शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
4
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
5
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
6
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
7
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
8
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
9
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
11
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
12
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
13
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
14
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
15
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
16
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
17
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
18
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
19
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी

जिल्ह्यातील आठ रेल्वेस्थानकांवरील धूळ कधी झटकणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:33 IST

सचिन देव जळगाव : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून भुसावळ विभागातील सर्व पॅसेंजर सेवा बंद असल्यामुळे, ग्रामीण भागातील प्रवाशांची मोठी ...

सचिन देव

जळगाव : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून भुसावळ विभागातील सर्व पॅसेंजर सेवा बंद असल्यामुळे, ग्रामीण भागातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यातील पॅसेंजर थांबणाऱ्या स्टेशनवर सध्या स्मशान शांतता पसरली आहे. येथील प्रवासी कक्षांतील आसनांवर मोठ्या प्रमाणावर धूळ बसली आहे. त्यामुळे हे स्टेशन पूर्वीप्रमाणे कधी गजबजणार, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

भुसावळ विभागातून प्रत्येक मार्गावर पॅसेंजर धावत असल्यामुळे, गेल्या काही वर्षांमध्ये दळणवळणाच्या दृष्टीने नागरिकांची मोठी गैरसोय टळली आहे. यात विशेषत: ग्रामीण भागातील नागरिकांसाठी पॅसेंजर गाड्या मोठ्या वरदान ठरल्या आहेत. मात्र, कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे, ग्रामीण नागरिकांचे अर्थचक्रच कोलमडून गेले आहे. विशेषत: भुसावळ ते चाळीसगावदरम्यान येणाऱ्या भादली, शिरसोली, परधाडे, माहेजी, गाळण, नगरदेवळा, कजगाव, वाघळी या गावांना याचा मोठा फटका बसला आहे. पॅसेंजर बंद असल्यामुळे या गावांतील नागरिकांचे व चाकरमान्यांचे उद्योग-व्यवसायानिमित्त शहरात येणेच बंद झाले आहे. त्यात पॅसेंजरमुळे बाराही महिने गजबजणाऱ्या या स्टेशनवर सध्या प्रचंड शुकशुकाट आहे. त्यामुळे प्रवासी आसने व आतील कक्षात प्रचंड अस्वच्छता पसरली आहे. त्यात या स्टेशनवरही एक्स्प्रेस गाड्याही थांबत नसल्यामुळे, एकही प्रवासी स्टेशन परिसरात फिरत नसल्याचे दिसून आले.

इन्फो :

भुसावळ-मुंबई पॅसेंजर

भुसावळ -देवळाली पॅसेंजर

भुसावळ-नागपूर पॅसेंजर

भुसावळ-वडनेरा पॅसेंजर

भुसावळ-अमरावती पॅसेंजर

इन्फो :

बंद असलेली रेल्वेस्थानके

भादली, शिरसोली, परधाडे, माहेजी, गाळण, नगरदेवळा, कजगाव, वाघळी

इन्फो :

एक्स्प्रेस सुरू, मग पॅसेंजर बंद का?

गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचे कारण सांगून रेल्वेने पॅसेंजर बंद ठेवल्या आहेत. मात्र, टप्प्याटप्प्याने सर्व एक्स्प्रेस गाड्या सुरू केल्या आहेत. पॅसेंजर सुरू केल्या की गर्दी होईल, असे रेल्वेतर्फे सांगण्यात येते. मग, आताही एक्स्प्रेस गाड्यांनाही गर्दी होऊन, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. हे रेल्वे प्रशासनाला दिसत नाही का?

नितीन सोनवणे, प्रवासी

इन्फो :

ग्रामीण भागातील प्रवाशांना शहरात येण्यासाठी पॅसेंजर गाड्या हे एकमेव परवडणारे साधन आहे. मात्र, शासनाने कोरोनाच्या नावाखाली अद्यापही पॅसेंजर गाड्या सुरू केलेल्या नाहीत. सध्या स्थितीला सर्व एक्स्प्रेस गाड्या सुरू झाल्या आहेत, मग पॅसेंजर बंद ठेवण्यात अर्थ काय, सरकारचे धोरण समजत नाही. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता, तात्काळ पॅसेंजर सुरू करणे गरजेचे आहे.

योगेश पाटील, प्रवासी