शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्यात पाण्यासाठी वन्यप्राण्यांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 16:19 IST

सातपुड्यातील नैसर्गिक पाणीसाठे आटल्याने वन्यप्राण्यांना तहान भागविण्यासाठी भटकंती करावी लागत असून, मानवी वस्तीत त्यांचा संचार वाढला आहे. जंगलातील कृत्रिम पाणीसाठे तयार करून या मुक्या जीवांना वाचविण्याची मागणी निसर्गप्रेमींकडून केली जात आहे.

ठळक मुद्देनैसर्गिक पाणीसाठे आटलेकृत्रिम पाणीसाठ्यांची गरजवनविभागाने तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे

उटखेडा, ता.रावेर, जि. जळगाव : सातपुड्यातील नैसर्गिक पाणीसाठे आटल्याने वन्यप्राण्यांना तहान भागविण्यासाठी भटकंती करावी लागत असून, मानवी वस्तीत त्यांचा संचार वाढला आहे. जंगलातील कृत्रिम पाणीसाठे तयार करून या मुक्या जीवांना वाचविण्याची मागणी निसर्गप्रेमींकडून केली जात आहे.‘मे’ महिन्यात दिवसेंदिवस तापमान वाढत आहे. प्रत्यक्षात सूर्य आग ओकत असल्याने सातपुड्यातील सर्व नैसर्गिक पाणीसाठे प्रथमच आटले आहेत. परिणामी तहान भागविण्यासाठी वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. पाण्याविना कासाविस होणारे प्राणी पाण्याच्या शोधात गावांकडे धाव घेत असल्याचे चित्र दिसत आहे.सातपुडा जंगलातील निवास सोडून येणाऱ्या या प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्राण्यांची जीवितहानी होण्याआधीच वनविभागाने या जंगलात कृत्रिम पाणीसाठे तयार करावेत. आधीच प्राण्यांच्या संख्येत घट झालेली आहे. जेमतेम शिल्लक असलेले हरिण, सांबर, माकड, लांडगे, कोल्हे, बिबटे, ससे, मोर आदी प्राण्यांची पाण्यासाठी दमछाक होत असल्याने या प्राण्यांना मुकण्याची वेळ आली आहे. या प्राण्यांच्या संरक्षणासाठी योग्य ते उपाय करून कृत्रिम पाणीसाठे तयार करावेत व या प्राण्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबवावी, अशी मागणी वन्यप्रेमींकडून होत आहे.

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचारYawalयावल