शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
3
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
4
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
5
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
6
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
7
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
8
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
9
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
10
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
11
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
12
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
13
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
14
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
15
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
16
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
17
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
18
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
19
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
20
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका

हाक मारी जीव कुणाला...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 00:58 IST

धरणगाव येथे बालकवींच्या स्मारकाची आजची स्थिती

धरणगाव, जि.जळगाव :काय पाहिजे मिळवायला ?कुणीकडे हा झुकतो वाराहाक मारी जीव कुणाला ...?बालकवींच्या ‘उदासीनता’ या कवितेतील काव्यपंक्ती त्यांच्या जीवनातील उग्दिन्नता, दु:ख स्पष्ट करतात. त्यांच्या जीवनात आलेली उदासिनता त्यांच्या साकारल्या जाणाऱ्या स्मारकाबद्दल ही त्यांना व साहित्यिकांना शासनाच्या धोरणामुळे आलेली दिसते.बालकवींनी ज्या भूमीत जन्म घेतला त्या भूमित साकारले जाणारे स्मारक गेल्या पाच-सहा वर्षापासून अर्धवट अवस्थेत निधी अभावी रखडले आहे. माजी पालकमंत्र्यांनी मुहूर्तमेंढ रोवलेल्या या स्मारकाचे काम सहकार राज्यमंत्र्यांनी तडीस न्यावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.१३ आॅगस्ट १८९० मध्ये धरणगावला जन्मलेल्या बालकवींची काव्या प्रतिभा याच भूमित फुलली.त्यांच्या पारवा, औदुंबर, श्रावणमासी, आदी कवितामधील शब्दरूपाचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य साहित्यिक व साहित्यप्रेमींना आजही लाभते औदुंबर कवितेतील औदुंबर आज कोलमोडलेला असला तरी काळा डोह ब्राम्हण तलाव, निसर्ग सौंदर्य आजही श्रावण मासात अनुभवायला मिळते.स्मारकाचे अर्धवट काम...साहित्य कला मंच या संस्थेच्या पाठपुराव्यामुळे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी सन २०१०-११ मध्ये बालकवींच्या स्मारकाची मुहूर्तमेढ रोवली. दोन एकर गावठाण जागेत बालकवींचे स्मारक उभारण्याचे काम त्यांनी हाती घेतले.स्मारकाच्या सरक्षक भिंतीसाठी ५५ लाख निधी जिल्हा नियोजन मंडळातर्फे मंजूर संरक्षक भिंत व भव्य प्रवेशद्वार उभारले. दुर्देवाने पुढचे काम निधीअभावी रखडले आहे.५ कोटी ८० लाखांचा प्रस्ताव प्रलंबितस्मारकाचा संरक्षक भिंत व प्रवेशद्वाराच्या नंतर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने स्मारकाचा आराखडा तयार करून सन २०१२-१३ मध्ये पुढील कामासाठी ५ कोटी ८० लाखांचा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडे पाठविला आहे. मात्र या प्रस्तावाची दखल अद्याप घेतली गेलेली नाही. त्यामुळे बालकवींचे स्मारकाचे काम रखडले आहे.स्मारक होणार साहित्यिकांची पंढरीनिसर्ग कवी बालकवी उर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे स्मारक साकारले गेल्यास हे स्मारक साहित्यिकांची ‘पंढरी’ म्हणून नावारूपाला येईल. येथे विविध साहित्यिक उपक्रम राबविले जातील. स्मारक झाल्याशिवाय कवितांची कार्यशाळा, बालकवी साहित्य संशोधन केंद्र, आदी उपक्रम सुरू होणार नाही. तसेच कोलमडलेला ‘औंदुबर’ या स्मारकाच्या ठिकाणी नव्याने उभारण्याची संधी मिळणार आहे.

टॅग्स :literatureसाहित्यDharangaonधरणगाव