शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
3
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
4
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
5
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
6
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
7
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
8
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
9
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
10
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
11
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
12
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
13
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
14
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
15
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
16
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
17
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
18
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
19
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
20
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 

ऑक्सिजननिर्मितीत स्वयंपूर्ण होणार - गुलाबराव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:15 IST

जळगाव : कोरोनाची दुसरी लाट ओसरलेली नाही. त्यामुळे ऑक्सिजननिर्मितीत जिल्ह्याला स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे. सध्या रुग्णसंख्या स्थिर असली ...

जळगाव : कोरोनाची दुसरी लाट ओसरलेली नाही. त्यामुळे ऑक्सिजननिर्मितीत जिल्ह्याला स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे. सध्या रुग्णसंख्या स्थिर असली तरी ऑक्सिजनची निर्मिती महत्त्वाची आहे. त्यासाठी जिल्ह्यात १० निर्मिती प्रकल्पांची उभारणी केली जाणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला बोलताना गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, ‘यात भुसावळ, चाळीसगाव, अमळनेर, पारोळा, रावेर, भडगाव व धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालये, मोहाडी येथील महिला रुग्णालय आणि चोपडा मुक्ताईनगर आणि जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये एकूण १० ठिकाणी ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहेत. यासाठी ८ कोटी दोन लाख रुपयांच्या निधीला मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. या सर्व प्रकल्पांमधून तब्बल ३७०० एलपीएम क्षमतेइतका प्राणवायूनिर्मित होणार आहे. आपल्या सद्य:स्थितीतील गरजेपेक्षा हा जास्त आहे. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून आम्ही नियोजन करीत आहोत. यामुळे कोणत्याही आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी आपण सज्ज होणार आहोत.

सध्या रेमडेसिविरचा तुटवडा असला तरी जिल्ह्याला हाफकिनकडून सहा हजार व्हायल्स मिळणार आहेत त्याची ऑर्डर देण्यात आली आहे.

लसीकरणाबाबत बोलताना पाटील यांनी सांगितले की, नागरिकांना कोणताही त्रास न होता कोविडची लस मिळावी यासाठीचे नियोजन जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. जिल्ह्यात शक्य तितक्या लवकर लसीकरण सुरू व्हावे असा प्रयत्न आहे.

पाटील पुढे म्हणाले की, कोविडचा आपण आजवर अतिशय धईरोद)त्तपणे मुकाबला केला आहे. आता तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन प्रशासन तयारी करत आहे. त्याला सहकार्य करण्याची गरज आहे. सध्या नागरिकांनी शासनाने लावलेल्या निर्बंधांचे पालन करावे, तसेच यासोबत आपल्या नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन नक्की लस घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.

महामारीतही पाणीपुरवठा सुरळीत

या संकटाच्या काळात राज्यात पाणीपुरवठा सुरळीत राहावा, तसेच कुणीही तहानलेले राहू नये यासाठी विभागामार्फत योग्य ते नियोजन करण्यात आले. प्रांताधिकाऱ्यांना टँकर्सचे अधिकार देण्यात आले आहेत. जिल्ह्यात जळगाव शहराला लागून असलेल्या वाघनगर परिसरासाठी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली आहे. याच प्रमाणे जिल्ह्यातील विविध गावांसाठी जल जीवन मिशनच्या माध्यमातून योजनांना गती देण्यात येणार आहे.

बियाणांची टंचाई भासणार नाही.

खरीप हंगामासाठी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आढावा बैठक बोलावली आहे. यात खते आणि बियाणांबाबतचे नियोजन केले जाईल. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खते आणि बियाणांची कोणतीही टंचाई भासणार नाही, याची ग्वाहीदेखील पालकमंत्री पाटील यांनी दिली.