शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

गळा दाबून पत्नीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 15:42 IST

पाचोऱ्यातील घटना : मुलगा होत नाही म्हणून सतत होत होती मारहाण

पाचोरा : तिनही मुलीच झाल्या मुलगा होत नाही म्हणून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना शनिवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास शहरातील विवेकानंद नगर भागातील वंजारी तांडा येथे घडली आहे. या घटनेने प्रचंड खळबळ ुउडाली आहे.याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, पप्पू रतन पवार (३१) याचा विवाह आनंद नगर निपाने ता.एरंडोल येथील कस्तुराबाई हिच्याशी सुमारे नऊ वर्षांपूर्वी झाला. उभयतांना गौरी (माया),खुशी, भाग्यश्री अशा तीन मुली अनुक्रमे ६,४,२ वर्षाच्या असताना तिनही मुलीच आहेत म्हणून पती पप्पू हा पत्नी कस्तुराबाईचा अतोनात छळ करून रोज दारूच्या नशेत शिविगाळ व सतत मारहाण करीत असे. ९ जून रोजी संध्याकाळी ७.३० च्या सुमारास पप्पू याने कस्तुराबाई हिला मारहाण करून गळा दाबून खून केला. प्रसंगी लहानग्या तिनही मुली घाबरुन घराच्या बाहेर पळाल्या.पप्पूने लाकडी दांड्यांने पत्नीला मारहाण करीत खून केला.चक्कर आल्याचा केला बनावप्रसंगी कस्तुरबाईला चक्कर येऊन ती पडल्याचा बनाव करीत तिला त्याच अवस्थेत खाजगी रुग्णालयात घेऊन गेला. मात्र महिला जागीच ठार झालेली असल्याने खाजगी दवाखान्यात दाखल होऊ शकली नाही. मात्र पाचोरा ग्रामीण रुग्णालयात तिला मृत घोषित करण्यात आले. घडलेल्या घटनेची माहिती कस्तुराबाईच्या माहेरच्या मंडळींना रात्रीच कळवली. मुलीला चक्कर आल्याचा बहाणा करून मरण पावल्याचे सांगितले.मात्र माहेरच्यांनी कस्तुरबाईचा पतीने खून केल्याचा आरोप केला. त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावरून पोलिसांनी मयत कस्तुराबाईचे शवविच्छेदन जळगाव येथे करून पाचोरा येथेच माहेरच्यांनी अंत्यसंस्कार केले. दरम्यान मयताची आई पद्माबाई राठोड याची फिर्याद व शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालावरून पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा रात्री दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली. कस्तुराबाई ही दोन दिवसांपूर्वीच माहेरच्या नातेवाईकांकडील लग्नावरून परत आली होती.मोठ्या मुलीने केली मारहाणीची कहानी कथनचिमुकल्या तिन्ही मुलींच्या समक्ष आईला मारहाण झाल्याचे मोठ्या ६वर्षाच्या मुलीने पोलिसांना सांगितले. आरोपी पप्पू पवार यानेही पोलिसांकडे गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव भागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन मोरे, उपविभागिय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे, प्रभारी पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.फौजदार पंकज शिंदे तपास करीत आहेत.