शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

सातपुड्यात पाण्यासाठी वन्यप्राण्यांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 16:19 IST

सातपुड्यातील नैसर्गिक पाणीसाठे आटल्याने वन्यप्राण्यांना तहान भागविण्यासाठी भटकंती करावी लागत असून, मानवी वस्तीत त्यांचा संचार वाढला आहे. जंगलातील कृत्रिम पाणीसाठे तयार करून या मुक्या जीवांना वाचविण्याची मागणी निसर्गप्रेमींकडून केली जात आहे.

ठळक मुद्देनैसर्गिक पाणीसाठे आटलेकृत्रिम पाणीसाठ्यांची गरजवनविभागाने तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे

उटखेडा, ता.रावेर, जि. जळगाव : सातपुड्यातील नैसर्गिक पाणीसाठे आटल्याने वन्यप्राण्यांना तहान भागविण्यासाठी भटकंती करावी लागत असून, मानवी वस्तीत त्यांचा संचार वाढला आहे. जंगलातील कृत्रिम पाणीसाठे तयार करून या मुक्या जीवांना वाचविण्याची मागणी निसर्गप्रेमींकडून केली जात आहे.‘मे’ महिन्यात दिवसेंदिवस तापमान वाढत आहे. प्रत्यक्षात सूर्य आग ओकत असल्याने सातपुड्यातील सर्व नैसर्गिक पाणीसाठे प्रथमच आटले आहेत. परिणामी तहान भागविण्यासाठी वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. पाण्याविना कासाविस होणारे प्राणी पाण्याच्या शोधात गावांकडे धाव घेत असल्याचे चित्र दिसत आहे.सातपुडा जंगलातील निवास सोडून येणाऱ्या या प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्राण्यांची जीवितहानी होण्याआधीच वनविभागाने या जंगलात कृत्रिम पाणीसाठे तयार करावेत. आधीच प्राण्यांच्या संख्येत घट झालेली आहे. जेमतेम शिल्लक असलेले हरिण, सांबर, माकड, लांडगे, कोल्हे, बिबटे, ससे, मोर आदी प्राण्यांची पाण्यासाठी दमछाक होत असल्याने या प्राण्यांना मुकण्याची वेळ आली आहे. या प्राण्यांच्या संरक्षणासाठी योग्य ते उपाय करून कृत्रिम पाणीसाठे तयार करावेत व या प्राण्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबवावी, अशी मागणी वन्यप्रेमींकडून होत आहे.

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचारYawalयावल