शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

काशिनाथ चौकातील कोंडी कधी सुटेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:16 IST

जळगाव : अजिंठा चौफुलीकडून औरंगाबादकडे जाणा-या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे बाजार समितीजवळच्या काशिनाथ चौकातच पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे ...

जळगाव : अजिंठा चौफुलीकडून औरंगाबादकडे जाणा-या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे बाजार समितीजवळच्या काशिनाथ चौकातच पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे वाहने संथ गतीने जातात. काही मोठी वाहने या खड्ड्यामध्येच अडकतात. तर भाजी विक्रेत्यांनी या रस्त्यावर दुतर्फा ठाण मांडले आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावर प्रचंड वाहतुकीची कोंडी होत आहे. परिणामी, आता या परिसरातील वाहतूक कोंडीला हैराण झाले आहेत़

कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले़ कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच, लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली. परिणामी, अनेकांनी रस्त्यावरच व्यवसाय थाटला. अनेक कपडे व भाजीपाला विक्रेत्यांनी महामार्गासह शहरातील रस्त्यांवर आपली लहान-मोठी दुकाने थाटून आपल्या रोजगाराची सोय केली. यामुळे महामार्गावरील रस्त्यावर चांगलेच अतिक्रमण झाले आहे. दुसरीकडे शहरात हातावर मोजण्याइतकेच रस्ते सुस्थितीत आहेत. इतर ठिकाणी खड्डेच-खड्डे बघायला मिळत आहे. असेच काही काशिनाथ चौकात पाहायला मिळत आहे. रस्त्याच्या दुतर्फा भाजीविक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे, तर दुसरीकडे रस्त्यावर प्रचंड भले मोठे खड्डे झालेले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून भर चौकात वाहतुकीची कोंडी होत आहे. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे ही कोंडी आजही कायम असून सोमवारी सायंकाळी या ठिकाणी पुन्हा कोंडी झाली होती.

रस्त्याच्या मधोमध खड्डा

काशिनाथ चौकात मधोमध भला मोठा खड्डा आहे़ त्या खड्ड्यामुळे बरीच वाहने संथ गतीने जातात तर काही वाहने त्या अडकतात़ त्यामुळे लहान-मोठे अपघात त्या ठिकाणी होत आहे. त्यातच मेहरूण व गुरांच्या बाजारकडे जाणा-या रस्त्यावर वळण घेण्यासाठी वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. या भागातून मोठमोठे टँकर, ट्रक गेल्यास काही क्षणातच कोंडी होते़ त्यात बेशिस्त दुचाकीस्वारांकडून त्यात अधिक भर पाडली जाते.

पर्यायी रस्त्याचा शोध...

प्रचंड धूळ..., मोठमोठे खड्डे...आणि त्यात नियमित होणारी वाहतुकीच्या कोंडीने परिसरातील नागरिक प्रचंड वैतागले आहेत़ घरी जाण्यासाठी अनेकांनी पर्यायी रस्ताचा शोध घेतला आहे़ वेळ लागत असला तरी लांबवरचा रस्त्याचा घरी जाण्यासाठी वापर करीत असल्याचे एका वाहनधारकाने सांगितले. तर काशिनाथ चौकातून मेहरूणकडे जाण्यासाठी चौकातून वळण न घेता, शंभर मीटर अंतरावर असलेल्या मेहरूणकडे जाणा-या दुस-या रस्त्यावरून मोठ्या वाहनांना वळण घ्यावे लागत आहे. दरम्यान, ही कोंडी लवकरात लवकर सोडविण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.