शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

सातपुड्यात पाण्यासाठी वन्यप्राण्यांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 16:19 IST

सातपुड्यातील नैसर्गिक पाणीसाठे आटल्याने वन्यप्राण्यांना तहान भागविण्यासाठी भटकंती करावी लागत असून, मानवी वस्तीत त्यांचा संचार वाढला आहे. जंगलातील कृत्रिम पाणीसाठे तयार करून या मुक्या जीवांना वाचविण्याची मागणी निसर्गप्रेमींकडून केली जात आहे.

ठळक मुद्देनैसर्गिक पाणीसाठे आटलेकृत्रिम पाणीसाठ्यांची गरजवनविभागाने तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे

उटखेडा, ता.रावेर, जि. जळगाव : सातपुड्यातील नैसर्गिक पाणीसाठे आटल्याने वन्यप्राण्यांना तहान भागविण्यासाठी भटकंती करावी लागत असून, मानवी वस्तीत त्यांचा संचार वाढला आहे. जंगलातील कृत्रिम पाणीसाठे तयार करून या मुक्या जीवांना वाचविण्याची मागणी निसर्गप्रेमींकडून केली जात आहे.‘मे’ महिन्यात दिवसेंदिवस तापमान वाढत आहे. प्रत्यक्षात सूर्य आग ओकत असल्याने सातपुड्यातील सर्व नैसर्गिक पाणीसाठे प्रथमच आटले आहेत. परिणामी तहान भागविण्यासाठी वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. पाण्याविना कासाविस होणारे प्राणी पाण्याच्या शोधात गावांकडे धाव घेत असल्याचे चित्र दिसत आहे.सातपुडा जंगलातील निवास सोडून येणाऱ्या या प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्राण्यांची जीवितहानी होण्याआधीच वनविभागाने या जंगलात कृत्रिम पाणीसाठे तयार करावेत. आधीच प्राण्यांच्या संख्येत घट झालेली आहे. जेमतेम शिल्लक असलेले हरिण, सांबर, माकड, लांडगे, कोल्हे, बिबटे, ससे, मोर आदी प्राण्यांची पाण्यासाठी दमछाक होत असल्याने या प्राण्यांना मुकण्याची वेळ आली आहे. या प्राण्यांच्या संरक्षणासाठी योग्य ते उपाय करून कृत्रिम पाणीसाठे तयार करावेत व या प्राण्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबवावी, अशी मागणी वन्यप्रेमींकडून होत आहे.

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचारYawalयावल