शहरं
Join us  
Trending Stories
1
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
3
सॅलरी कमी होणार, PF-ग्रॅच्युईटीमध्ये वाढ होणार? नोकरी करणाऱ्या लोकांसाठी अनेक गोष्टी बदलणार
4
Video - "मी तुम्हाला आणि तुमच्या मुलीला मारून टाकेन"; प्रिन्सिपलची जीवे मारण्याची धमकी
5
‘या’ सरकारी बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या शर्यतीत दिग्गज बँक; अनेक दिवसांपासून सुरू आहे खासगीकरणाचा विचार
6
उपराष्ट्रपतीपद सोडल्यावर जगदीप धनखड पहिल्यांदाच बोलले, म्हणाले मला बोलायला...
7
Smriti Mandhana Haldi Ceremony : टीम इंडियाच्या 'राणी'च्या हळदी समारंभात संघातील साऱ्याजणींचा झिंगाट डान्स
8
ऑपरेशन सिंदूरनंतर काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हालचालींना वेग; महत्त्वाची माहिती उघड...
9
दिल्लीत पाकिस्तानातून पाठवलेला शस्त्रांचा साठा जप्त; लॉरेन्स टोळीसह कुख्यात गुंडांना हत्यार पुरवणार होते
10
हृदयस्पर्शी! मेकअपला जाताना वधूचा अपघात; नवरदेवाने रुग्णालयातच केलं लग्न, घातलं मंगळसूत्र
11
"लोकशाही पायदळी तुडवून धमकावून राज्यात निवडणुका बिनविरोध होत आहेत", काँग्रेसची टीका
12
Delhi Blast : डॉक्टर गायब, सोशल मीडिया अकाउंट डिलीट; अल-फलाह युनिव्हर्सिटीबाबत धक्कादायक खुलासे
13
"तुम्ही काट मारली, तर मी पण काट मारणार"; अजित पवारांनी माळेगावकरांना दाखवली अर्थमंत्रालयाची ताकद
14
लग्नाच्या दिवशी वधूचा अपघात, डॉक्टरांच्या साक्षीने हॉस्पिटलमध्येच नवरदेवाने बांधली लग्नगाठ  
15
IND vs SA : 'आत्मनिर्भर' बुमराह! मार्करमला बोल्ड केल्यावर KL राहुलसोबतचं सेलिब्रेशन ठरलं खास (VIDEO)
16
हृदयद्रावक! यूट्यूबवर एअर शोचा Video पाहत होते विंग कमांडरचे वडील, मिळाली लेकाच्या मृत्यूची माहिती
17
'ईठा'च्या शूटवेळी श्रद्धा कपूरला दुखापत, शूटिंग थांबलं; तमाशा सम्राज्ञी विठाबाईंच्या भूमिकेत दिसणार
18
पायलटचे नियंत्रण सुटले की ब्लॅकआउटमुळे अपघात झाला? संरक्षण तज्ञांनी तेजस अपघाताचे कारण सांगितले
19
Multibagger Stock: पैसाच पैसा! ₹२८ च्या शेअरनं केलं मालामाल; ५ वर्षात दिला ५६,०००% पर्यंतचा तुफान रिटर्न
20
५ वेळा डावलले, तरी 'एकनिष्ठ'; तिकीट न मिळाल्याने BJP च्या कार्यकर्त्याची बॅनरबाजी; सत्तेचा लोभ नसल्याचा दिला संदेश
Daily Top 2Weekly Top 5

मंडप व्यवसायाला घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 19:38 IST

लॉकडाऊनमुळे मंडप व्यवसायाला घरघर लागली आहे. अनेकांचा रोजगार बुडाला आहे.

ठळक मुद्देकोरोना इफेक्टलॉकडाऊनमुळे लग्नसराई बंदचा फटका सरकारकडून मदतीची अपेक्षा

विनायक वाडेकर ।मुक्ताईनगर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मार्च महिन्यापासूनच लागलेल्या लॉकडाऊनमुळे मुक्ताईनगर तालुक्यातील मंडप व्यवसायाला अक्षरश: घरघर लागली आहे. पाच ते सात कोटी रुपयांपर्यंत होणारा व्यवहार यावर्षी झालाच नाही. त्यामुळे मंडप व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.२२ मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर विविध व्यवसायिकांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले आहे. त्यामध्ये मंडप व्यवसायाचेदेखील फार मोठे नुकसान झाले आहे.दरवर्षी मार्च एप्रिल मे व जून महिन्याच्या २० तारखेपर्यंत मोठ्या प्रमाणात विवाह होतात. विशेष म्हणजे तालुक्यातील ७९ गावांमध्ये किमान ३०० ते ४०० लग्नसमारंभ दरवर्षी होतात. त्यामुळे विविध व्यवसायांसोबतच मंडप व्यवसायाचीही चलती असते. पूर्ण वर्षभराचा व्यवहार फेब्रुवारी ते जून या पाच महिन्यांच्या कालावधीत मंडप व्यवसायांचा पूर्ण होतो. २२ मार्चपासून देशात लॉकडाऊन झाल्यापासून विवाह समारंभ नियमानुसार बंदी आणण्यात आली. मे महिन्याच्या मध्यंतरी ५० लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळे पार पडतील, अशी नियमावली नवीन नियमानुसार करण्यात आली. या नियमांमुळे मात्र अक्षरश: विवाह सोहळा बंद पडले. सुरुवातीच्या मार्च, एप्रिल व मे महिन्यात एकही लग्न समारंभ झाला नाही. जे लग्न झाले ते अतिशय कौटुंबिक वातावरणात शेतात किंवा एखाद्या छोट्याशा खोलीमध्ये ठराविक आठ ते दहा लोकांच्या उपस्थितीत विवाहसमारंभ झाले. मे महिन्याच्या मध्यापासून तिसऱ्या लॉकडाऊननंतर लग्नसमारंभासाठी ५० जणांची परवानगी देण्यात आले आणि विशेष म्हणजे यावर्षी दिवाळीनंतर १८ तारखेपासूनच विवाह तिथी सुरू झालेल्या होत्या. याचा विपरित परिणाम मात्र मंडप व्यवसायावर फार मोठा पडला. मुक्ताईनगर तालुक्यात जवळपास ७० मोठे मंडप व्यावसायिक तर दीडशेच्या आसपास लहान व्यावसायिक हे मंडप व्यवसाय करतात.मंडप व्यवसायामध्ये स्टेज, डेकोरेशन, साध्या पट्ट्या, रंगीत पट्ट्या, त्याचसोबत गेट, अत्तरदाणी, गाद्या यासारख्या विविध सोयी-सुविधा पुरवल्या जातात. यावर्षी मात्र एकही मोठा लग्न सोहळा न झाल्याने अक्षरश: या व्यावसायिकांची घरघर लागली. दरवर्षी एक व्यवसायिक किमान सात ते दहा लाख रुपयांचा व्यवहार केवळ या तीन महिन्यात करत असतो. मात्र यावर्षी अतिशय किरकोळ प्रमाणात लग्न समारंभ तेही ४०-५० वºहाडींंच्या उपस्थितीत झाल्याने केवळ एक किंवा दोन पट्टीवर आणि विना स्टेजचे लग्न लागले. त्यामुळे मंडप व्यावसायिक ज्या लग्नसमारंभासाठी किमान ८० हजार व एक लाख रुपयांपर्यंत व्यवहार करत होते तो व्यवहार केवळ दोन ते पाच हजार रुपयांच्या आत येऊन ठेपला. यामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील जवळपास दीडशे मंडप व्यावसायिकांचे किमान सात ते आठ कोटी रुपयांचे एका वर्षाचे नुकसान झाले आहे.मंडप व्यावसायिक म्हणतात...यावर्षी मी लग्न समारंभासाठी १५ लाख रुपये खर्च करून स्टेज व नवीन साहित्य घेतले होते. परंतु लॉकडाऊनमुळे विवाह समारंभच न होत नाहीत. सर्व पैसा अंगावर पडला आहे व उपासमारीची वेळ आली आहे.-चंद्रकांत माळी, रा.पिंपरी अकाराउतदरवर्षी तीन-साडेतीन महिन्यांच्या कालावधीत पूर्ण वर्षभराचा आमचा व्यवहार होतो. मजुरांचे पगार तसेच उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यावर सुटतो. मात्र यावर्षी लॉकडाऊनमुळे कोणताही व्यवसाय झाला नाही. परिणामी आमच्यावर दुर्दैवी प्रसंग आला आहे. मंडप व्यावसायिकांसाठी शासनाने काही तरी आर्थिक मदत करावी. -गणेश कपल, रा.मुक्ताईनगरएक वर्षाचा व्यवहार हा केवळ तीन महिन्यांत होतो. मात्र यावर्षी संपूर्ण व्यवहार ठप्प पडल्याने आर्थिक गणिते बिघडली असून, यापूर्वी घेतलेली कर्जे फेडणेदेखील मुश्कील झाले आहे. शासनाने मंडप व्यावसायिकांना मदत केली पाहिजे.-विजय दवंगे, रा.अंतुर्ली

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuktainagarमुक्ताईनगर