शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

मी सक्षम आहे तर बदल का स्विकारु?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:16 IST

जळगाव : आजच्या २१ व्या शतकात एक गंभीर समस्या समाजाला भेडसावत आहे, ती म्हणजे तरुणांचे लग्न जुळणे अगदी कठीण ...

जळगाव : आजच्या २१ व्या शतकात एक गंभीर समस्या समाजाला भेडसावत आहे, ती म्हणजे तरुणांचे लग्न जुळणे अगदी कठीण झाले आहे. नशिबाने किंवा कर्तृत्वाने जुळलेच तर ते पुढे टिकविणे त्यापेक्षाही अवघड झालेले आहे. बदलती मानसिकता हे त्याचे मुख्य कारण असून त्यामुळेच समाजात घटस्फोटाचे प्रमाणही वाढल्याचे दिसून येत आहे.

गेल्या वर्षात पोलिसांच्या महिला सहाय्य कक्षात पती-पत्नीच्या वादाची तब्बल ८०४ प्रकरणे आली होती.

आजच्या परिस्थितीत मुली व मुले उच्च शिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत, त्यामुळे मी सक्षम आहे तर मी का म्हणून सहन करायचे ही मानसिकता मुलींमध्ये रुजत चालली आहे. त्याशिवाय पती असलेला मुलगा देखील मीच का बदल स्वीकारु, या भुमिकेत असतो. एकमेकांच्या अहंकारामुळे नातेवाईकांमध्ये देखील तणावाच्या घटना घडल्या आहेत. टीव्ही, मोबाईल, सोशल मीडियाचा अती वापर घातक ठरु लागला आहे. त्यामुळे पती-पत्नीत गैरसमज व संवाद कमी होत चालला आहे. पती-पत्नीत विचार पटत नसतील तर तात्काळ वेगळे होण्याचा घाईचा निर्णय घेतला जातो.

पालकांचा हस्तक्षेप घातक

मुलीला सासरी तिच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या, माहेरी लाडात होती, तेथेही लाडात असावी, तिला हवं तसं करता, वागता यावे ही मुलीच्या आईची इच्छा व त्यांचा हस्तक्षेप घटस्फोट व वादाला कारण ठरत आहे. दुसरीकडे लग्न झाल्यामुळे मुलगा आपल्यापासून दूर तर नाही ना जाणार या शंका व शक्यतेमुळे संसार व बारीकसारीक गोष्टीत मुलाच्या आई, वडिलांचाही हस्तक्षेप होत आहे. त्याशिवाय एकमेकांबाबत गैरसमज, संशय, व्यसन व दुसऱ्याला त्रासदायक असणाऱ्या सवयी यामुळे अनेक समस्या निर्माण होतात.

संसार टिकण्यासाठी काय करावे

पती-पत्नीने एकमेकांना दाद देणे, कौतूक करणे या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत, पटल्या नाहीत तर योग्य शब्दात मनमोकळेपणाने बोलले पाहिजे. तू माझ्या आई, वडिलांशी व्यवस्थित बोलली नाही म्हणून मी पण बोलणार नाही ही एकमेकांमधील स्पर्धा टाळली पाहिजे. मीच का बदलावे हा अंहकार न ठेवता नातेसंबंध सुधारण्यासाठी स्वत:मध्ये बदल करण्याची तयारी दाखवावी. अपेक्षेप्रमाणे जोडीदार मिळाला नाही तरी देखील किरकोळ मतभेद व दोषांसहित आपल्याला त्याला स्वीकारता येईल का याचा प्राधान्याने विचार केला पाहिजे.

पती-पत्नीच्या वादाचे ८०४ प्रकरणे

पोलीस दलातील महिला सहाय्य कक्ष पती-पत्नीतील वादावर तोडगा काढण्याचे मुख्य कार्य करते. या कक्षात २०२० मध्ये ८०४ पती-पत्नींच्या वादाची प्रकरणे आली होती, त्यात १८८ प्रकरणांमध्ये संसाराची वेल पुन्हा बहरण्यात मोलाची कामगिरी या कक्षाच्या पथकाने केली आहे. ३९८ प्रकरणे तारखेवर हजर न होण्यामुळे निकाली काढण्यात आली होती, अर्थात या प्रकरणात घटस्फोट झाला. तर उर्वरित प्रकरणात तडजोडीचे प्रयत्न सुरुच होते.

कोट...

कोणत्याही जोडप्यात वाद होताताच, पण ते किती ताणायचे हे आपल्या हातात असते. वाद न वाढवता तडजोडीची भूमिका स्विकारली तर वाद टोकाला जात नाही. आपल्याला हवे तसे कधीच मिळत नाही पण जे मिळाले ते मनापासून स्वीकारले तर कौटुंबिक नाते टिकवता येते.

-शंभू संतोष रोकडे, संचालक, राष्ट्रीय परिट वधू वर परिचय.