शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

निवडणुकीवेळची राजकीय एकी आता कुठे गेली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:13 IST

थकबाकीमुळे गावातील पथदिवे बंद आहेत. आरओ प्रणालीचे शुद्ध पाणी हे दीड महिन्यापासून बंद आहे. सीसीटीव्ही कॅमेरे शो पीस बनले ...

थकबाकीमुळे गावातील पथदिवे बंद आहेत. आरओ प्रणालीचे शुद्ध पाणी हे दीड महिन्यापासून बंद आहे. सीसीटीव्ही कॅमेरे शो पीस बनले आहेत. अशा विविध समस्या निर्माण झालेल्या असताना गावातील सर्वपक्षीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधींना आज एकत्रित येऊन ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी वज्रमुठीची खरी गरज आहे. मात्र त्याबाबत शांतताच दिसत असल्याने गावकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आता पुढाकार कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. लोकप्रतिनिधींनी वज्रमूठ बांधली नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे सर्वत्र खिल्ली उडत आहे.

जिल्ह्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून नशिराबादचा लौकिक आहे. येथील नगरपंचायतीची उद्घोषणा झाल्यामुळे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पुन:पुन्हा निवडणुकीचा खर्च नको यासाठी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून माघार घेण्यासाठी तब्बल ८२ पैकी ८१ जणांनी सामूहिक माघारीची वज्रमुठ बांधून राजकीय एकतेचे दर्शन घडविले होते. ग्रामविकासासाठी ही वज्रमूठ कायम असेल असा निर्धार त्यावेळी व्यक्त करण्यात आला होता. मात्र आज गावांमध्ये अनेक समस्या आ वासून उभ्या असतानाही कोणी दखल का घेत नाही, याची चर्चा आता गावात सुरू आहे. त्या निर्धाराचा सर्वांनाच विसर पडला की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.