शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

आघाडी व युतीचा धर्म पाळला जाईल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 11:35 IST

गेल्या निवडणुकीतील पुनरावृत्ती टाळण्यासाठी काँग्रेस व भाजप दक्ष

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यात आमदारकी भाजप अर्थात गावीत गटाकडे तर नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्था या रघुवंशी अर्थात काँग्रेस गटाकडे अशी राजकीय स्थिती गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. लोकसभेसाठी राजकीय गणिते बदलली असून पालिका निवडणुकीत काँग्रेस व शिवसेनेची झालेली युती आता दुभंगली आहे. भाजप-सेना एकत्र आली असली तरी मने जुळणे आवश्यक आहे. दुसरीकडे राष्टÑवादी खुल्या दिलाने काँग्रेसला कशी आणि कोणती मदत करते याकडे देखील लक्ष लागून राहणार आहे.नंदुरबार तालुका नवापूर आणि नंदुरबार अशा दोन विधानसभा मतदारसंघात विभागला गेला आहे. तालुक्यातील सहा महसूल मंडळांपैकी दोन महसूल मंडळे हे नवापूर मतदारसंघात येत असल्यामुळे तालुक्यातील राजकीय समिकरणे नेहमीच दोलायमान असतात. सद्य स्थितीचा विचार करता नगरपालिका व पंचायत समिती काँग्रेसकडे आहेत. पालिका निवडणुकीत काँग्रेस-शिवसेना युती चर्चेची ठरली होती. जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीने देखील या युतीने तयारी चालविली होती. परंतु लोकसभेला भाजप-सेना युती झाल्यामुळे आता सेनेला पक्ष आदेशामुळे काँग्रेसची साथ सोडावी लागणार असून भाजपच्या दृष्टीने ती जमेची बाजू ठरणार आहे.मने जुळतील का?काँग्रेस व भाजपकडून अद्याप कुणालाही उमेदवारी जाहीर झालेली नसली तरी दोन्ही पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. घटक पक्षांना एकत्र करणे, चर्चा करणे, विविध माध्यमातून एकत्र येणे असे प्रकार काँग्रेस, भाजपमध्ये सुरू आहे. वरिष्ठ पातळीवर काँग्रेस-राष्टÑवादी आघाडी व भाजप-सेनेची युती झाली आहे. दोन्ही पक्षांनी कामाला सुरुवात केली आहे. भाजप-सेनेने संयुक्त मेळावा व पत्रकार परिषद घेवून ‘झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे...’ या उक्तीप्रमाणे कामाला सुरुवात देखील केली आहे. दोन्ही पक्षांमध्ये पाच वर्ष विस्तवही जात नव्हता. पालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले होते. काँग्रेसच्या साथीने चार नगरसेवक सेनेचे निवडून आले होते. आता एकदिलाने काम करण्याची घोषणा केली असली तरी कार्यकर्त्यांची मने जुळली जातील का? हा प्रश्न कायम राहणार आहे.राष्टÑवादीची साथदुसरीकडे काँग्रेस व राष्टÑवादी यांची आघाडी देखील एकदिलाने काम करणार असे म्हणत आहे. गेल्या निवडणुकीत राष्टÑवादीचे बरेच पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपकडे होते. अर्थात आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांना मानणारा वर्ग या पक्षात असल्यामुळे ते चित्र यंदाही कायम राहते किंवा कसे याकडे लक्ष लागून राहणार आहे.काँग्रेसचा कार्यकर्त्यांवर भरकाँग्रेसकडे असलेली नगरपालिका, पंचायत समिती, बाजार समिती, शेतकरी सहकारी संघ या संस्थांच्या बळावर काँग्रेस तालुक्यात आघाडी घेण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. परंतु जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी प्रचारात सक्रीय राहणार नसल्याचा फटका सहन करावा लागणार आहे.एकुणच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची ही एक प्रकारे रंगीत तालीमच राहणार आहे. यामुळे पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते यांना एकसंघ ठेवणे व त्यांना उत्साहित करण्यासाठी आघाडी व युतीतील घटक पक्ष कामाला लागले आहेत.