शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

काशिनाथ चौकातील कोंडी कधी सुटेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:16 IST

जळगाव : अजिंठा चौफुलीकडून औरंगाबादकडे जाणा-या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे बाजार समितीजवळच्या काशिनाथ चौकातच पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे ...

जळगाव : अजिंठा चौफुलीकडून औरंगाबादकडे जाणा-या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे बाजार समितीजवळच्या काशिनाथ चौकातच पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे वाहने संथ गतीने जातात. काही मोठी वाहने या खड्ड्यामध्येच अडकतात. तर भाजी विक्रेत्यांनी या रस्त्यावर दुतर्फा ठाण मांडले आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावर प्रचंड वाहतुकीची कोंडी होत आहे. परिणामी, आता या परिसरातील वाहतूक कोंडीला हैराण झाले आहेत़

कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले़ कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच, लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली. परिणामी, अनेकांनी रस्त्यावरच व्यवसाय थाटला. अनेक कपडे व भाजीपाला विक्रेत्यांनी महामार्गासह शहरातील रस्त्यांवर आपली लहान-मोठी दुकाने थाटून आपल्या रोजगाराची सोय केली. यामुळे महामार्गावरील रस्त्यावर चांगलेच अतिक्रमण झाले आहे. दुसरीकडे शहरात हातावर मोजण्याइतकेच रस्ते सुस्थितीत आहेत. इतर ठिकाणी खड्डेच-खड्डे बघायला मिळत आहे. असेच काही काशिनाथ चौकात पाहायला मिळत आहे. रस्त्याच्या दुतर्फा भाजीविक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे, तर दुसरीकडे रस्त्यावर प्रचंड भले मोठे खड्डे झालेले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून भर चौकात वाहतुकीची कोंडी होत आहे. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे ही कोंडी आजही कायम असून सोमवारी सायंकाळी या ठिकाणी पुन्हा कोंडी झाली होती.

रस्त्याच्या मधोमध खड्डा

काशिनाथ चौकात मधोमध भला मोठा खड्डा आहे़ त्या खड्ड्यामुळे बरीच वाहने संथ गतीने जातात तर काही वाहने त्या अडकतात़ त्यामुळे लहान-मोठे अपघात त्या ठिकाणी होत आहे. त्यातच मेहरूण व गुरांच्या बाजारकडे जाणा-या रस्त्यावर वळण घेण्यासाठी वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. या भागातून मोठमोठे टँकर, ट्रक गेल्यास काही क्षणातच कोंडी होते़ त्यात बेशिस्त दुचाकीस्वारांकडून त्यात अधिक भर पाडली जाते.

पर्यायी रस्त्याचा शोध...

प्रचंड धूळ..., मोठमोठे खड्डे...आणि त्यात नियमित होणारी वाहतुकीच्या कोंडीने परिसरातील नागरिक प्रचंड वैतागले आहेत़ घरी जाण्यासाठी अनेकांनी पर्यायी रस्ताचा शोध घेतला आहे़ वेळ लागत असला तरी लांबवरचा रस्त्याचा घरी जाण्यासाठी वापर करीत असल्याचे एका वाहनधारकाने सांगितले. तर काशिनाथ चौकातून मेहरूणकडे जाण्यासाठी चौकातून वळण न घेता, शंभर मीटर अंतरावर असलेल्या मेहरूणकडे जाणा-या दुस-या रस्त्यावरून मोठ्या वाहनांना वळण घ्यावे लागत आहे. दरम्यान, ही कोंडी लवकरात लवकर सोडविण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.