शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

शेतकऱ्यांचा वाली कोण...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 19:02 IST

महसूल वार्तापत्र- सुशील देवकर

हमीभावाच्या विषयावरून मार्केट कमिटीतील व्यापाºयांनी उगारलेले बंदचे हत्यार, पीक विम्याचा लाभ देण्यास विमा कंपन्यांकडून टाळाटाळ, त्याबाबत माहिती भरण्यास बँकांची टाळाटाळ, तर याची गांभीर्याने दखल घेण्यास सरकार व लोकप्रतिनिधींची टाळाटाळ यामुळे शेतकºयांचा वाली कोणे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील ७३ हजार शेतकºयांनी पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई मिळेल, या आशेने शासनाच्या आदेशानुसारच पीक विमा काढला. त्यासाठी हप्त्याची रक्कम वेळेवर भरली. जे कर्जदार होते. त्यांची तर हप्त्याची रक्कम कर्जाच्या रक्कमेतूनच कपात करून घेण्यात आली. त्यानंतर बँकेने ती विमा हप्त्याची रक्कम विमा कंपनीकडे भरली. मात्र सर्व शेतकºयांची माहिती मात्र अपलोड झाली नाही. वर्ष संपत आले. तेव्हा नुकसान भरपाईचा लाभ मिळण्यासाठी शेतकरी जिल्हा बँकेत गेले. मात्र त्यांना आमचा संबंध नाही, विमा कंपनीकडे जा, असे सुनावण्यात आले. मात्र विमा कंपनीकडे पाठपुरावा केल्यावर यातील १७ हजार शेतकºयांची माहितीच बँकेने अपलोड केलेली नसल्याचा आरोप विमा कंपनीने केला. विमा कंपनीने मात्र त्या १७ हजार शेतकºयांची विम्याच्या हप्त्याची रक्कम वर्षभर वापरली. त्यामुळेच जिल्हा बँकेने विमा कंपनीवर फिर्याद ठोकून जबाबदारी ढकलली. मात्र ज्यावेळी शेतकरी जिल्हा बँकेकडे विचारणा करीत होते, तेव्हाच जिल्हा बँकेने १७ हजार शेतकºयांची माहिती अपलोड झालेली नाही. त्यात तांत्रीक अडचणी आल्या व त्याची तक्रार वारंवार करूनही विमा कंपनी दखल घेत नसल्याचे शेतकºयांना का स्पष्टपणे सांगितले नाही. जिल्हाधिकाºयांकडील आढावा बैठकीत यावर चर्चा झाल्यावर विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी ही बाब निदशर््ानास आणली. अन्यथा पिक विम्याचा लाभ न मिळाल्याचे दु:ख करीत शेतकरी गप्प बसले असते तर त्यांची रक्कम बुडाली असती. अद्यापही १६ हजार शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित आहेत. आता माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी या शेतकºयांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. मात्र माहिती अपलोड होत नसताना, त्याबाबत काहीही हालचाल न करता शांत बसणाºया जिल्हा बँकेच्या अधिकाºयांना जाब विचारणार का? असा सवाल आहे.