शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
7
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
8
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
9
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
11
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
12
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
13
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
14
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
15
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
16
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
17
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
18
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
19
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
20
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!

संघटनात्मक बदल काँग्रेसला नवसंजीवनी देतील का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसपक्ष जिल्ह्यात अस्तित्वाची लढाई लढत आहे, मात्र, त्यात पक्षाला यश येत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसपक्ष जिल्ह्यात अस्तित्वाची लढाई लढत आहे, मात्र, त्यात पक्षाला यश येत नसून आता आगामी काळात संघटनात्मक बदलाच्या दृष्टीने पक्षश्रेष्ठींनी टाकलेली पावले बघता या दृष्टीने जिल्ह्यात नवीन नेतृत्वाची चर्चा शिवाय चाचपणीही वरिष्ठ पातळीवरून सुरू झाली आहे. यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा दौरा आता बदलाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा मानला जात असून त्याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.

जिल्ह्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप या तीन पक्षांच्या तुलनेत अद्यापही काँग्रेस पक्ष अगदी लोकसभेपासून तर थेट ग्रामपंचायतीपर्यंत जिल्ह्यात पिछाडीवरच आहे. कमी अधिक प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसच्या जागा असतीलही मात्र, पूर्वीची काँग्रेस आता जिल्ह्यात नाहीच, असा एक सूर उमटत आहे. एकाच विषयावरून प्रत्येक आघाडीचे वेगेवेगळी आंदोलने होतात. आंदेालनाला पुरेसे कार्यकर्ते नसताता, असे उदासीन चित्र काँग्रेसमध्ये आताही कायम आहे. दुसरीकडे अगदी बुथप्रमुख ते पन्नाप्रमुख असे काही पक्षांचे नियोजन असताना काँग्रेसकडे पुरेशी संघटनाच नसल्याची जिल्ह्यात स्थिती आहे.

जिल्ह्यातील संघटनेत बदलाच्या चर्चा

मुंबईत एक मोठी बैठक पार पडल्यानंतर आता काँग्रेसमध्ये बदलाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, जे काही संघटनात्मक बदल होतील ते खरच काँग्रेसला नवसंजीवनी देतील का? असाही एक प्रश्न समोर येत आहे. काँग्रेसमध्येही गटा- तटाचे राजकारण आहेच, त्यामुळे पक्ष वाढला नाही, असेही काही पदाधिकारी सांगातात. जिल्हाध्यक्षपदासाठी जी नावे चर्चेत येत आहेत ते पदाधिकारी वर्षानुवर्षे पक्षाची जुळलेले असून त्यांनी प्रदेशवरही काम केले आहे. त्यामुळे यातून योग्य नेतृत्व निवडणे हे वरिष्ठांसमोर एक आव्हान राहणार आहे. मुंबईच्या बैठकीची विशेष बाब म्हणजे पक्षश्रेष्ठींनी प्रथमच एकत्रित पदाधिकाऱ्यांना वेळ दिला आहे. त्यामुळे जळगावात काँग्रेसवाढीसाठी वरिष्ठ पातळीवरूनच हालचाली गतीमान झाल्या आहेत.

२३ रोजी नाना पटोले जिल्ह्यात ?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे २३ जून रोजी जिल्हा दौऱ्यावर येण्याची शक्यता असून याबाबतचा दौरा अधिकृत आलेला नसला तरी काही कार्यक्रमांचे नियोजन झाल्याचे सूत्रांकडून समजते. फैजपूर येथे ते रावेर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतील तर अमळनेर येथे ते जळगाव लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. या दौऱ्यावर जिल्हा काँग्रेसचे पुढील भवितव्य अवलंबून असल्याने या दौऱ्याकडे बघितले जात आहे.