शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

कामचुकारांवर अंकुश ठेवणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 17:04 IST

जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळणे महत्वाचे

हितेंद्र काळुंखेजिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी नुकतीच भडगाव तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येथील आरोग्य उप केंद्रास अचानक भेट दिली असताना हे केंद्र बंद असलेले आढळले. ही पाहणी ग्रामस्थांच्या तक्रारीवरुन करण्यात आली होती. हे केंद्र महिन्यातून एकदाच उघडते अशी तक्रार ग्रामस्थांची आहे. या तक्रारीची दखल जि. प. अध्यक्षांनी घेतली ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे. एवढेच नाही तर इतर अनेक ठिकाणीही अचानक भेटी देवून पाहणी करण्याचे त्यांनी ठरवले आहे.दरम्यान ही जबाबदारी संबंधित आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची आहे, त्यांचाच मात्र वचक व नियंत्रण नसल्याने असा प्रकार समोर आला आहे, अशीच प्रतिक्रिया या निमित्ताने उमटत आहे. दरम्यान ही बाब केवळ एका ठिकाणची समोर आली आहे. मात्र जिल्ह्यात अनेक ठिकाणी ही परिस्थिती असू शकते. ग्रामीण भागातील जनतेला वैद्यकीय प्रश्नावर सर्वात मोठा आधार हा आरोग्य केंद्राचाच असतो. मात्र अनेक आरोग्य केंद्रांमध्ये कधी डॉक्टर हजर नसतात तर कधी हवी ती औषधी नसतात. कर्मचारी कमी असणे किंवा दांडीबहाद्दर आदी काहीही करणे असले तरी यामुळे ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होत असते. यास काही अपवादही आहेत. काही आरोग्य केंद्रांचे काम चांगलेही आहे. अशा आरोग्य केंद्रांचा आदर्श इतरांनी घेणे गरजेचे आहे, परंतु जे आपले कर्तव्य विसरत असलील अशांवर अंकुश कोण ठेवणार ? हा प्रश्न आहे.माणूस म्हटला की, काही चांगले आणि काही वाईट अशा दोन्ही प्रवृत्तीचे लोक आढळतात. यासाठीच चुकीच्या बाबींवर अशांवर नजर ठेवणे आवश्यक असते. मात्र ज्यांच्यावर ही जबाबदारी असते ते देखील आपली जबाबदारी पार पडत नसले तर इतरांना ते फावते. ही बाब लक्षात घेता चुकीच्या गोष्टींना आळा घालत जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळणे हेच महत्वाचे आहे.