शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक साठे आटल्याने सातपुड्यातील वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 17:42 IST

सातपुड्यातील पन्नास वर्षात कधी नव्हे ते सर्व नैसर्गिक पाणी साठे प्रथमच आटले आहेत. परिणामी तहान भागविण्यासाठी वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू असून पाण्याविना कासाविस होणारे प्राणी पाण्याच्या शोधासाठी गावांकडे धाव घेत असल्याचे चित्र दिसत आहे.

ठळक मुद्दे ५० वर्षात प्रथमच सातपुड्यात विदारक स्थिती पाण्यासाठी वन्यजीवांची मानवी वस्त्यांकडे धाववनविभागाने कृत्रीम पाणवठे तातडीने उभारण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतबिडगाव, ता. चोपडा, दि.१४ : सातपुड्यातील नैसर्गिक पाणीसाठे आटल्याने वन्यप्राण्यांना तहान भागविण्यासाठी भटकंती करावी लागत असून मानवी वस्तीत त्यांचा संचार वाढला आहे. जंगलात कृत्रीम पाणवठे तयार करून या मुक्या जीवांना वाचविण्याची मागणी निसर्गप्रेमींकडून केली जात आहे.यंदा एप्रिल महिन्यापासूनच मे हिटचा तडाखा बसू लागला होता. आणि आता प्रत्यक्ष सुरू झालेल्या मे महिन्यात सूर्य आग ओकत आहे. त्यामुळे सातपुड्यातील पन्नास वर्षात कधी नव्हे ते सर्व नैसर्गिक पाणी साठे प्रथमच आटले आहेत. परिणामी तहान भागविण्यासाठी वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू असून पाण्याविना कासाविस होणारे प्राणी पाण्याच्या शोधासाठी गावांकडे धाव घेत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र आपला जंगलातील निवास सोडून येणाऱ्या या प्राण्यांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. त्यांची जीवितहानी होण्याआधीच वनविभागाने सातपुड्यात तात्काळ कृत्रिम पाणवठे उभारावेत अशी मागणी निसर्ग आणि प्राणी मित्रांकडून होत आहे.जेमतेम शिल्लक प्राणीही संकटातआधीच मोठ्या प्रमाणावर सातपुड्यात प्राण्यांच्या संख्येत घट झालेली असून जेमतेम शिल्लक असलेले हरिण, माकड, अस्वल, बिबट्या, लांडगे, कोल्हे, तडस, ससे, मोर, सांबर आदी प्राण्यांचीही पाण्यासाठी दमछाक होत असून प्राणाला मुकण्याची वेळ आली आहे. अशात काही प्राणी तहान भागवण्यासाठी मानवी वस्तींकडे धाव घेत असून त्यांची शिकार होण्याचीही भिती आहे. त्यातच सातपुड्यात वारंवार लागणारे वणव्यानेही प्राणी भयभीत होत असतात. त्यामुळे वनविभागाने या प्राण्याच्या संरक्षणासाठी योग्य ते उपाय करून तातडीने कृत्रिम पाणवठे उभारावे व या प्राण्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबवावी अशी मागणी वन्यप्रेमींकडून होत आहे.प्रथमच येतोय विदारक अनुभवमे महिन्यात दररोजच्या उच्चांकावर तापमान पोहचत आहे. त्यातच यावर्षी सातपुडा परिसरात अत्यल्प पाऊस झाल्याने जंगलातील झरे आटले असून पाणीसाठे कधीचेच नष्ट झाले आहेत. उरले सुरलेले झरे, तळे उन्हाच्या तडाख्यात सुकले तर सातपुड्याच्याच कुशीत असलेल्या चिंचपाणी धरणातही पाण्याचा ठणठणाट झाला आहे. त्यामुळे सातपुडा परिसरात गेल्या पन्नास वर्षात कधी नव्हे ते नैसर्गिक पाणीसाठे यावर्षी नष्ट झाल्याने वन्यप्राण्यासमोर पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई