शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
4
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
5
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
6
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
7
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
8
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
9
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
10
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
11
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
12
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
13
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
15
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
16
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
17
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
18
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
19
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
20
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी

शिक्षकदिनी गुरु-शिष्यांची भेट होणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:36 IST

एरंडोल : कोरोनाच्या महामारीमुळे इतर ठिकाणांप्रमाणेच तालुक्यातील शाळा व महाविद्यालये अल्पसा कालावधीवगळता जवळपास दीड वर्षापासून बंद आहेत. ...

एरंडोल : कोरोनाच्या महामारीमुळे इतर ठिकाणांप्रमाणेच तालुक्यातील शाळा व महाविद्यालये अल्पसा कालावधीवगळता जवळपास दीड वर्षापासून बंद आहेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्राचा खेळखंडोबा झाला आहे. एवढ्या प्रदीर्घ सुटीमुळे विद्यार्थी कंटाळले आहेत. तसेच शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते धोक्यात आले आहे. शाळा व महाविद्यालय या प्रणालींचा विद्यार्थ्यांना विसर पडला आहे असे बोलले जाते. ज्ञान मिळवण्यासाठी शाळा- महाविद्यालयाबाहेर अनेक पर्याय असले तरी संस्कार हा फक्त शाळा-महाविद्यालयातच मिळतो म्हणून ५ सप्टेंबर या शिक्षकदिनी शाळा-महाविद्यालय सुरू होणार का शिक्षण संस्थांची घंटा पूर्ववत वाजणार का याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

एरंडोल तालुक्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची संख्या ८४ असून, खासगी अनुदानित प्राथमिक शाळा पाच आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या १३ व विनाअनुदानित शाळांची संख्या आठ आहे. माध्यमिक शाळा ३५ आहेत, तर डीडीएसपी महाविद्यालय हे एकमेव महाविद्यालय आहे. कोरोनाच्या संकटामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता विचारात घेऊन शासनाने सर्व संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मध्यंतरी आठवी ते दहावीचे वर्ग सुरू होते. मात्र वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन पुन्हा ते वर्ग बंद करण्यात आले. एरंडोल तालुक्यातील जवळपास तीस हजार विद्यार्थी शाळा- महाविद्यालय कधी सुरू होणार याची प्रतीक्षा करीत आहेत. मोबाइलवरील चालणारे आभासी शिक्षण हे ग्रामीण भागाला न रुचणारे व न पेलवणारे आहे खूप मोठा टक्का शिक्षणापासून या दीड वर्षाच्या कालावधीत वंचित राहिला आहे, त्यामुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या नाहीत तर येणारी भावी पिढी स्पर्धेच्या युगात कशी तग धरणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शासनाने आतातरी पालक व विद्यार्थी या घटकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, अशी भावना निर्माण झाली आहे.

शाळांच्या खोल्यांचे निर्जंतुकीकरण करून तसेच सर्व शिक्षक, प्राध्यापक व कर्मचारी यांचे १०० टक्के लसीकरण करून सॅनिटायझर व मास्कचा वापर इत्यादी निर्बंध घालून कोरोना नियमांचे पालन करण्याच्या अटींवर शाळा-महाविद्यालय शिक्षक दिनाच्या पवित्र दिवशी सुरू करावेत, अशी मागणी जोर धरत आहे.