शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

आता पाणीटंचाईचे खापर कुणाच्या डोक्यावर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:30 IST

नशिराबाद : वर्षानुवर्षापासून नशिराबादकरांना पाणीटंचाईच्या चटके बसत आहेत. १६ कोटींची पाणी योजनाही पाणी पातळी खालावल्याने कुचकामी ठरत असून, सध्या ...

नशिराबाद : वर्षानुवर्षापासून नशिराबादकरांना पाणीटंचाईच्या चटके बसत आहेत. १६ कोटींची पाणी योजनाही पाणी पातळी खालावल्याने कुचकामी ठरत असून, सध्या ६ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. याचे खापर कोणाच्या डोक्यावर फोडणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

आतापर्यंत मजीप्रा पाणीपुरवठा जलशुद्धीकरण योजना चालवत होती. त्यावेळी अनेकदा अडचणी येऊन शुद्ध पाणीपुरवठा झालाच नाही. त्यामुळे अनेकदा लोकप्रतिनिधींनी पाणीपुरवठ्यात येणाऱ्या विघ्नांचे खापर मजीप्रावर फोडले. नियोजनाचा अभाव व अपूर्ण यंत्रणेमुळे पाणी समस्या कायमच राहिली. मात्र, आता ग्रामपंचायतच्या हातात योजना आली आहे. तरीही शुद्ध पाणीपुरवठा गावकऱ्यांना का मिळत नाही, असा उपहासात्मक प्रश्न आता गावात चर्चिला जात आहे. आता पाणी मिळत नसल्याचे खापर कोणाच्या डोक्यावर, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

विकतचे पाणी...

टंचाईमुळे पाण्यासाठी हाल होत आहेत. अनेक जण जारचे विकतचे पाणी घेताना दिसत आहेत. सुमारे २० ते ३० रुपयांपर्यंत मिळत आहे. पाणी जारला वाढती मागणी आहे.

आरओ केंद्र बंद...वीज कापली

ग्रामस्थांना शुद्ध व थंड पाणी मिळावे याकरिता ग्रामपंचायतीने पाच रुपयांमध्ये शुद्ध पाण्याची व्यवस्था केली आहे. त्यातही ग्रामपंचायतीच्या आरोप्रणाली केंद्राचे वीज बिल थकल्यामुळे गावातील आरोप्रणाली केंद्र बंदावस्थेत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना अल्पदरात मिळणारे शुद्ध पाणीसुद्धा पुरविण्यात ग्रामपंचायत असमर्थ ठरली आहे. सुमारे १५ लाखांच्या घरात वीज थकबाकी बिल आहे.

भाग्य उजळणार कधी....

प्रत्येक निवडणुकीत पाणी प्रश्नाला प्राधान्य देऊ, असे आश्वासन देऊन मतांचा जोगवा मागण्यात येतो. निवडून आल्यावर आश्वासन विसरले जाते. पाणीटंचाई आणि नशिराबाद हे समीकरण बदलणार केव्हा? पाणीटंचाईची ओरड लक्षात घेता तात्काळ उपाययोजना व्हावी. अनेकदा पाणी समस्येबाबत आश्वासने मिळाली. मात्र, आजपर्यंत टंचाई कायम आहे. मतांचा जोगवा मागणाऱ्यांनो पाणी..... द्या अशी आर्त हाक ग्रामस्थ देत आहेत. आता तरी नशिराबादकरांचे भाग्य उजळणार का, हा प्रश्न चर्चिला जात आहे.