शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

मी सक्षम आहे तर बदल का स्विकारु?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:16 IST

जळगाव : आजच्या २१ व्या शतकात एक गंभीर समस्या समाजाला भेडसावत आहे, ती म्हणजे तरुणांचे लग्न जुळणे अगदी कठीण ...

जळगाव : आजच्या २१ व्या शतकात एक गंभीर समस्या समाजाला भेडसावत आहे, ती म्हणजे तरुणांचे लग्न जुळणे अगदी कठीण झाले आहे. नशिबाने किंवा कर्तृत्वाने जुळलेच तर ते पुढे टिकविणे त्यापेक्षाही अवघड झालेले आहे. बदलती मानसिकता हे त्याचे मुख्य कारण असून त्यामुळेच समाजात घटस्फोटाचे प्रमाणही वाढल्याचे दिसून येत आहे.

गेल्या वर्षात पोलिसांच्या महिला सहाय्य कक्षात पती-पत्नीच्या वादाची तब्बल ८०४ प्रकरणे आली होती.

आजच्या परिस्थितीत मुली व मुले उच्च शिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत, त्यामुळे मी सक्षम आहे तर मी का म्हणून सहन करायचे ही मानसिकता मुलींमध्ये रुजत चालली आहे. त्याशिवाय पती असलेला मुलगा देखील मीच का बदल स्वीकारु, या भुमिकेत असतो. एकमेकांच्या अहंकारामुळे नातेवाईकांमध्ये देखील तणावाच्या घटना घडल्या आहेत. टीव्ही, मोबाईल, सोशल मीडियाचा अती वापर घातक ठरु लागला आहे. त्यामुळे पती-पत्नीत गैरसमज व संवाद कमी होत चालला आहे. पती-पत्नीत विचार पटत नसतील तर तात्काळ वेगळे होण्याचा घाईचा निर्णय घेतला जातो.

पालकांचा हस्तक्षेप घातक

मुलीला सासरी तिच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या, माहेरी लाडात होती, तेथेही लाडात असावी, तिला हवं तसं करता, वागता यावे ही मुलीच्या आईची इच्छा व त्यांचा हस्तक्षेप घटस्फोट व वादाला कारण ठरत आहे. दुसरीकडे लग्न झाल्यामुळे मुलगा आपल्यापासून दूर तर नाही ना जाणार या शंका व शक्यतेमुळे संसार व बारीकसारीक गोष्टीत मुलाच्या आई, वडिलांचाही हस्तक्षेप होत आहे. त्याशिवाय एकमेकांबाबत गैरसमज, संशय, व्यसन व दुसऱ्याला त्रासदायक असणाऱ्या सवयी यामुळे अनेक समस्या निर्माण होतात.

संसार टिकण्यासाठी काय करावे

पती-पत्नीने एकमेकांना दाद देणे, कौतूक करणे या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत, पटल्या नाहीत तर योग्य शब्दात मनमोकळेपणाने बोलले पाहिजे. तू माझ्या आई, वडिलांशी व्यवस्थित बोलली नाही म्हणून मी पण बोलणार नाही ही एकमेकांमधील स्पर्धा टाळली पाहिजे. मीच का बदलावे हा अंहकार न ठेवता नातेसंबंध सुधारण्यासाठी स्वत:मध्ये बदल करण्याची तयारी दाखवावी. अपेक्षेप्रमाणे जोडीदार मिळाला नाही तरी देखील किरकोळ मतभेद व दोषांसहित आपल्याला त्याला स्वीकारता येईल का याचा प्राधान्याने विचार केला पाहिजे.

पती-पत्नीच्या वादाचे ८०४ प्रकरणे

पोलीस दलातील महिला सहाय्य कक्ष पती-पत्नीतील वादावर तोडगा काढण्याचे मुख्य कार्य करते. या कक्षात २०२० मध्ये ८०४ पती-पत्नींच्या वादाची प्रकरणे आली होती, त्यात १८८ प्रकरणांमध्ये संसाराची वेल पुन्हा बहरण्यात मोलाची कामगिरी या कक्षाच्या पथकाने केली आहे. ३९८ प्रकरणे तारखेवर हजर न होण्यामुळे निकाली काढण्यात आली होती, अर्थात या प्रकरणात घटस्फोट झाला. तर उर्वरित प्रकरणात तडजोडीचे प्रयत्न सुरुच होते.

कोट...

कोणत्याही जोडप्यात वाद होताताच, पण ते किती ताणायचे हे आपल्या हातात असते. वाद न वाढवता तडजोडीची भूमिका स्विकारली तर वाद टोकाला जात नाही. आपल्याला हवे तसे कधीच मिळत नाही पण जे मिळाले ते मनापासून स्वीकारले तर कौटुंबिक नाते टिकवता येते.

-शंभू संतोष रोकडे, संचालक, राष्ट्रीय परिट वधू वर परिचय.