शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
2
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
3
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
4
हृदयद्रावक! खेळताना प्लास्टिकचा बॉल गिळला; दीड वर्षांच्या लेकीचा पालकांसमोर तडफडून मृत्यू
5
"माझा मुलगा मानव ठणठणीत आहे...", मुलाच्या आत्महत्येची खोटी बातमी पसरवणाऱ्यांवर संतापली रेशम टिपणीस
6
मुंबईतील तरुणीवर अलिबागमध्ये बलात्कार, पार्टीनंतर ऑफिसमधील सहकाऱ्यानेच केला घात; पीडितेसोबत काय घडलं?
7
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
8
पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी 'ही' SIP ठरेल गेम चेंजर!
9
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
10
SEBI ची मोठी कारवाई, शेअर बाजारात या कंपनीला बंदी; ₹४८४३ कोटींचा नफाही होणार जप्त
11
Viral Video: इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ पाहून अंगाचा थरकाप उडेल!
12
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
13
Sonam Raghuwanshi : "मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं
14
AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली
15
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता; मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देऊ शकतं मोठं गिफ्ट
16
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
17
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिरासमोर कारने ६ जणांना उडवलं, एकाचा मृत्यू
18
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
19
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
20
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल

‘स्वाध्याय’ची सक्ती कशाला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम आरटीई २००९ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम आरटीई २००९ नुसार पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करून वर्गोन्नत करण्याचा निर्णय घेतला असला तरी दुसऱ्या बाजूला मात्र अद्याप ही स्वाध्याय सक्तीचा केला असल्याने विद्यार्थी, पालक व शिक्षकांची तारांबळ उडत आहे. स्वाध्याय सक्तीचा करण्‍यात येऊ नये, अशी मागणी काही पालकांकडून होत आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या आठवड्यात शालेय शिक्षण विभागाने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. यातील जे विद्यार्थी ऑनलाइन होते त्यांचे अंतर्गत मूल्यमापन आणि जे ऑफलाइन होते किंवा ज्यांच्यापर्यंत शिक्षणाच्या सुविधा पोहोचल्याच नाहीत, अशा विद्यार्थ्यांना आरटीई २००९ कलम १६ नुसार वर्गोन्नत करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले. एवढेच नाही तर नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही थोड्याफार प्रमाणात मूल्यमापन करून सरसकट उत्तीर्णतेचा निर्णय घेण्यात आला. तसेच दहावीची परीक्षा रद्द करून बारावीची परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. असे असताना पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने सुरू केलेला स्वाध्याय हा उपक्रम मात्र अद्यापही सुरूच आहे. त्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्वाध्याय सोडवण्याची सक्ती शिक्षकांवर केली जात आहे. विद्यार्थी त्यांच्या घरी असताना शिक्षक हा स्वाध्याय त्यांच्याकडून कसा सोडवून घेणार? त्यासाठी शिक्षकाला आपला जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांच्या घरी जावे लागेल. कारण ग्रामीण भागात अनेक विद्यार्थ्यांकडे इंटरनेटची सुविधा नसल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडत आहे. सरसकट उत्तीर्णतेचा निर्णय घेतल्यावर आता स्वाध्यायाची सक्ती कशाला? असा प्रतिप्रश्नही पालक व विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे. यावर शिक्षणाधिकारी यांच्या संपर्क साधला असता, तो झाला नाही. जळगाव जिल्ह्यात इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गात ६ लाख २१ हजार ९४६ विद्यार्थी आहेत. त्यापैकी २ लाख ७३ हजार विद्यार्थी स्वाध्याय उपक्रमात सहभाग घेतात. इतर विद्यार्थ्यांचा सहभाग नसतो. त्यामुळे काही तज्ज्ञ शिक्षकांनी सुद्धा स्वाध्याय सक्तीचे न करण्‍याची प्रतिक्रिया दिली आहे.