शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

बायको मोबाईलवर व्यस्त, रोजच्या प्रकाराने पतीदेव त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:16 IST

जळगाव : बायको सतत मोबाईलवर बोलत असल्याने नवरे कमालीचे वैतागले असून दोघांमध्ये टोकाचे वाद होऊ लागले आहेत. जानेवारी २०१९ ...

जळगाव : बायको सतत मोबाईलवर बोलत असल्याने नवरे कमालीचे वैतागले असून दोघांमध्ये टोकाचे वाद होऊ लागले आहेत. जानेवारी २०१९ ते नोव्हेंबर २०२० या २३ महिन्यात पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला सहाय्य तथा भरोसा कक्षात ३६३ तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्यातील ५० प्रकरणांमध्ये यशस्वी तडजोड घडवून आणण्यात या कक्षाला यश आले आहे. २०१९ या वर्षात २२५ तक्रारी अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी ४० प्रकरणात समजोता घडवून आणण्यात आला तर ५० प्रकरणे न्यायालयात पाठविण्यात आलेली आहेत. १३५ प्रकरणात तक्रारदार पतीच हजर झालेले नाहीत.

जानेवारी ते नोव्हेंबर २०२० या ११ महिन्यात १३८ नवऱ्यांनी बायकोविरुध्द तक्रारी केल्या. त्यापैकी १० प्रकरणात तडजोड झाली तर १३ प्रकरणे न्यायालयात पाठविण्यात आली आहेत. २० प्रकरणात पती हजर झालेले नाहीत, ९५ प्रकरणांमध्ये तडजोडीचे प्रयत्न सुरु आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या अख्त्यारित असलेल्या या सेलचे कामकाज चालते. पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सविता परदेशी, वैशाली पाटील, मनिषा पाटील आदी जण या सेलमध्ये कार्यरत असून तेच हे प्रकरणे हाताळतात. पोलीस अधीक्षक कार्यालयात हा सेल आहे.

ही आहेत नवरा-बायकोमध्ये होणाऱ्या भांडणाची प्रमुख कारणे

पतीने त्याच्या आई, वडीलांपासून लांब रहावे, फक्त पती-पत्नी दोघांनी रहावे यासह पत्नी मोबाईलवरच जास्त बोलत असल्याने त्यावर पती संशय घेतात अशाच प्रामुख्याने तक्रारी नवऱ्यांनी भरोसा सेलकडे केलेल्या आहेत. दारु पिवून आलेलेही काही बायकांना आवडत नाही, तसेच बाहेर फिरायला, खरेदीला घेऊन जावे अशी अपेक्षा बायकांची असल्याची तक्रार नवऱ्यांनी केली आहे.

भरोसा सेलमध्ये

आलेल्या तक्रारी

२२५ (2019)

१३८ (2020)

५० प्रकरणांत समेट

पोलीस अधीक्षक कार्यालयात असलेल्या महिला सहाय्य कक्ष तथा भरोसा कक्षात २३ महिन्यात ३६३ दाखल तक्रारींपैकी ५० प्रकरणात यशस्वीरित्या समेट घडवून आणण्यात आले आहे. या प्रकरणातील पती-पत्नी सुखाने संसार करीत आहेत तर ६ ३ प्रकरणे न्यायालयात पाठविण्यात आलेली आहेत. आता तक्रारींचा ओघ वाढलेला आहे.

कोरोना व लॅाकडाऊन काळात तक्रारींची संख्या कमी होती, त्यात आता वाढ होऊ लागली आहे. आई, वडीलांपासून विभक्त रहावे तसेच मोबाईलवर बोलल्याच्या कारणावरुनच पती-पत्नीत वाद होत असल्याचे प्रकरणे जास्त आहेत. पत्नींप्रमाणे पतींच्याही तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत.

- सविता परदेशी,

महिला सहाय तथा भरोसा सेल