शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

मराठा समाजाला आरक्षण मग मुस्लिमांना का नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 22:08 IST

असदुद्दीन ओवेसी : फैजपूर येथील जाहीर सभेत टीका

फैजपूर, ता. यावल (जि. जळगाव) : महाराष्ट्रात भाजप सरकार मराठा समाजाला आरक्षण देऊ शकते तर मुस्लिम समाजाला आरक्षण का देत नाही असा सवाल उपस्थित करत भाजप मुस्लिमांवर अन्याय करत आहे असा आरोप एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी रविवारी येथे आयोजित जाहीर सभेत केला.रावेर विधानसभा मतदारसंघाचे एआयएमआयएमचे उमेदवार विवेक ठाकरे यांच्या प्रचारार्थ शहरातील मिल्लत नगरच्या प्रांगणात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेत बोलताना ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारामुळे देशाच्या कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेवर कडाडून प्रहार केला. तिहेरी तलाख विधेयक चुकीच्या पद्धतीने पारीत झाल्याने मुस्लिम महिलांना न्याय मिळणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वीच्या सत्ताधारी यांच्या उदासीन धोरणामुळे रावेर-यावल भागात उच्च महाविद्यालयीन उर्दू शिक्षणाच्या सोयी उपलब्ध नसल्याने त्यांनी मुसलमानांच्या मतांच्या जोरावर पदे भुषविणाऱ्यांवर जोरदार हल्ला चढविला.जातीचे राजकारण नाहीएआयएमआयएम फक्त मुस्लिमांची पार्टी असल्याचा आरोप त्यांनी खोडून काढत जातीपातीच्या पुढील राजकारण करीत असल्याचे स्पष्ट केले. त्याचाच भाग म्हणून धोबी समाजाचे प्रदेशाध्यक्ष व सामाजिक चळवळीतुन पुढे आलेले विवेक ठाकरे यांना उमेदवारी दिल्याचे ते म्हणाले.खासदार ओवेसी यांनी ५८ मिनिटांच्या भाषणात मुस्लीम, दलित व बारा बलुतेदार यांच्यासह केळी व ऊस उत्पादक यांच्या विकासाचा अजेंडा व त्याबाबतचे धोरण राबवणार असल्याचे नमूद केले. डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरणात सुद्धा सरकार संवेदनशील नसल्याचा त्यांनी आरोप केला.सभेप्रसंगी उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्ष डॉ.खालिद परवेज यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष फिरोज शेख, महासचिव मुजाहिद शेख, सुधाकर भंगाळे,कासम खाटीक,राजेंद्र वारके, खुशाल भंगाळे, चैतन्य बोरोले, खेमचंद्र बोंडे, प्रचार समिती प्रमुख अशरफ तडवी, सहप्रमुख नावेद खान, सचिव कलिम खान, झोन अध्यक्ष रेहान जहागिरदार, जळगाव लोकसभा अध्यक्ष जिया बागवान, नावेद खान, फैजपूर शहराध्यक्ष इम्रान शेख, महासचिव इम्रान खान, यावल शहराध्यक्ष आबीद खान, महासचिव वसीम शेख, रावेर शहराध्यक्ष अकबर खान, महासचिव वसीम शेख,असीम खान आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन नईम शेख तर आभार नगरसेवक अक्रम देशमुख यांनी मानले.केळीला न्याय हाच यापुढे एआयएमआयएमचा अजेंडाकेळीचे विक्रमी उत्पादन काढण्यात रावेर-यावल तालुका अग्रेसर असतांना केळी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळू शकला नाही. केळीला फळाचा दर्जा, विमा संरक्षण, नुकसान भरपाई प्रती हेक्टरी १ लाख मिळावी आणि केळीला शालेय पोषण आहारात समाविष्ठ करणे हा यापुढे एआयएमआयएम पक्षाचा अजेंडा राहील. येत्या अधिवेशनात राष्ट्रीय बागवाणी बोर्ड आणि फलोत्पादन मंत्रालयाला केळीबाबत निर्णय घ्यायला भाग पाडण्यात येईल असेही खासदार असुदोद्दीन ओवेसी यावेळी म्हणाले.