शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कोरोना रुग्ण कमी होताहेत निर्बंध शिथील होणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सार्वजनिक आरेाग्य विभागाने कोरोना संसर्गाच्या मे महिन्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन याची तुलनात्मक आकडेवारी जाहीर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सार्वजनिक आरेाग्य विभागाने कोरोना संसर्गाच्या मे महिन्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन याची तुलनात्मक आकडेवारी जाहीर केली आहे. यात रुग्णवाढीचा दर, आठवड्याची पॉझिटिव्हिटी या दोन्ही पातळ्यांवर जळगाव जिल्ह्याची कामगिरी सरस आहे. हे प्रमाण राज्याच्या तुलनेत कितीतरी कमी असून, दुसरीकडे रिकव्हरी रेट हा राज्यापेक्षा अधिक आहे. असे चित्र असल्याने जिल्हा ग्रीन झोनमध्ये असल्याने आता १ तारखेनंतर जिल्ह्याचे निर्बंध शिथिल होतील का आणि ते किती प्रमाणात होतील, याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.

दोन महिन्यांपूर्वी अगदी सक्रिय रुग्णांमध्ये देशातील पहिल्या दहामध्ये ८ व्या क्रमांकांवर असलेल्या जळगाव जिल्ह्याला एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापासून दिलासा मिळत गेला. मेच्या तिसऱ्या आठवड्यात रुग्णसंख्येचा आलेख झपाट्याने खाली गेला. आरटीपीसीआर चाचण्यांची दैनंदिन पॉझिटिव्हिटी ही दीड टक्क्यांवर पोहोचली. तर आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढवूनही त्यात बाधित येणाऱ्यांची संख्या घटली. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत विविध पातळ्यांवर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आले आहे.

चाचण्यांचे प्रमाण कमी

प्रति दक्षलक्ष लोकसंख्येमागे राज्यात एकूण २ लाख ६१ हजार ४६० कोरोना चाचण्या झालेल्या आहेत. त्या तुलनेत जळगावात प्रतिदशलक्ष लोकसंख्ये मागे २ लाख १९ हजार ७५१ चाचण्या झालेल्या आहेत. या बाबतीत जिल्ह्याचा राज्यात ११ वा क्रमांक लागतो. राज्याच्या चाचण्यांपेक्षा जिल्ह्यात ४१ हजार ७०९ चाचण्या कमी आहेत.

राज्याची स्थिती

पॉझिटिव्हिटी : १०.४६ टक्के

रुग्णवाढीचा दर : ०.४७ टक्के

राज्याचा रिकव्हरी रेट : ९२.७६ टक्के

याबाबतीत जिल्हा सरस

पॉझिटिव्हिटी : ३.४१ टक्के, राज्यात सर्वाधिक कमी

रुग्णवाढीचा दर : ०.२६ टक्के राज्यात २८ व्या क्रमांकावर

रिकव्हरी रेट : ९३.५० टक्के, राज्यापेक्षा एक टक्क्यांनी अधिक

सक्रिय रुग्ण : सक्रिय रुग्णांच्या बाबतीत राज्यात पहिल्या दहा जिल्ह्यांपेक्षा ७ हजाराने जळगावात सक्रिय रुग्ण कमी आहेत.

यात जिल्ह्यात सुधारणा हव्यात

राज्याचा एकत्रित मृत्यूदर हा जिल्ह्याच्या मृत्यूदरापेक्षा कमी आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर हा १.८१ टक्के असून, राज्याचा मृत्यूदर हा १.६२ टक्के आहे. मे महिन्याचा विचार केल्यास राज्याचा मृत्यूदर हा १.७६ टक्के आहे. यासह चाचण्या राज्यापेक्षा कमी असून, या दोन बाबतीत जिल्ह्याला सुधारणा करण्याची गरज आहे.

२२ टक्के टार्गेट पूर्ण

लसीकरणाच्या बाबतीत जिल्ह्याने ४५ वर्षांवरील नागरिकांचे २२ टक्के लसीकरण पूर्ण केले आहे. यात जिल्हा राज्यात १९ व्या क्रमांकावर असून, यात धुळ्याची लोकसंख्या कमी असल्याने त्या ठिकाणी कमी लसीकरण झालेले असतानाही त्या ठिकाणी २५ टक्के टार्गेट पूर्ण झाले आहे. जिल्हाभरात आतापर्यंत ३ लाख १९ हजार २६४ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतलेला आहे.