शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

नियोजनच्या घाईगर्दीतील बैठकीचा उपयोग होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 22:40 IST

विश्लेषण

सुशील देवकरजळगाव: जिल्हा नियोजन समितीची व पाणी आरक्षणाची एकत्रित बैठक सोमवारी, १ आॅक्टोबर रोजी दुपारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घाईगर्दीत पार पडली. मात्र या बैठकीतील चर्चेत अनेक विभागांमधील गैरप्रकार निदर्शनास येऊनही सोक्षमोक्ष न करताच चौकशीचे आदेश देत बैठक आटोपण्यात आली. त्यातच नवीन सदस्यांनी किरकोळ किरकोळ विषय मांडून या सभेला जि.प.ची सभा करून टाकली. घाईगर्दीतील अशा बैठकीचा जिल्ह्याच्या विकासाच्या नियोजनासाठी खरोखरच कितपत उपयोग होणार? याबाबत साशंकताच आहे.आधीच पालकमंत्री केवळ बैठकीसाठीच जळगावात येतात. मागील बैठकीत झालेल्या विषयांचा साहजिकच विसर पडलेला असतो. कुणी विषय निदर्शनास आणून दिला तरच पुन्हा त्यावर चर्चा होते. अन्यथा चर्चेला अनेक फाटे फुटतात. याचा गैरफायदा मात्र प्रशासनातील कामचुकार अधिकाऱ्यांना होतो. अनेकदा जिल्ह्यात विषय गाजत असतानाही त्याची माहिती दिली जात नाही. याचेच उदाहरण म्हणजे शिवाजीनगर उड्डाणपुलाचे देता येईल. पालकमंत्र्यांनी स्वत:हून समांतर रस्ते व शिवाजीनगर पुलाबाबत सांगा, काही अडचण आहे का? अशी विचारणा करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी पुलाच्या कामाला विरोध होत असल्याची बाब सांगण्याचे टाळले. अन्यथा या विषयाचा सोक्षमोक्षही तेव्हाच झाला असता. तीच बाब समांतर रस्ते, बोंडअळी अनुदान, डार्कझोनमधील विहिरी या विषयांमध्ये झाली. केवळ चर्चा झाली. चौकशीचे आदेश देऊन मोकळे झाले. अशा चौकशांचे नंतर काय होते? हे जगजाहीर आहे. या विषयांमध्येही तेच झाले तर विकासकामांच्या योजनांमधील घोळ आणखी वाढीस लागतील. त्यामुळे हे विषय पूर्णपणे तडीस लागतील याची काळजी घेण्याची जबाबदारी सदस्यांवरच आहे. पुढील बैठकीत आवर्जून या विषयांमध्ये काय झाले? कुणावर कारवाई केली? याची विचारणा झाली तरच प्रशासनावर धाक कायम राहिल.