शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

कामचुकारांवर अंकुश ठेवणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 17:04 IST

जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळणे महत्वाचे

हितेंद्र काळुंखेजिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी नुकतीच भडगाव तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येथील आरोग्य उप केंद्रास अचानक भेट दिली असताना हे केंद्र बंद असलेले आढळले. ही पाहणी ग्रामस्थांच्या तक्रारीवरुन करण्यात आली होती. हे केंद्र महिन्यातून एकदाच उघडते अशी तक्रार ग्रामस्थांची आहे. या तक्रारीची दखल जि. प. अध्यक्षांनी घेतली ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे. एवढेच नाही तर इतर अनेक ठिकाणीही अचानक भेटी देवून पाहणी करण्याचे त्यांनी ठरवले आहे.दरम्यान ही जबाबदारी संबंधित आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची आहे, त्यांचाच मात्र वचक व नियंत्रण नसल्याने असा प्रकार समोर आला आहे, अशीच प्रतिक्रिया या निमित्ताने उमटत आहे. दरम्यान ही बाब केवळ एका ठिकाणची समोर आली आहे. मात्र जिल्ह्यात अनेक ठिकाणी ही परिस्थिती असू शकते. ग्रामीण भागातील जनतेला वैद्यकीय प्रश्नावर सर्वात मोठा आधार हा आरोग्य केंद्राचाच असतो. मात्र अनेक आरोग्य केंद्रांमध्ये कधी डॉक्टर हजर नसतात तर कधी हवी ती औषधी नसतात. कर्मचारी कमी असणे किंवा दांडीबहाद्दर आदी काहीही करणे असले तरी यामुळे ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होत असते. यास काही अपवादही आहेत. काही आरोग्य केंद्रांचे काम चांगलेही आहे. अशा आरोग्य केंद्रांचा आदर्श इतरांनी घेणे गरजेचे आहे, परंतु जे आपले कर्तव्य विसरत असलील अशांवर अंकुश कोण ठेवणार ? हा प्रश्न आहे.माणूस म्हटला की, काही चांगले आणि काही वाईट अशा दोन्ही प्रवृत्तीचे लोक आढळतात. यासाठीच चुकीच्या बाबींवर अशांवर नजर ठेवणे आवश्यक असते. मात्र ज्यांच्यावर ही जबाबदारी असते ते देखील आपली जबाबदारी पार पडत नसले तर इतरांना ते फावते. ही बाब लक्षात घेता चुकीच्या गोष्टींना आळा घालत जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळणे हेच महत्वाचे आहे.