शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कुजबूज प्रादेशिककडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:12 IST

एखाद्या म्हणीप्रमाणे घटना घडली की, तिचे महत्त्व कालातीत होऊन जाते. कोरोना काळात जीवावर उदार होऊन अल्प मानधनावर काम करणाऱ्या ...

एखाद्या म्हणीप्रमाणे घटना घडली की, तिचे महत्त्व कालातीत होऊन जाते. कोरोना काळात जीवावर उदार होऊन अल्प मानधनावर काम करणाऱ्या शेकडो आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांना शुक्रवारी कार्यमुक्त केले गेले. जिल्हाभरात प्रत्येक कोरोना उपचार केंद्र आणि विलगीकरण कक्षात गेल्या दीड वर्षापासून हे कर्मचारी सेवा देत आहे. खरं म्हणजे कोरोनाचे संक्रमण अजूनही कमी झालेले नाही. दुसरी लाट तीव्र असून तिसरी लाट येणार असल्याचे सूतोवाच केले जात आहे. अशा आणीबाणीच्यावेळी आहे ते कर्मचारी कमी करणे. कितपत योग्य आहे? हा प्रश्न उपस्थित होणे वस्तुस्थितीला धरून आहे. गेल्या दीड वर्षापासून आरोग्यसेवेच्या माध्यमातून या तरुण कर्मचाऱ्यांना रोजगार मिळाल्याने त्यांना हायसे वाटले होते. शुक्रवारी कार्यमुक्तीचे आदेश हातात पडल्यावर त्यांचे डोळे भरून आले. आता पुढे आमचे काय? असा प्रश्न ते समाजमनाला विचारू लागले आहे. कोरोना महामारीत रक्ताचे नातेवाईक कोरोनाबाधितापासून पळ काढत असतांना याआरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांचे सगेसोयरे होत सेवा केली. एकट्या चाळीसगावला अशा ३९ कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट ओढावले आहे. शुक्रवारीच या कर्मचाऱ्यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयाचा उंबरा गाठून आपली व्यथा मांडली. यावेळी चव्हाण यांनी त्यांना धीर देत हा प्रश्न थेट आरोग्यमंत्र्यांसमोर मांडण्याचे आश्वासित केले. तर गरज सरो अन् वैद्य मरो. अशीच स्थिती मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर कोसळली आहे. काही जिल्ह्यांमध्ये अजूनही असे कर्मचारी सेवेत आहेत. मग जळगाव जिल्ह्यात त्यांना इतक्या घाईने कार्यमुक्त का केले जात आहे ? असा सूर देखील शनिवारी दिवसभर सोशल मीडियावरही उमटला. या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्याो, अशी मागणी विविध संघटनांकडूनही होत आहे. 'गरज सरो तरीही वैद्य जिवंत राहो...' असा दिलासा याकर्मचाऱ्यांना मिळायला हवा. हीच त्यांची छोटीशी अपेक्षा आहे.

-जिजाबराव वाघ, चाळीसगाव