शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्ण कमी होताहेत निर्बंध शिथील होणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सार्वजनिक आरेाग्य विभागाने कोरोना संसर्गाच्या मे महिन्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन याची तुलनात्मक आकडेवारी जाहीर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सार्वजनिक आरेाग्य विभागाने कोरोना संसर्गाच्या मे महिन्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन याची तुलनात्मक आकडेवारी जाहीर केली आहे. यात रुग्णवाढीचा दर, आठवड्याची पॉझिटिव्हिटी या दोन्ही पातळ्यांवर जळगाव जिल्ह्याची कामगिरी सरस आहे. हे प्रमाण राज्याच्या तुलनेत कितीतरी कमी असून, दुसरीकडे रिकव्हरी रेट हा राज्यापेक्षा अधिक आहे. असे चित्र असल्याने जिल्हा ग्रीन झोनमध्ये असल्याने आता १ तारखेनंतर जिल्ह्याचे निर्बंध शिथिल होतील का आणि ते किती प्रमाणात होतील, याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.

दोन महिन्यांपूर्वी अगदी सक्रिय रुग्णांमध्ये देशातील पहिल्या दहामध्ये ८ व्या क्रमांकांवर असलेल्या जळगाव जिल्ह्याला एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापासून दिलासा मिळत गेला. मेच्या तिसऱ्या आठवड्यात रुग्णसंख्येचा आलेख झपाट्याने खाली गेला. आरटीपीसीआर चाचण्यांची दैनंदिन पॉझिटिव्हिटी ही दीड टक्क्यांवर पोहोचली. तर आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढवूनही त्यात बाधित येणाऱ्यांची संख्या घटली. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत विविध पातळ्यांवर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आले आहे.

चाचण्यांचे प्रमाण कमी

प्रति दक्षलक्ष लोकसंख्येमागे राज्यात एकूण २ लाख ६१ हजार ४६० कोरोना चाचण्या झालेल्या आहेत. त्या तुलनेत जळगावात प्रतिदशलक्ष लोकसंख्ये मागे २ लाख १९ हजार ७५१ चाचण्या झालेल्या आहेत. या बाबतीत जिल्ह्याचा राज्यात ११ वा क्रमांक लागतो. राज्याच्या चाचण्यांपेक्षा जिल्ह्यात ४१ हजार ७०९ चाचण्या कमी आहेत.

राज्याची स्थिती

पॉझिटिव्हिटी : १०.४६ टक्के

रुग्णवाढीचा दर : ०.४७ टक्के

राज्याचा रिकव्हरी रेट : ९२.७६ टक्के

याबाबतीत जिल्हा सरस

पॉझिटिव्हिटी : ३.४१ टक्के, राज्यात सर्वाधिक कमी

रुग्णवाढीचा दर : ०.२६ टक्के राज्यात २८ व्या क्रमांकावर

रिकव्हरी रेट : ९३.५० टक्के, राज्यापेक्षा एक टक्क्यांनी अधिक

सक्रिय रुग्ण : सक्रिय रुग्णांच्या बाबतीत राज्यात पहिल्या दहा जिल्ह्यांपेक्षा ७ हजाराने जळगावात सक्रिय रुग्ण कमी आहेत.

यात जिल्ह्यात सुधारणा हव्यात

राज्याचा एकत्रित मृत्यूदर हा जिल्ह्याच्या मृत्यूदरापेक्षा कमी आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर हा १.८१ टक्के असून, राज्याचा मृत्यूदर हा १.६२ टक्के आहे. मे महिन्याचा विचार केल्यास राज्याचा मृत्यूदर हा १.७६ टक्के आहे. यासह चाचण्या राज्यापेक्षा कमी असून, या दोन बाबतीत जिल्ह्याला सुधारणा करण्याची गरज आहे.

२२ टक्के टार्गेट पूर्ण

लसीकरणाच्या बाबतीत जिल्ह्याने ४५ वर्षांवरील नागरिकांचे २२ टक्के लसीकरण पूर्ण केले आहे. यात जिल्हा राज्यात १९ व्या क्रमांकावर असून, यात धुळ्याची लोकसंख्या कमी असल्याने त्या ठिकाणी कमी लसीकरण झालेले असतानाही त्या ठिकाणी २५ टक्के टार्गेट पूर्ण झाले आहे. जिल्हाभरात आतापर्यंत ३ लाख १९ हजार २६४ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतलेला आहे.