शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

मी सक्षम आहे तर बदल का स्विकारु?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:16 IST

जळगाव : आजच्या २१ व्या शतकात एक गंभीर समस्या समाजाला भेडसावत आहे, ती म्हणजे तरुणांचे लग्न जुळणे अगदी कठीण ...

जळगाव : आजच्या २१ व्या शतकात एक गंभीर समस्या समाजाला भेडसावत आहे, ती म्हणजे तरुणांचे लग्न जुळणे अगदी कठीण झाले आहे. नशिबाने किंवा कर्तृत्वाने जुळलेच तर ते पुढे टिकविणे त्यापेक्षाही अवघड झालेले आहे. बदलती मानसिकता हे त्याचे मुख्य कारण असून त्यामुळेच समाजात घटस्फोटाचे प्रमाणही वाढल्याचे दिसून येत आहे.

गेल्या वर्षात पोलिसांच्या महिला सहाय्य कक्षात पती-पत्नीच्या वादाची तब्बल ८०४ प्रकरणे आली होती.

आजच्या परिस्थितीत मुली व मुले उच्च शिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत, त्यामुळे मी सक्षम आहे तर मी का म्हणून सहन करायचे ही मानसिकता मुलींमध्ये रुजत चालली आहे. त्याशिवाय पती असलेला मुलगा देखील मीच का बदल स्वीकारु, या भुमिकेत असतो. एकमेकांच्या अहंकारामुळे नातेवाईकांमध्ये देखील तणावाच्या घटना घडल्या आहेत. टीव्ही, मोबाईल, सोशल मीडियाचा अती वापर घातक ठरु लागला आहे. त्यामुळे पती-पत्नीत गैरसमज व संवाद कमी होत चालला आहे. पती-पत्नीत विचार पटत नसतील तर तात्काळ वेगळे होण्याचा घाईचा निर्णय घेतला जातो.

पालकांचा हस्तक्षेप घातक

मुलीला सासरी तिच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या, माहेरी लाडात होती, तेथेही लाडात असावी, तिला हवं तसं करता, वागता यावे ही मुलीच्या आईची इच्छा व त्यांचा हस्तक्षेप घटस्फोट व वादाला कारण ठरत आहे. दुसरीकडे लग्न झाल्यामुळे मुलगा आपल्यापासून दूर तर नाही ना जाणार या शंका व शक्यतेमुळे संसार व बारीकसारीक गोष्टीत मुलाच्या आई, वडिलांचाही हस्तक्षेप होत आहे. त्याशिवाय एकमेकांबाबत गैरसमज, संशय, व्यसन व दुसऱ्याला त्रासदायक असणाऱ्या सवयी यामुळे अनेक समस्या निर्माण होतात.

संसार टिकण्यासाठी काय करावे

पती-पत्नीने एकमेकांना दाद देणे, कौतूक करणे या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत, पटल्या नाहीत तर योग्य शब्दात मनमोकळेपणाने बोलले पाहिजे. तू माझ्या आई, वडिलांशी व्यवस्थित बोलली नाही म्हणून मी पण बोलणार नाही ही एकमेकांमधील स्पर्धा टाळली पाहिजे. मीच का बदलावे हा अंहकार न ठेवता नातेसंबंध सुधारण्यासाठी स्वत:मध्ये बदल करण्याची तयारी दाखवावी. अपेक्षेप्रमाणे जोडीदार मिळाला नाही तरी देखील किरकोळ मतभेद व दोषांसहित आपल्याला त्याला स्वीकारता येईल का याचा प्राधान्याने विचार केला पाहिजे.

पती-पत्नीच्या वादाचे ८०४ प्रकरणे

पोलीस दलातील महिला सहाय्य कक्ष पती-पत्नीतील वादावर तोडगा काढण्याचे मुख्य कार्य करते. या कक्षात २०२० मध्ये ८०४ पती-पत्नींच्या वादाची प्रकरणे आली होती, त्यात १८८ प्रकरणांमध्ये संसाराची वेल पुन्हा बहरण्यात मोलाची कामगिरी या कक्षाच्या पथकाने केली आहे. ३९८ प्रकरणे तारखेवर हजर न होण्यामुळे निकाली काढण्यात आली होती, अर्थात या प्रकरणात घटस्फोट झाला. तर उर्वरित प्रकरणात तडजोडीचे प्रयत्न सुरुच होते.

कोट...

कोणत्याही जोडप्यात वाद होताताच, पण ते किती ताणायचे हे आपल्या हातात असते. वाद न वाढवता तडजोडीची भूमिका स्विकारली तर वाद टोकाला जात नाही. आपल्याला हवे तसे कधीच मिळत नाही पण जे मिळाले ते मनापासून स्वीकारले तर कौटुंबिक नाते टिकवता येते.

-शंभू संतोष रोकडे, संचालक, राष्ट्रीय परिट वधू वर परिचय.