शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या नऊ हजार विद्यार्थ्यांनी जायचे कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:11 IST

सागर दुबे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जळगाव जिल्ह्यातील अकरावीची प्रवेश क्षमता ४९ हजार ८० इतकी असून यंदा दहावीच्या ...

सागर दुबे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील अकरावीची प्रवेश क्षमता ४९ हजार ८० इतकी असून यंदा दहावीच्या परीक्षेत ५८ हजार २४९ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता यंदा जवळपास ९ हजार १६९ विद्यार्थ्यांंच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. शासनाच्या धोरणानुसार अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावयाची आहे. परंतु, प्रवेशाचा पेच पाहता, या परीक्षेत सुध्दा रस्सीखेच पहायला मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात जिल्ह्याचा निकाल ९९.९४ टक्के लागला लागला असून यंदा परीक्षेसाठी जिल्हाभरातून ५८ हजार २७९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ५८ हजार २४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील अनुदानित, विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित अशा एकूण २१८ महाविद्यालयांमध्ये ४९ हजार ०८० अकरावीची प्रवेश क्षमता आहे. प्रवेश क्षमतेपेक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या अधिक असल्यामुळे आता विद्यार्थ्यांसमोर प्रवेशाचा पेच निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, सीईटी परीक्षा उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रमाने प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे यात सुध्दा अधिक गुण मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची स्पर्धा दिसणार आहे.

सीईटीची वेबसाईट हँग

अकरावी प्रवेशासाठी २१ ऑगस्ट पासून सीईटी परीक्षा घेण्यात येणार होती. या परीक्षेसाठी आवेदन पत्र मागविण्यात येत आहेत. या प्रक्रियेला २० जुलैपासून सुरूवात झाली. हे मात्र, खरे असले तरी २१ जुलै रोजी सीईटीची वेबसाईट हँग झाली आणि ती तूर्त बंद करण्यात आली आहे. दरम्यान, वेबसाईट पूर्ववत झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कळविण्यात येणार असून पुरेसा कालावधी अर्ज करण्यासाठी देण्यात येणार आहे.

- दहावी उत्तीर्णांची संख्या : ५८,२४९

- अकरावी प्रवेक्ष क्षमता : ४९,०८०

- कला : २४,३२०

- विज्ञान : १७,२००

- वाणिज्य : ५,४२०

- संयुक्त : २,२००

कुठलाही ताण न घेता परीक्षा द्यावी....

सीईटी परीक्षा ही शंभर गुणांची असेल. त्यात गणित, विज्ञान, समाजशास्त्र, इंग्रजी या चार विषयांचे प्रत्येकी २५ गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वेगळी तयारी करण्याची आवश्यकता नाही. केवळ दहावीत जो अभ्यास केला आहे, त्याची उजळणी विद्यार्थ्यांना करायची आहे. कुठलाही प्रकारचा मानसिक ताण न घेता परीक्षेला सामोरे जायचे आहे, अशी प्रतिक्रिया शिक्षण तज्ज्ञ राजेंद्र वाघुळदे यांनी दिली.

आयटीआय, पॉलिटेक्निकचा पर्याय

दहावीनंतर विद्यार्थ्यांना विविध व्याससायिक अभ्यासक्रमांना प्रवेशाची संधी असते. आयटीआय, पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांना दरवर्षी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी प्रवेश घेतात. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांना आवडीच्या व्यवसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहे. तसेच आयटीआय व पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया प्रारंभ झाली आहे.