शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

मेहरुण तलावातील पाणी उपशावर नियंत्रण कुणाचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहराचे वैभव आणि ऐतिहासिक तलाव अशी नोंद असलेल्या मेहरुण तलावाचे पाणी सात ते आठ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहराचे वैभव आणि ऐतिहासिक तलाव अशी नोंद असलेल्या मेहरुण तलावाचे पाणी सात ते आठ फुटांनी कमी झाले आहे. मेहरुणचे पाणी शहरातील कोणत्याही सार्वजनिक कामांसाठी वापरले जात नाही. यंदा कडक उन्हाळा नाही. त्यामुळे एवढ्या पाण्याचे बाष्पीभवन नेमके झाले की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. परिसरातील रहिवाशांनी केलेल्या बोअरिंगमधून अमर्याद उपसा केल्याने तलावातील पाणीपातळी वेगाने कमी होत आहे. मात्र, या पाण्याच्या पातळीची नोंद सध्या कुणाकडेच नसल्याचे दिसून आले आहे.

भूजलाचे व्यवस्थापन करणाऱ्या वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाने ही बाब शहराच्या हद्दीत येत असल्याने, आमचा त्याच्याशी संबंध येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. मेहरुण तलाव हा जळगाव शहर महापालिकेच्या हद्दीत येतो. मात्र, त्याबाबत विचारणा केली असता, महापालिकेचे अभियंता अरविंद भोसले यांनीही संपूर्ण माहिती देण्यात असमर्थता दर्शविली. त्यामुळे या तलावाच्या पाण्याच्या पातळीकडे आणि आसपासच्या भागात होत असलेल्या बोअरिंगच्या उपशाकडे कुणाचेही लक्ष नसल्याचे समोर आले आहे.

राज्यातील भूजल अधिनियमानुसार नैसर्गिक जलस्रोतापासून १०० फूट अंतरापर्यंत बोअरिंग करता येत नाही. मात्र, हा नियम मेहरुण तलावाच्या आसपास पायदळी तुडविण्यात आला आहे. परिसरातील रहिवाशांनी या भागात अमर्याद पाणी उपसा केला आहे.

बोअरिंगच्या परवानगीचे काय?

महापालिकेचे अभियंता अरविंद भोसले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, गेल्या सात ते आठ महिन्यांत बोअरिंगसाठी कोणतेही प्रस्ताव आलेले नाहीत. कुणी बोअरिंगसाठी परवानगी घेतल्याचेही समोर आलेले नाही. मात्र, मेहरुण तलावाच्या भागात अंबरझरा पाटचारीला लागून असलेल्या रहिवासी भागात एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तेथे तलावाला लागूनच बोअरिंग खोदण्यात आली आहे. त्याशिवाय इतर ठिकाणी रहिवाशांनी बोअरिंग खोदून पाण्याचा अमर्याद उपसा केला आहे.

कोट - मेहरुण तलाव हा महापालिकेच्या हद्दीत येतो. त्यामुळे त्याच्या पाण्याच्या पातळीवरील नियंत्रण हे जळगाव शहर महापालिकेकडेच असते. आमचा विभाग हा भूजल पातळीशी संबंधित काम करतो.

- अनुपमा पाटील, वरिष्ठ भूवैज्ञानिक, जळगाव

कोट -

गेल्या काही दिवसांपासून तलावातील पाण्याची पातळी सातत्याने कमी होत आहे. परिसरातील नागरिक या पाण्याचा अमर्याद उपसा करत आहेत. त्यामुळे तलावातील पाणी कमी होते.

- विजयकुमार वाणी.