शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
4
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
5
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
6
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
7
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
8
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
9
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
11
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
12
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
13
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
14
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
15
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
16
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
17
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
18
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
19
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
20
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?

..बीती हुई कुछ (फिल्मी) यादें !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 12:36 IST

ज्याने हा (गीतांचा) सुरेखसा गजरा गुंफाला होता. मी निमित्तमात्र.’

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 19 - जळगाव येथील व. वा. वाचनालयाच्या 140व्या वर्धापन दिनानिमित्त व.वा. व कै. रामलालाजी चौबे मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’ कार्यक्रमाने खरंच मजा आली अन् मला ‘बिनाका गीतमाला’वाले अमीन सयानी आठवले. एका भेटीत ते मला म्हणाले होते, ‘‘बिनाका गीतमालेचं सारं श्रेय ‘त्या’ सुंदर गाण्यांना, त्या गीतकार- संगीतकार- गायकांना व त्या पांढ:या पडद्याला आहे. ज्याने हा (गीतांचा) सुरेखसा गजरा गुंफाला होता. मी निमित्तमात्र.’ बोलता- बोलता अमीन सयानी असंही म्हणाले होते की, ज्या विविध संगीतमय कार्यक्रमांनी त्या वेळच्या ‘किशोर अवस्थेतील मुलामुलींसह सर्वाची मनं जिंकली, ती गोष्टदेखील तेवढीच महत्त्वाची ठरते.’ नेमकी हीच गोष्ट निवेदक राहुल सोलापूरकर यांनीही सांगितली. ते म्हणाले, ‘1960 नंतर हिंदी चित्रपट सृष्टीतील चित्रपट गीतांचे एक सुवर्णयुग संपले. असे जरी म्हटलं जात असले तरी ‘त्या’ युगाची सुरुवात केव्हा झाली, संपली हे सांगणं तसं कठीण. पण 1945-48 ते 1970 र्पयत पांढ:या पडद्याने जी एकसे बढकर एक गाणी दिली, ती मात्र न विसरता येण्याजोगी!’ -‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’चा विषय सुरू आहे म्हणून एक किस्सा सांगतो. गायक रफी गेल्यानंतर 83-84 मध्ये मी मित्रासमवेत शम्मी कपूरला भेटलो होतो. तेव्हा ‘रफीमय’ शम्मी म्हणाला होता- ‘माङो सिनेमे व गाणी याचं अतूट नातं. आमचा चेहरा पाहत तुम्ही खूश होत होतात, स्वप्नं पाहत होतात, पण खरी स्वप्नं सजवली, फुलवली ती दिग्दर्शक, गायक-गायिका व संगीतकार, गीतकार यांनी. आहो, गीतकारांनी त्या वीसएक वर्षात जी गाणी लिहिली, ती गाणी नव्हती, एक मधूर काव्य होतं. ‘तुमसे अच्छा कौन है’ हे रफीचं गाणं ऐकवत शेवटी शम्मीएवढंच म्हणाला होता- ‘तुम्ही आम्ही नाही विसरू शकत हा काळ- मरेर्पयत!’ ज्या गायकाचा प्रभाव रफी, मुकेश, किशोरकुमारसह कित्येक गायकांवर होता त्या स्वरांच्या जादूगारापासून म्हणजेच कुंदनलाल, सैगलपासून ‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’ची सुरुवात होते व पुढे ती पृथ्वीराज कपूर, अशोककुमार, दिलीपकुमार, राजकपूर, देवआनंद, राजेंद्रकुमार, राजकुमार इत्यादीर्पयत येऊन पोहोचते. एकूणच कार्यक्रम टाळ्या मिळविणारा होता. ज्यासाठी व. वा. टीमचे, चौबे परिवाराचे अभिनंदन.‘जागे हैं देर तक हमें कुछ देर सोने दो, थोडी सी रात और है सुबह तो होने दो, आधे अधुरे ख्वाब जो पुरे ना हो सके, एकबार फिर से नींद में वो ख्वाब बोने दो’ गीतकार गुलझार यांच्या या सुंदरशा ओळींचा आधार घेत सांगायचं तर गेल्या पंधरवडय़ात जळगावात झालेल्या ‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’ (सूत्रधार- राहुल सोलापूरकर) कार्यक्रमाने सर्व कानसेनांना खरंच तृप्त केलं. नव्हे ‘त्या’ ब्लॅक अॅण्ड व्हाईटच्या जमान्यात नेत धुंद केलं, भिजवून टाकलं. घरी परतताना कित्येक हिंदी (जमाना 1948-1968) गीतांना आठवायला, आळवायला भाग पाडलं.-संकल्पना- दिग्दर्शन मिलिंद ओक, संहिता प्रवीण जोशी, सूत्रधार- राहुल सोलापूरकर व गायक- जितेंद्र अभ्यंकर, चैतन्य कुलकर्णी, गायिका- स्वरदा गोखले, अवंतिका पांडे या ‘टीम’ने ज्या तयारीने ‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’ कार्यक्रम उत्तरोत्तर रंगवत नेला तो ‘वाह! वा! क्या बात है!’ असाच होता.- चंद्रकांत भंडारी