शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

जिल्हाधिकाऱ्यांचा आनंदोत्सव कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 18:36 IST

विश्लेषण

 सुशील देवकरज़ळगाव- शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्ग क्र.६ (नवीन क्रमांक ५३) च्या ८ किमी लांबीचे चौपदरीकरण करण्याच्या कामाची ई-निविदा प्रसिद्ध झाली. त्यामुळे समांतर रस्ते कृती समितीतर्फे पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. समितीने केलेला जल्लोष एकवेळ समजू शकतो, मात्र जिल्हाधिकाºयांनीही ढोलताशांच्या गजरात जल्लोषात सामील होणे थोडे आश्चर्यकारक आहे. एकीकडे या महामार्गावर शेकडो लोकांचे बळी जात असतानाही प्रशासन म्हणून काहीही करू न शकलेल्या जिल्हा प्रशासनाच्या प्रमुखांचा हा आनंदोत्सव नक्की कशासाठी ? असाच प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.‘नही’तर्फे शहराबाहेरून जाणाºया राष्टÑीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुमारे वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आले असले तरीही ते अद्यापही व्यवस्थितपणे सुरू होऊ शकलेले नाही, अशी स्थिती आहे. तर शहरातून जाणाºया महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी आधीच १०० कोटीचा निधी प्राप्त झालेला होता. त्यामुळे शहरातील महामार्गाचे चौपदरीकरण अथवा मजबुतीकरण ही प्रक्रिया ‘नही’कडून अशीही करण्यातच येणार होती. मात्र मागणी समांतर रस्त्यांची होती. त्यामुळे शहरातील महामार्गाचे चौपदरीकरणाची निविदा निघाल्याने जिल्ह्याचे प्रमुख असलेल्या जिल्हाधिकाºयांनी रस्त्यावर ढोलताशांच्या गजरात नाचणाºया पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये सहभागी होणे कितपत संयुक्तिक आहे? असा सवाल निर्माण झाला आहे.अभी दिल्ली दूरशहरातील महामार्गाच्या समांतर रस्त्यांच्या डीपीआरचा घोळ गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. असे असताना सध्या केवळ शहरातील महामार्गाच्या चौपदरीकरणाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. अजून निविदा प्राप्त होणे, त्यांना मंजुरी, त्यांनी काम वेळेवर सुरू करणे, आणि त्यानंतर काम दीड वर्षांच्या कालावधीत पूर्ण करणे आदी अनेक बाबी आहेत. त्यानंतर दुसºया टप्प्याचे काम सुरू होईल. सुरू होईलच? याची खात्रीही देणे अवघड आहे. त्यामुळे केवळ चौपदरीकरणाची निविदा निघाली म्हणून कुणाला विजय मिळाल्याचा आनंद असेल तर तो साजरा करण्याचा त्यांचा अधिकार आहे. मात्र जिल्हा प्रशासनाच्या प्रमुखाने त्यात सहभागी होणे ही बाब खटकणारी आहे. एरव्ही हजारोंचा मोर्चा आला, रास्ता रोको आंदोलन झाले तरीही स्वत:च्या गेटवर देखील निवेदन घेण्यासाठी न येणाºया जिल्हाधिकाºयांनी यापूर्वी समांतर रस्ते कृती समितीच्या अजिंठा चौफुलीवरील रास्ता रोको आंदोलनाच्यावेळी थेट अजिंठा चौफुली गाठून लेखी आश्वासन दिले होते. विशेष म्हणजे ‘नही’चे अधिकारीही सोबत नेण्याची काळजी घेतली होती. त्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही, हा भाग वेगळा. मात्र त्यावेळीही जिल्हाधिकाºयांच्या हजेरीने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्याचीच पुनरावृत्ती या आनंदोत्सवाच्या निमित्ताने झाली आहे.