शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
3
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
4
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
5
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
6
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
7
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
8
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
9
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
10
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
11
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
12
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
13
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
14
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
15
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
16
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
17
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
18
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
19
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
20
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...

खड्ड्यांचे ग्रहण सुटणार तरी कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:45 IST

वार्तापत्र अजय पाटील गेल्या दोन वर्षांपासून जळगावकर मोठ्या समस्यांना तोंड देत आपले दैनंदिन जीवन जगत आहेत. २०१० ते २०२० ...

वार्तापत्र

अजय पाटील

गेल्या दोन वर्षांपासून जळगावकर मोठ्या समस्यांना तोंड देत आपले दैनंदिन जीवन जगत आहेत. २०१० ते २०२० हे दहा वर्षांचे दशक संपल्यानंतर नव्या दशकात जळगावकरांच्या नशिबी चांगल्या सुविधा येतील का ? असा प्रश्न आता सातत्याने उपस्थित होत आहे. नव्या दशकात जळगाव शहराचा विकास कसा राहिल ? यावर भाष्य करण्यासाठी शक्यतो कोणताही ज्योतिष बोलायला तयार नाही. कारण गेल्या काही वर्षांपासून जळगावकर केवळ धूळ, चिखल, माती अन‌् खड्डे अशाच समस्यांना तोंड देत आहेत आणि उदासीन प्रशासन व सत्ताधाऱ्यांचा ढिसाळ कारभार पाहता भाकित वर्तविणेदेखील चुकीचे ठरणार आहे. कारण गेल्या दोन वर्षांत शहरातील ६२४ कि.मी.पैकी तब्बल ५७० किमीचे रस्ते अमृत योजनेच्या कामामुळे फुटले आहेत. त्यामुळे शहरातील असा कोणताही कोणताही भाग नाही की ज्याठिकाणचा रस्ता फुटलेला नाही. हे खड्डे विकासाचे असले तरी आता या विकासाच्या खड्ड्यांचा वीट जळगावकरांना येऊ लागला आहे. ढिसाळ मनपा प्रशासन व सत्ताधाऱ्यांचा नियोजनाअभावीच जळगावकरांवर ही वेळ आली आहे. नियमितपणे कर भरणा करूनदेखील जळगावकरांना मूलभूत सुविधांसाठी वंचित रहावे लागत आहे. सत्ताधाऱ्यांना एकही योजना धड चांगल्याप्रकारे राबवितादेखील येत नसल्याने जळगावची ओळख आता खड्डेगाव, धूळ गाव अशी होऊ लागली आहे. अमृत योजनांचे काम जून महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. नेहमी ‘अमृत’वर खापर फोडणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडे सहा महिन्यांनंतर हे कारणदेखील राहणार नाही. शहरातील फुटलेल्या रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी सुमारे ३०० कोटींचे अंदाजपत्रक तयार करण्यात येणार आहे. ३०० कोटींचा निधी शासनाकडून प्राप्त न झाल्यास मनपाकडे इतका निधी निर्माण होणे कठीण आहे. त्यामुळे अमृतची कामे पूर्ण झाली तरी निधीअभावी कामे होणे कठीणच आहे. नवीन वर्षात खड्ड्यांचे ग्रहण सुटणार का ? असा प्रश्न जळगावकरांकडून विचारला जात आहे.