शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

या बेवारस वाहनांचा वाली कोण, मालक कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:16 IST

शुक्रवारी ‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर तीनचाकी व चारचाकी वाहने धूळखात पडलेली दिसून आली. यामध्ये नेरीनाकापासून ...

शुक्रवारी ‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर तीनचाकी व चारचाकी वाहने धूळखात पडलेली दिसून आली. यामध्ये नेरीनाकापासून ते अजिंठा चौफुलीपर्यंतच्या रस्त्याची दोन्ही बाजूने पाहणी केली असता, चार ते पाच बेवारस वाहने पडलेली दिसून आली. या वाहनांबाबत तेथील एका व्यावसायिकाने सांगितले की, गेल्या वर्षभरापासून ही वाहने या ठिकाणी पडलेली आहेत. ही वाहने दुरुस्तीसाठी आलेली नाहीत. या गाड्यांमध्ये मोठा बिघाड असल्यामुळे संबंधित वाहन मालकांनी घरासमोर लावण्यापेक्षा या ठिकाणी लावून जाणे पसंत केले आहे. मात्र, याचा त्रास येथील व्यावसायिकांना होत असल्याचे सांगण्यात आले.

तसेच महामार्गावरही खोटेनगर स्टॉपच्या पुढे एक बेवारस कार उभी असलेली दिसून आली. इतकेच नव्हे तर शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या महापालिकेच्या इमारती समोरच गेल्या सहा महिन्यांपासून एक निळ्या रंगाची कार उभी असल्याचे येथील व्यावसायिकांनी सांगितले. या कारबाबत मनपा प्रशासनाला माहिती देऊनही त्यांनी कार मालकावर अद्याप कारवाई केली नाही. ही कारदेखील उचलत नसल्याचे सांगण्यात आले. तर अशा बेवारस कारच्या माध्यमातून शहरात कुठला गैरप्रकार घडला तर, त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

मनपा इमारतीच्या खाली गोलाणी मार्केटसमोर गेल्या सहा महिन्यांपासून एक निळी कार उभी आहे. या कारबाबत मनपातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना दिली होती. मात्र, प्रशासनाने ही कार अद्याप उचललेली नाही. या कारमुळे इतर वाहन चालकांना वाहतुकीला अडसर होत आहे.

सुरेश पाटील, व्यावसायिक.

फुले मार्केटात एका दुकानासमोर गेल्या काही महिन्यांपासून एक दुचाकी पार्किंग करण्यात आली होती. तेथील व्यावसायिकही त्या गाडीला हात लावत नव्हते. शेवटी मी शहर पोलीस स्टेशनला माहिती दिल्यानंतर, त्यांनी ही दुचाकी पोलीस स्टेशनला जमा केली आहे.

लाला भावसार, व्यावसायिक.

नेरी नाकापासून ते थेट अजिंठा चौफुलापर्यंत अनेक ठिकाणी बेवारस वाहने उभी आहेत. यामुळे वाहतुकीला अडथळा ठरत आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने जरी येथील व्यावसायिकांची वाहने असली तरी, ती उचलून जप्त केली पाहिजेत. रस्त्यावर वाहने पार्किंग करण्याचा कुणालाही अधिकार नाही.

प्रताप पाटील, नागरिक.

पोलीस अधिकारी म्हणतात, कारवाईचे अधिकार मनपाला..

-शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या बेवारस वाहनांबाबत लोकमत प्रतिनिधीने शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देवीदास कुनगर यांना विचारले असता, त्यांनी आमचे काम वाहतूक सुरळीत करण्याचे आहे. ही कारवाई मनपानेच करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

- तसेच वाहतूक विभागातर्फेही रस्त्यात कुणी वाहन उभे केले, तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाईच सुरूच असते. तसेच रस्त्यांलगत उभे असलेली वाहने उचलण्यासाठी मनपाकडे आम्ही क्रेन मशीन मागितले होते. मात्र, मनपाने त्या वाहनात तांत्रिक बिघाड असल्याचे सांगितल्यामुळे काही महिन्यांपासून ही कारवाई झाली नसल्याचेही कुनगर यांनी सांगितले.