शहरं
Join us  
Trending Stories
1
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!
2
सांगवीत भररस्त्यात गोळ्या झाडून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून 
3
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
4
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
5
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
6
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
7
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
8
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
9
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर
10
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
11
मनातून मनुस्मृती जाळणं गरजेचं; 'ती' चूक होताच प्रकाश आंबेडकर आव्हाडांवर संतापले!
12
T20 World Cup च्या तोंडावर ICC कडून पाकिस्तानी खेळाडूंना खुशखबर; 'सूर्या'चा दबदबा कायम
13
रतन टाटांचा एक आदेश अन् 'ताज हॉटेल'मध्ये भटका कुत्रा निवांत झोप घेतो तेव्हा...
14
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
15
Fact Check: पाकिस्तानला ५ हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा राहुल गांधींनी केलेलीच नाही; 'तो' मेसेज खोटा
16
₹3 चा स्टॉक असलेली कंपनी 20 फ्री शेअर वाटणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणार! LIC कडे 97 लाख शेअर
17
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
18
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
19
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा
20
दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे

मेरे सपनों की रानी कब आयेगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 2:11 AM

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘चहा’ या सदरात डॉ.अलका शशांक कुलकर्णी यांचा लेख ‘मेरे सपनो की रानी कब आयेगी?’

वळणा-वळणांचा घाट रस्ता. तिरकी टोपी घातलेला तरणाबांड नायक उघडय़ा जीपमधे मित्राबरोबर ‘मेरे सपनों की रानी.. हे गाणे म्हणतोय. नायिका इटुकल्या पिटुकल्या खेळण्यांच्या आगगाडीत बसून त्याच्याकडे बघत आपली उगीचच लाजतेय. आठवलं गाणं आणि तो सिनेमा? पर्यटकांना आकर्षित करणारी ही रोमॅंटिक लहानशी आगगाडी मूळात व्यापार वाढवण्यासाठी विकसित केली गेली. ‘दाजिर्लिंग हिमालयन रेल्वे’ सुरू झाली 1881 साली. त्याआधी कलकत्त्याहून दार्जिलिंगर्पयतचा प्रवास लांबलचक आणि कष्टप्रद होता. आधी साहिबगंजपयर्र्त रेल्वे आणि नंतर बोटीने गंगा पार करणे आणि त्यानंतर टांगा किंवा बैलगाडी किंवा पालखीने घाट चढून दार्जिलिंगला पोहोचायचे! ज्या प्रवासाला पूर्वी अनेक आठवडे लागायचे तो आता 23 तासात होऊ लागला. अर्थात चहाची वाहतूक करणे सोपे झाले तसेच मजुरांची आणि मालाची ने आण. नाही तर पूर्वी जो तांदूळ कलकत्त्याला 98 रुपये टन या दराने मिळायचा तो दार्जिलिंगला 283 रुपयांना. दार्जिलिंग चहाचा व्यापार तेजीत आला तो ह्या रेल्वेमुळे. अर्थात चहा जगभर इतका लोकप्रिय होता की चक्क चीनहून रशियाला तो पोहोचायचा. उंटांचे ह्यकांरवा संथपणे हा चहा रशियाला पोहोचवायचे ते दीड वर्षात. 1618 साली रशियाच्या झार सम्राटाला मंगोलियन आल्तीन खानने 250 पौंड चहा भेट दिला. दुर्मीळ, महाग चहा लागलीच रशियन उच्चभ्रू वर्गात लोकप्रिय झाला. चीन व्यापारासाठी पुढे सरसावला. चीनहून उंटावरून नेलेला चहा 11 हजार मैल प्रवास करून, दीड वर्षानी रशियाला पोहोचायचा. रोज सहा हजार उंट रशियाला पोहोचायचे आणि प्रत्येक उंटावर 600 पौंड चहा असायचा! 1903 साली ट्रान्स सायबेरीयन रेल्वे सुरू झाली आणि आता चहा पोहोचू लागला सात दिवसात! सर्वसामान्य भारतीय जनतेपयर्ंत चहा पोहोचला तो पहिल्या महायुद्धानंतर. तोपयर्र्त तो भारतातले युरोपियन आणि उच्चभ्रू भारतीयांना फक्त परिचित होता. महायुद्धानंतर चहा व्यापार कमालीचा थंडावला. आता ब्रिटिशाना अचानक साक्षात्कार झाला की भारतातच प्रचंड ग्राहक निर्माण होऊ शकतं. झालं! आता ब्रिटिशांनी चहा खेडोपाडी पोहोचवायला सुरुवात केली. त्यासाठी चहाची पाकिटे तयार झाली. गावोगावचे बाजार आणि गल्लीबोळात चहा कसा करायचा याची प्रात्यक्षिकं होऊ लागली. पडदा घेणा:या बायकांपयर्ंत पोहोचायला शिकलेल्या स्त्रिया आणि किशोरवयीन मुले यांना नोकरी मिळू लागली. चहाची ओळख ‘कष्टक:यांचा मित्र’ अशी करून देण्यात ब्रिटिश यशस्वी झाले. तोपयर्ंत फक्त सिंग फो जमातीला चहा माहीत होता असे मानले जाते. शिवकाली भट्टाचार्य हे ‘चिरंजीव वनौषधी’चे लेखक मात्र सहमत नाहीत. ते लिहितात की संस्कृतमध्ये चहाची पाच तरी नावे आहेत.. श्यामपर्णी, ेष्मारी, गिरीभित, अतांद्री आणि कमलरस. प्राचीन लोक म्हणे त्याचं ‘फांट’ करून प्यायचे--पाणी गरम असताना त्यात चहापत्ती टाकून घट्ट झाकण लावून ठेवायचे. नंतर गाळून प्यायचे. वेदकालीन ‘सोमरस’ म्हणजेच चहा असाही दावा काहीजण करतात. काही तर लक्ष्मणाला जीवदान देणा:या संजीवनी वनस्पतीशी तिचा संबंध जोडतात. त्यासाठी सबळ पुरावे मात्र पुढे आलेले नाहीत. चीनला मागे टाकत आज जवळजवळ 80 टक्के जागतिक चहा उत्पन्न भारतीय आहे आणि उत्पन्नाच्या 80 टक्के चहा भारतात प्यायला जातो.