शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पाण्याविना टाकी भिकारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:37 IST

उत्तमनगर : तीन बळी गेल्यानंतरही बेफिकिरी, नळसंयोजनाअभावी सुविधा नावालाच

ठळक मुद्देग्रामस्थांचा उत्तमनगरात रहिवास आहे.मात्र शुद्ध पाण्यापासून आजही उत्तमनगर वंचित आहे.वर्षभरापूर्वी मायलेकांचा दूषित पाण्यामुळे बळी गेला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कचोपडा : गेल्यावर्षी उत्तमनगर पाड्यावर दूषित पाण्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने पाड्यावरील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी दिलेली पाण्याची टाकी वर्षभरानंतरही कोरडीच आहे. नळ संयोजनच दिलेले नसल्याने वर्षभरात त्या टाकीत एक थेंबसुद्धा पाणी पडलेले नाही. त्यामुळे आजही येथील रहिवाशांना कूपनलिकेचेच पाणी प्यावे लागत आहे.वर्षभरापासून या टाकीत पाण्याचा थेंब पडलेला नाही.वर्ष उलटले तरी अद्याप मृतकांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळालेली नाही. या परिस्थितीमुळे ग्रामस्थात संतापाची लाट आहे.प्रशासनाने पाच हजार लीटर क्षमतेची पाण्याची टाकी बसविली होती. त्याचे उद्घाटन आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्याहस्ते थाटात झाले. मात्र त्या टाकीत फक्त उद्घाटनाच्या दिवशीच थोडेफार पाणी टाकण्यात आले. त्यादिवसानंतर टाकीचेही नशीब फुटले.दूषित पाण्यामुळे येथील तीन जणांचा मृत्यू होण्यास वर्ष झाले. मात्र आमच्या वस्तीला प्रशासनाने अद्याप कुठल्याच सुविधा दिलेल्या नाहीत.-नारसिंग पावरा, पाडाप्रमुख, उत्तमनगरबैठक बसेना...तारांकित प्रश्नात महसूल विभाग व पाणीपुरवठा विभागाच्या संयुक्त बैठकीबाबत उत्तर मिळाले होते. मात्र अद्यापही बैठक लागली नाही. यासंदर्भात ही बैठक लवकर घ्यावी असे लेखी पत्र शासनास पाठविले आहे.-प्रा.चंद्रकांत सोनवणे,आमदार, चोपडा़