शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
2
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
3
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
4
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
5
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
6
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
7
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
8
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
12
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
13
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
14
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
15
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
16
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
17
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
18
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
19
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
20
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे

धुळगाव कधी होणार पुन्हा जळगाव...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:21 IST

वार्तापत्र महापालिकेत खाविआच्या अनेक वर्षांच्या सत्तेला कंटाळून २०१८ मध्ये जळगावकरांनी मनपात भाजपला ऐतिहासिक बहुमत देत सत्ता दिली. विचार हाच ...

वार्तापत्र

महापालिकेत खाविआच्या अनेक वर्षांच्या सत्तेला कंटाळून २०१८ मध्ये जळगावकरांनी मनपात भाजपला ऐतिहासिक बहुमत देत सत्ता दिली. विचार हाच की प्रचारादरम्यान ज्या आत्मविश्वासाने भाजपच्या नेत्यांनी वर्षभरात जळगाव शहराचा चेहरामोहरा बदलवण्याची भाषा केली होती त्याच भाषेला जळगावकर भाळले, विशेष म्हणजे शहरात अमृत योजनेंतर्गत पाणी पुरवठा व भुयारी गटार योजनेचे काम सुरु होते. अशा परिस्थितीतही भाजपच्या नेत्यांनी शहराचा चेहरामोहरा बदलण्याची घोषणा केली ते ही केवळ वर्षभराच्या आत, मात्र आज भाजपची सत्ता येऊन पुढील महिन्यात अडीच वर्ष पूर्ण होणार आहेत. या अडीच वर्षात शहराचा चेहरामोहरा सत्ताधाऱ्यांनी खरच बदलवून दाखविला आहे. आज शहरातील प्रत्येक रस्त्यावर प्रचंड धूळ उडत आहे. ती याआधी इतक्या प्रमाणात उडत नव्हती, मुख्य रस्त्यालगत असलेल्या दुकानदारांना दिवसातून पाचवेळा दुकान साफ करावे लागत आहे, ते याआधी कधीही होत नव्हते हे सत्ताधाऱ्यांनी करून दाखविले, शहराचा चेहरामोहराच काय सत्ताधाऱ्यांनी जळगाव शहराचे नाव बदलवून दाखविण्याची किमया केली असून, जळगाव आता धुळगाव म्हणून ओळखले जात आहे. शहरातील रस्ते अजून वर्षभर तरी होण्याची शक्यता नाही, कारण सत्ताधाऱ्यांचे मते शहरात अमृतचे काम सुरु असल्याने नवीन रस्ते होऊ शकत नाही. मात्र, मनपा निवडणुकीच्या वेळेस देखील अमृतचे काम सुरु होते. शासनाने अमृत दरम्यान रस्ते करू नये असे तेव्हाही म्हटले होतेच. मात्र, आश्वासने व घोषणा करताना शासनाचा हा निर्णय सत्ताधाऱ्यांना दिसला नाही. आता शहरातील नागरिकांचा संयम सुटू लागला आहे. वातावरणात या धुळीमुळे धुलिकणांचे प्रमाण वाढत आहे. खराब रस्त्यांमुळे नागरिकांना मणक्यांचे विकार होत असून, धुळीमुळे श्वसनाचे विकार देखील होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आता तरी सत्ताधाऱ्यांनी शहरातील रस्त्यांबाबतीत गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. जळगावकरांसह शहरात येणाऱ्या बाहेरील नागरिकांसाठी देखील आता रस्त्यांची समस्याच महत्वाची वाटत आहे. मात्र, मनपाला मिळालेल्या ४२ कोटींचे नियोजन सत्ताधाऱ्यांना करता आले नाही. केले तर त्यात शहराची मुख्य समस्येला बगल देत, रस्त्यांसाठी केवळ १६ कोटींची तरतूद केली तर इतर निधीतून मोकळ्या जागांना कंपाऊंड वॉल तयार करण्याची तरतुद केली. मोकळ्या जागा जशा कोणी खाऊन जाणार आहे. सत्ताधाऱ्यांना अजूनही मुख्य समस्या कळत नाहीत. पहिल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात सत्ताधाऱ्यांनी जळगावला धुळगाव केले असून, आता पुढील अडीच वर्षात धुळगावचे जळगाव करण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी न केल्यास जळगावकरांचा संताप इव्हीएम मशीनवर निघून सत्ताधाऱ्यांना बेदखल देखील करू शकतात, त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी मुख्य समस्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे.