शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांचा आनंदोत्सव कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 18:36 IST

विश्लेषण

 सुशील देवकरज़ळगाव- शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्ग क्र.६ (नवीन क्रमांक ५३) च्या ८ किमी लांबीचे चौपदरीकरण करण्याच्या कामाची ई-निविदा प्रसिद्ध झाली. त्यामुळे समांतर रस्ते कृती समितीतर्फे पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. समितीने केलेला जल्लोष एकवेळ समजू शकतो, मात्र जिल्हाधिकाºयांनीही ढोलताशांच्या गजरात जल्लोषात सामील होणे थोडे आश्चर्यकारक आहे. एकीकडे या महामार्गावर शेकडो लोकांचे बळी जात असतानाही प्रशासन म्हणून काहीही करू न शकलेल्या जिल्हा प्रशासनाच्या प्रमुखांचा हा आनंदोत्सव नक्की कशासाठी ? असाच प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.‘नही’तर्फे शहराबाहेरून जाणाºया राष्टÑीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुमारे वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आले असले तरीही ते अद्यापही व्यवस्थितपणे सुरू होऊ शकलेले नाही, अशी स्थिती आहे. तर शहरातून जाणाºया महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी आधीच १०० कोटीचा निधी प्राप्त झालेला होता. त्यामुळे शहरातील महामार्गाचे चौपदरीकरण अथवा मजबुतीकरण ही प्रक्रिया ‘नही’कडून अशीही करण्यातच येणार होती. मात्र मागणी समांतर रस्त्यांची होती. त्यामुळे शहरातील महामार्गाचे चौपदरीकरणाची निविदा निघाल्याने जिल्ह्याचे प्रमुख असलेल्या जिल्हाधिकाºयांनी रस्त्यावर ढोलताशांच्या गजरात नाचणाºया पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये सहभागी होणे कितपत संयुक्तिक आहे? असा सवाल निर्माण झाला आहे.अभी दिल्ली दूरशहरातील महामार्गाच्या समांतर रस्त्यांच्या डीपीआरचा घोळ गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. असे असताना सध्या केवळ शहरातील महामार्गाच्या चौपदरीकरणाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. अजून निविदा प्राप्त होणे, त्यांना मंजुरी, त्यांनी काम वेळेवर सुरू करणे, आणि त्यानंतर काम दीड वर्षांच्या कालावधीत पूर्ण करणे आदी अनेक बाबी आहेत. त्यानंतर दुसºया टप्प्याचे काम सुरू होईल. सुरू होईलच? याची खात्रीही देणे अवघड आहे. त्यामुळे केवळ चौपदरीकरणाची निविदा निघाली म्हणून कुणाला विजय मिळाल्याचा आनंद असेल तर तो साजरा करण्याचा त्यांचा अधिकार आहे. मात्र जिल्हा प्रशासनाच्या प्रमुखाने त्यात सहभागी होणे ही बाब खटकणारी आहे. एरव्ही हजारोंचा मोर्चा आला, रास्ता रोको आंदोलन झाले तरीही स्वत:च्या गेटवर देखील निवेदन घेण्यासाठी न येणाºया जिल्हाधिकाºयांनी यापूर्वी समांतर रस्ते कृती समितीच्या अजिंठा चौफुलीवरील रास्ता रोको आंदोलनाच्यावेळी थेट अजिंठा चौफुली गाठून लेखी आश्वासन दिले होते. विशेष म्हणजे ‘नही’चे अधिकारीही सोबत नेण्याची काळजी घेतली होती. त्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही, हा भाग वेगळा. मात्र त्यावेळीही जिल्हाधिकाºयांच्या हजेरीने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्याचीच पुनरावृत्ती या आनंदोत्सवाच्या निमित्ताने झाली आहे.