शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

जिल्हाधिकाऱ्यांचा आनंदोत्सव कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 18:36 IST

विश्लेषण

 सुशील देवकरज़ळगाव- शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्ग क्र.६ (नवीन क्रमांक ५३) च्या ८ किमी लांबीचे चौपदरीकरण करण्याच्या कामाची ई-निविदा प्रसिद्ध झाली. त्यामुळे समांतर रस्ते कृती समितीतर्फे पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. समितीने केलेला जल्लोष एकवेळ समजू शकतो, मात्र जिल्हाधिकाºयांनीही ढोलताशांच्या गजरात जल्लोषात सामील होणे थोडे आश्चर्यकारक आहे. एकीकडे या महामार्गावर शेकडो लोकांचे बळी जात असतानाही प्रशासन म्हणून काहीही करू न शकलेल्या जिल्हा प्रशासनाच्या प्रमुखांचा हा आनंदोत्सव नक्की कशासाठी ? असाच प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.‘नही’तर्फे शहराबाहेरून जाणाºया राष्टÑीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुमारे वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आले असले तरीही ते अद्यापही व्यवस्थितपणे सुरू होऊ शकलेले नाही, अशी स्थिती आहे. तर शहरातून जाणाºया महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी आधीच १०० कोटीचा निधी प्राप्त झालेला होता. त्यामुळे शहरातील महामार्गाचे चौपदरीकरण अथवा मजबुतीकरण ही प्रक्रिया ‘नही’कडून अशीही करण्यातच येणार होती. मात्र मागणी समांतर रस्त्यांची होती. त्यामुळे शहरातील महामार्गाचे चौपदरीकरणाची निविदा निघाल्याने जिल्ह्याचे प्रमुख असलेल्या जिल्हाधिकाºयांनी रस्त्यावर ढोलताशांच्या गजरात नाचणाºया पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये सहभागी होणे कितपत संयुक्तिक आहे? असा सवाल निर्माण झाला आहे.अभी दिल्ली दूरशहरातील महामार्गाच्या समांतर रस्त्यांच्या डीपीआरचा घोळ गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. असे असताना सध्या केवळ शहरातील महामार्गाच्या चौपदरीकरणाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. अजून निविदा प्राप्त होणे, त्यांना मंजुरी, त्यांनी काम वेळेवर सुरू करणे, आणि त्यानंतर काम दीड वर्षांच्या कालावधीत पूर्ण करणे आदी अनेक बाबी आहेत. त्यानंतर दुसºया टप्प्याचे काम सुरू होईल. सुरू होईलच? याची खात्रीही देणे अवघड आहे. त्यामुळे केवळ चौपदरीकरणाची निविदा निघाली म्हणून कुणाला विजय मिळाल्याचा आनंद असेल तर तो साजरा करण्याचा त्यांचा अधिकार आहे. मात्र जिल्हा प्रशासनाच्या प्रमुखाने त्यात सहभागी होणे ही बाब खटकणारी आहे. एरव्ही हजारोंचा मोर्चा आला, रास्ता रोको आंदोलन झाले तरीही स्वत:च्या गेटवर देखील निवेदन घेण्यासाठी न येणाºया जिल्हाधिकाºयांनी यापूर्वी समांतर रस्ते कृती समितीच्या अजिंठा चौफुलीवरील रास्ता रोको आंदोलनाच्यावेळी थेट अजिंठा चौफुली गाठून लेखी आश्वासन दिले होते. विशेष म्हणजे ‘नही’चे अधिकारीही सोबत नेण्याची काळजी घेतली होती. त्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही, हा भाग वेगळा. मात्र त्यावेळीही जिल्हाधिकाºयांच्या हजेरीने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्याचीच पुनरावृत्ती या आनंदोत्सवाच्या निमित्ताने झाली आहे.