शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

खड्ड्यांचे ग्रहण सुटणार तरी कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:45 IST

वार्तापत्र अजय पाटील गेल्या दोन वर्षांपासून जळगावकर मोठ्या समस्यांना तोंड देत आपले दैनंदिन जीवन जगत आहेत. २०१० ते २०२० ...

वार्तापत्र

अजय पाटील

गेल्या दोन वर्षांपासून जळगावकर मोठ्या समस्यांना तोंड देत आपले दैनंदिन जीवन जगत आहेत. २०१० ते २०२० हे दहा वर्षांचे दशक संपल्यानंतर नव्या दशकात जळगावकरांच्या नशिबी चांगल्या सुविधा येतील का ? असा प्रश्न आता सातत्याने उपस्थित होत आहे. नव्या दशकात जळगाव शहराचा विकास कसा राहिल ? यावर भाष्य करण्यासाठी शक्यतो कोणताही ज्योतिष बोलायला तयार नाही. कारण गेल्या काही वर्षांपासून जळगावकर केवळ धूळ, चिखल, माती अन‌् खड्डे अशाच समस्यांना तोंड देत आहेत आणि उदासीन प्रशासन व सत्ताधाऱ्यांचा ढिसाळ कारभार पाहता भाकित वर्तविणेदेखील चुकीचे ठरणार आहे. कारण गेल्या दोन वर्षांत शहरातील ६२४ कि.मी.पैकी तब्बल ५७० किमीचे रस्ते अमृत योजनेच्या कामामुळे फुटले आहेत. त्यामुळे शहरातील असा कोणताही कोणताही भाग नाही की ज्याठिकाणचा रस्ता फुटलेला नाही. हे खड्डे विकासाचे असले तरी आता या विकासाच्या खड्ड्यांचा वीट जळगावकरांना येऊ लागला आहे. ढिसाळ मनपा प्रशासन व सत्ताधाऱ्यांचा नियोजनाअभावीच जळगावकरांवर ही वेळ आली आहे. नियमितपणे कर भरणा करूनदेखील जळगावकरांना मूलभूत सुविधांसाठी वंचित रहावे लागत आहे. सत्ताधाऱ्यांना एकही योजना धड चांगल्याप्रकारे राबवितादेखील येत नसल्याने जळगावची ओळख आता खड्डेगाव, धूळ गाव अशी होऊ लागली आहे. अमृत योजनांचे काम जून महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. नेहमी ‘अमृत’वर खापर फोडणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडे सहा महिन्यांनंतर हे कारणदेखील राहणार नाही. शहरातील फुटलेल्या रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी सुमारे ३०० कोटींचे अंदाजपत्रक तयार करण्यात येणार आहे. ३०० कोटींचा निधी शासनाकडून प्राप्त न झाल्यास मनपाकडे इतका निधी निर्माण होणे कठीण आहे. त्यामुळे अमृतची कामे पूर्ण झाली तरी निधीअभावी कामे होणे कठीणच आहे. नवीन वर्षात खड्ड्यांचे ग्रहण सुटणार का ? असा प्रश्न जळगावकरांकडून विचारला जात आहे.