शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

मेहरुण तलावातील पाणी उपशावर नियंत्रण कुणाचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहराचे वैभव आणि ऐतिहासिक तलाव अशी नोंद असलेल्या मेहरुण तलावाचे पाणी सात ते आठ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहराचे वैभव आणि ऐतिहासिक तलाव अशी नोंद असलेल्या मेहरुण तलावाचे पाणी सात ते आठ फुटांनी कमी झाले आहे. मेहरुणचे पाणी शहरातील कोणत्याही सार्वजनिक कामांसाठी वापरले जात नाही. यंदा कडक उन्हाळा नाही. त्यामुळे एवढ्या पाण्याचे बाष्पीभवन नेमके झाले की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. परिसरातील रहिवाशांनी केलेल्या बोअरिंगमधून अमर्याद उपसा केल्याने तलावातील पाणीपातळी वेगाने कमी होत आहे. मात्र, या पाण्याच्या पातळीची नोंद सध्या कुणाकडेच नसल्याचे दिसून आले आहे.

भूजलाचे व्यवस्थापन करणाऱ्या वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाने ही बाब शहराच्या हद्दीत येत असल्याने, आमचा त्याच्याशी संबंध येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. मेहरुण तलाव हा जळगाव शहर महापालिकेच्या हद्दीत येतो. मात्र, त्याबाबत विचारणा केली असता, महापालिकेचे अभियंता अरविंद भोसले यांनीही संपूर्ण माहिती देण्यात असमर्थता दर्शविली. त्यामुळे या तलावाच्या पाण्याच्या पातळीकडे आणि आसपासच्या भागात होत असलेल्या बोअरिंगच्या उपशाकडे कुणाचेही लक्ष नसल्याचे समोर आले आहे.

राज्यातील भूजल अधिनियमानुसार नैसर्गिक जलस्रोतापासून १०० फूट अंतरापर्यंत बोअरिंग करता येत नाही. मात्र, हा नियम मेहरुण तलावाच्या आसपास पायदळी तुडविण्यात आला आहे. परिसरातील रहिवाशांनी या भागात अमर्याद पाणी उपसा केला आहे.

बोअरिंगच्या परवानगीचे काय?

महापालिकेचे अभियंता अरविंद भोसले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, गेल्या सात ते आठ महिन्यांत बोअरिंगसाठी कोणतेही प्रस्ताव आलेले नाहीत. कुणी बोअरिंगसाठी परवानगी घेतल्याचेही समोर आलेले नाही. मात्र, मेहरुण तलावाच्या भागात अंबरझरा पाटचारीला लागून असलेल्या रहिवासी भागात एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तेथे तलावाला लागूनच बोअरिंग खोदण्यात आली आहे. त्याशिवाय इतर ठिकाणी रहिवाशांनी बोअरिंग खोदून पाण्याचा अमर्याद उपसा केला आहे.

कोट - मेहरुण तलाव हा महापालिकेच्या हद्दीत येतो. त्यामुळे त्याच्या पाण्याच्या पातळीवरील नियंत्रण हे जळगाव शहर महापालिकेकडेच असते. आमचा विभाग हा भूजल पातळीशी संबंधित काम करतो.

- अनुपमा पाटील, वरिष्ठ भूवैज्ञानिक, जळगाव

कोट -

गेल्या काही दिवसांपासून तलावातील पाण्याची पातळी सातत्याने कमी होत आहे. परिसरातील नागरिक या पाण्याचा अमर्याद उपसा करत आहेत. त्यामुळे तलावातील पाणी कमी होते.

- विजयकुमार वाणी.