता तर काही ठिकाणी चारी खोदून ठेवण्यात आल्या आहेत. या चारीमुळे शहरातील प्रकाश पाटील यांचा अपघात होऊन ते गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. अपघातानंतर मनपा प्रशासनाला जाग आली असून उपमहापौरांच्या सूचनेनंतर ठेकेदाराने ती चारी बुजविल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून अमृत योजनेचे काम सुरू आहे़ त्यामुळे जागोजागी खड्डे खोदून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर थातूर-मातूर खड्डे बुजविले जात आहेत. आता तर रस्त्यांच्या मधोमध चारी करण्यात आली आहे. त्यामुळे अपघात होत आहे. एसटी वर्कशॉप ते का.ऊ.कोल्हे शाळेजवळही चारी खोदून ठेवण्यात आली होती. त्या परिसरातील काळे पेट्रोल पंपाजवळून जाताना शहरातील रहिवासी प्रकाश पाटील यांचा चारीमुळे अपघात होऊन त्यांना गंभीर दुखापत झाली. ही बाब माजी नगरसेविका ममता कोल्हे यांचे पती संजय कोल्हे यांनी समोर आणल्यानंतर उपमहापौरांनी लागलीच ठेकेदारास चारीची दुरुस्ती करण्याची सूचना केली. त्यानुसार चारीची दुरुस्ती करण्यात आली आहे. त्या भागातील पथदिवे बंद असल्यामुळे त्यांचीही दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.