शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाध्याय’ची सक्ती कशाला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम आरटीई २००९ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम आरटीई २००९ नुसार पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करून वर्गोन्नत करण्याचा निर्णय घेतला असला तरी दुसऱ्या बाजूला मात्र अद्याप ही स्वाध्याय सक्तीचा केला असल्याने विद्यार्थी, पालक व शिक्षकांची तारांबळ उडत आहे. स्वाध्याय सक्तीचा करण्‍यात येऊ नये, अशी मागणी काही पालकांकडून होत आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या आठवड्यात शालेय शिक्षण विभागाने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. यातील जे विद्यार्थी ऑनलाइन होते त्यांचे अंतर्गत मूल्यमापन आणि जे ऑफलाइन होते किंवा ज्यांच्यापर्यंत शिक्षणाच्या सुविधा पोहोचल्याच नाहीत, अशा विद्यार्थ्यांना आरटीई २००९ कलम १६ नुसार वर्गोन्नत करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले. एवढेच नाही तर नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही थोड्याफार प्रमाणात मूल्यमापन करून सरसकट उत्तीर्णतेचा निर्णय घेण्यात आला. तसेच दहावीची परीक्षा रद्द करून बारावीची परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. असे असताना पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने सुरू केलेला स्वाध्याय हा उपक्रम मात्र अद्यापही सुरूच आहे. त्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्वाध्याय सोडवण्याची सक्ती शिक्षकांवर केली जात आहे. विद्यार्थी त्यांच्या घरी असताना शिक्षक हा स्वाध्याय त्यांच्याकडून कसा सोडवून घेणार? त्यासाठी शिक्षकाला आपला जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांच्या घरी जावे लागेल. कारण ग्रामीण भागात अनेक विद्यार्थ्यांकडे इंटरनेटची सुविधा नसल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडत आहे. सरसकट उत्तीर्णतेचा निर्णय घेतल्यावर आता स्वाध्यायाची सक्ती कशाला? असा प्रतिप्रश्नही पालक व विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे. यावर शिक्षणाधिकारी यांच्या संपर्क साधला असता, तो झाला नाही. जळगाव जिल्ह्यात इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गात ६ लाख २१ हजार ९४६ विद्यार्थी आहेत. त्यापैकी २ लाख ७३ हजार विद्यार्थी स्वाध्याय उपक्रमात सहभाग घेतात. इतर विद्यार्थ्यांचा सहभाग नसतो. त्यामुळे काही तज्ज्ञ शिक्षकांनी सुद्धा स्वाध्याय सक्तीचे न करण्‍याची प्रतिक्रिया दिली आहे.