शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
2
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
3
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
4
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
5
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
6
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
7
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
8
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
9
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
10
कसा नियतीचा खेळ हा... ट्रकला धडकून मोठ्या भावाचा मृत्यू, मृतदेह घ्यायला निघालेल्या लहान भावाचाही रस्त्यावरच अंत!
11
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
12
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
13
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
14
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
15
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
16
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
17
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
18
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास
19
सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
20
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."

बायको सुटली, जीवनयात्रा संपली. मात्र दारु सोबतीलाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 13:08 IST

अनेक कुटुंबाचे दु:ख : दारूच्या तिरडीसाठी वढोद्यासह खिर्डीत महिलांचा लढा

ठळक मुद्देस्त्रीशक्तीच्या जळगाव वा:याही सुरूचपिणा:याला दाखवतात इंगादारुने संपवले अनेक तरुण

ऑनलाईन लोकमत / हितेंद्र काळुंखे

जळगाव, दि. 17  -  विक्रांत 26 वर्षांचा होता. त्याची बायको सुटली, पण दारू नाही सुटली. अखेरचा श्वासही त्याने दारूच्या घोटासह घेतला. विक्रांतचा चूलत भाऊ संतोषही दारूचा बळी ठरला. दारूमुळे आकांत वाटय़ाला आलाय, अशी  विक्रांतची आई काही खिर्डी गावात (ता. रावेर) एकटीच नाही. काहींनी मुले गमावली तर काहींनी पती. उशिरा का होईना दारूने पोळलेले नारी शक्तीचे शेकडो हात आता दारुविरुद्ध एकवटले आहेत.देशी, इंग्लिश, हातभट्टी अशी सर्व दारु बंद व्हावी म्हणून स्त्रीशक्तीच्या संघर्षाला खिर्डी (ता. रावेर) येथे पाच वर्षे उलटलेली आहेत.  यासाठी स्त्रीशक्तीच्या जळगाव वा:याही सुरूच आहेत. काहींची तर मजुरीही बुडते.  पदरचे एसटी बसचे भाडे खर्च करून या महिला अधूनमधून जळगावला येतात.  दोन दिवसांपूर्वीच विक्रांतच्या मातोश्री अलकाबाई शंकर तावडे आणि अनेक महिला पोलिस अधीक्षक कार्यालयात साहेब केव्हा येतायेत म्हणून वाट बघत बसलेल्या होत्या. ‘आमच्या घरात गमवायला आता काही शिल्लक उरलेलं नाही, पण जे आम्ही भोगलं ते आता गावात कुणाच्याही वाट्याला येऊ नये, असं मला वाटतं म्हणून माझा हा आटापिटा..’ असे या महिलांपैकी एक उषा पाटील यांनी सांगितले.दारुमुळे विनोद दत्तू कोळी (35), प्रमोद दत्तू कोळी (38) हे दोन्ही भाऊ वर्षभरात एकापाठोपाठ गेले. मुरलीधर रुपचंद कोळी, विजय माधव कोचुरे अशी दारूने संपवलेल्या अनेक  तरुणांची नावे ऐकायला मिळाली. खिर्डीतून अनेक तिरडी निघायला ही ‘दारू’ जबाबदार आहे. शाळेतली मुलं सुद्धा गुत्त्यावरून आम्ही पकडलेली आहेत आणि कुटत कुटत घरी आणली आहेत, असेही या महिलांनी सांगितले.स्वाती भिरूड, शालिनी कोळी, सरपंच पौर्णिमा  ठोंबरे, माधुरी पाटील, मीनाक्षी पाटील यांनी दारूविरुद्ध आपली मुठ आवळलेली असून गावात एखादीला तिचा नवरा दारू पिऊन त्रास देत असेल तर या सगळ्या एकत्र तिथं धडकतात आणि आपला इंगा दाखवून देतात. पण या लढय़ाला  कायद्याची साथ असणं आवश्यक आहे, अशी या महिलांची अपेक्षा आहे. वढोदा (ता. चोपडा) येथून आलेल्या कमलबाई विजय भिल, अक्काबाई अहिेरे, मीनाबाई वानखेडे अशा अनेक मद्यपिडित भगिनीही पोलीस अधीक्षक कार्यालयात आलेल्या होत्या. अक्काबाईंनी पती गमावलाय. गावातील दारूचे बळी ठरलेले संदीप शिवाजी पाटील, विजय तंगा पाटील यांच्या घरातील महिलाही  दारुविरुद्धच्या या लढाईत उतरल्या आहेत. दोन्ही गावातील या महिलांची संध्याकाळी साहेबांशी भेट झाली. नियमानुसार नक्की काही तरी करु असे आश्वासन मिळाले.  आणि मोठय़ा आशेसह या महिला गावाकडे परतल्या. मात्र दारुचा गावाला मिळालेला शाप मिटलाच पाहिजे, यासाठीचा लढा दारुचा पराभव होई र्पयत सुरुच राहील, असा निर्धारही जाता जात त्यांनी व्यक्त केला.