शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

ऑक्सिजननिर्मितीत स्वयंपूर्ण होणार - गुलाबराव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:15 IST

जळगाव : कोरोनाची दुसरी लाट ओसरलेली नाही. त्यामुळे ऑक्सिजननिर्मितीत जिल्ह्याला स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे. सध्या रुग्णसंख्या स्थिर असली ...

जळगाव : कोरोनाची दुसरी लाट ओसरलेली नाही. त्यामुळे ऑक्सिजननिर्मितीत जिल्ह्याला स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे. सध्या रुग्णसंख्या स्थिर असली तरी ऑक्सिजनची निर्मिती महत्त्वाची आहे. त्यासाठी जिल्ह्यात १० निर्मिती प्रकल्पांची उभारणी केली जाणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला बोलताना गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, ‘यात भुसावळ, चाळीसगाव, अमळनेर, पारोळा, रावेर, भडगाव व धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालये, मोहाडी येथील महिला रुग्णालय आणि चोपडा मुक्ताईनगर आणि जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये एकूण १० ठिकाणी ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहेत. यासाठी ८ कोटी दोन लाख रुपयांच्या निधीला मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. या सर्व प्रकल्पांमधून तब्बल ३७०० एलपीएम क्षमतेइतका प्राणवायूनिर्मित होणार आहे. आपल्या सद्य:स्थितीतील गरजेपेक्षा हा जास्त आहे. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून आम्ही नियोजन करीत आहोत. यामुळे कोणत्याही आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी आपण सज्ज होणार आहोत.

सध्या रेमडेसिविरचा तुटवडा असला तरी जिल्ह्याला हाफकिनकडून सहा हजार व्हायल्स मिळणार आहेत त्याची ऑर्डर देण्यात आली आहे.

लसीकरणाबाबत बोलताना पाटील यांनी सांगितले की, नागरिकांना कोणताही त्रास न होता कोविडची लस मिळावी यासाठीचे नियोजन जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. जिल्ह्यात शक्य तितक्या लवकर लसीकरण सुरू व्हावे असा प्रयत्न आहे.

पाटील पुढे म्हणाले की, कोविडचा आपण आजवर अतिशय धईरोद)त्तपणे मुकाबला केला आहे. आता तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन प्रशासन तयारी करत आहे. त्याला सहकार्य करण्याची गरज आहे. सध्या नागरिकांनी शासनाने लावलेल्या निर्बंधांचे पालन करावे, तसेच यासोबत आपल्या नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन नक्की लस घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.

महामारीतही पाणीपुरवठा सुरळीत

या संकटाच्या काळात राज्यात पाणीपुरवठा सुरळीत राहावा, तसेच कुणीही तहानलेले राहू नये यासाठी विभागामार्फत योग्य ते नियोजन करण्यात आले. प्रांताधिकाऱ्यांना टँकर्सचे अधिकार देण्यात आले आहेत. जिल्ह्यात जळगाव शहराला लागून असलेल्या वाघनगर परिसरासाठी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली आहे. याच प्रमाणे जिल्ह्यातील विविध गावांसाठी जल जीवन मिशनच्या माध्यमातून योजनांना गती देण्यात येणार आहे.

बियाणांची टंचाई भासणार नाही.

खरीप हंगामासाठी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आढावा बैठक बोलावली आहे. यात खते आणि बियाणांबाबतचे नियोजन केले जाईल. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खते आणि बियाणांची कोणतीही टंचाई भासणार नाही, याची ग्वाहीदेखील पालकमंत्री पाटील यांनी दिली.