शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

सोयरसुतक कुणाला...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 17:07 IST

विश्लेषण

 सुशील देवकर

बाजारात कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांदा विक्रीतून उत्पादन खर्चदेखील निघत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करावी, कांद्याला अनुदान वाढवून द्यावे, या मागण्यांसाठी एरंडोल तालुक्यातील खर्ची परिसरातील कांदा उत्पादक शेतकºयांनी शुक्रवार, २५ रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘मोफत कांदे वाटप’ हे अभिनव आंदोलन केले. तब्बल ३ ट्रॅक्टर कांदा मोफत वाटप करण्यात आला. भाव मिळत नसल्याने उत्पादनखर्चही निघत नसल्याने वैतागलेला शेतकरी कांदा फुकट वाटून आंदोलन करीत असताना तो कांदा फुकटात मिळतोय, म्हणून घेण्यासाठी नागरिकांनी मात्र गर्दी केली होती. अगदी लोटालोटी करीत जास्तीत जास्त कांदा मिळेल, त्या पिशवीत, भांड्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न सुरू होता. हे चित्र पाहिल्यावर शहरातील नागरिकांना काबाडकष्ट करूनही नशिबी अवहेलना येणाºया शेतकºयाबद्दल, त्याच्या अडचणी, समस्या, वेदनांबद्दल काहीही सोयरसुतक नसल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. कांदा मिळताच विजयी मुद्रेने हे नागरिक आपल्या वाहनाकडे वळताना दिसत होते. नागरिकांच्या या मनोवृत्तीपेक्षा राजकारण्यांची मनोवृत्ती काही वेगळी आहे, असे नाही. त्यांनाही त्यांच्या राजकारणापेक्षा व मतांच्या गणितापेक्षा अधिक महत्वाचे काहीही नाही. त्यामुळेच शेतकºयांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. तर अधिकारी, प्रशासनाला शेतकºयांच्या आंदोलनाकडे लक्ष द्यायला, त्यांच्या उपोषणस्थळी जाऊन चर्चा करायलाही वेळ नाही, अशीच परिस्थिती आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ८ वेगवेगळे मंडप टाकून विविध समस्यांसाठी, मागण्यांसाठी नागरिकांनी, शेतकºयांनी उपोषण केल्याचे चित्र यंदा दिसून आले. मात्र तरीही प्रशासनाने अनास्था दाखविली. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भारत सार्वभौम झाल्याच्या दिवसाचा आनंद सगळीकडे साजरा होत असताना काही लोक मात्र स्वत:च्या हक्कासाठी, अन्यायावर दाद मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करीत बसून होते.कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे चळवळीतून पुढे आलेले असल्याने त्यांनी राष्टÑवादीच्या पदाधिकाºयांनी केलेले आवाहन सकारात्मकपणे घेत आकाशवाणी चौकापासून पायीच उपोषणकर्त्यांपर्यंत जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. केवळ दिखाऊपणा नव्हे तर तब्बल अर्धा तास त्यासाठी दिला. हे त्यातल्या त्यात दिलासादायक म्हणावे लागेल.