शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

धुळगाव कधी होणार पुन्हा जळगाव...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:21 IST

वार्तापत्र महापालिकेत खाविआच्या अनेक वर्षांच्या सत्तेला कंटाळून २०१८ मध्ये जळगावकरांनी मनपात भाजपला ऐतिहासिक बहुमत देत सत्ता दिली. विचार हाच ...

वार्तापत्र

महापालिकेत खाविआच्या अनेक वर्षांच्या सत्तेला कंटाळून २०१८ मध्ये जळगावकरांनी मनपात भाजपला ऐतिहासिक बहुमत देत सत्ता दिली. विचार हाच की प्रचारादरम्यान ज्या आत्मविश्वासाने भाजपच्या नेत्यांनी वर्षभरात जळगाव शहराचा चेहरामोहरा बदलवण्याची भाषा केली होती त्याच भाषेला जळगावकर भाळले, विशेष म्हणजे शहरात अमृत योजनेंतर्गत पाणी पुरवठा व भुयारी गटार योजनेचे काम सुरु होते. अशा परिस्थितीतही भाजपच्या नेत्यांनी शहराचा चेहरामोहरा बदलण्याची घोषणा केली ते ही केवळ वर्षभराच्या आत, मात्र आज भाजपची सत्ता येऊन पुढील महिन्यात अडीच वर्ष पूर्ण होणार आहेत. या अडीच वर्षात शहराचा चेहरामोहरा सत्ताधाऱ्यांनी खरच बदलवून दाखविला आहे. आज शहरातील प्रत्येक रस्त्यावर प्रचंड धूळ उडत आहे. ती याआधी इतक्या प्रमाणात उडत नव्हती, मुख्य रस्त्यालगत असलेल्या दुकानदारांना दिवसातून पाचवेळा दुकान साफ करावे लागत आहे, ते याआधी कधीही होत नव्हते हे सत्ताधाऱ्यांनी करून दाखविले, शहराचा चेहरामोहराच काय सत्ताधाऱ्यांनी जळगाव शहराचे नाव बदलवून दाखविण्याची किमया केली असून, जळगाव आता धुळगाव म्हणून ओळखले जात आहे. शहरातील रस्ते अजून वर्षभर तरी होण्याची शक्यता नाही, कारण सत्ताधाऱ्यांचे मते शहरात अमृतचे काम सुरु असल्याने नवीन रस्ते होऊ शकत नाही. मात्र, मनपा निवडणुकीच्या वेळेस देखील अमृतचे काम सुरु होते. शासनाने अमृत दरम्यान रस्ते करू नये असे तेव्हाही म्हटले होतेच. मात्र, आश्वासने व घोषणा करताना शासनाचा हा निर्णय सत्ताधाऱ्यांना दिसला नाही. आता शहरातील नागरिकांचा संयम सुटू लागला आहे. वातावरणात या धुळीमुळे धुलिकणांचे प्रमाण वाढत आहे. खराब रस्त्यांमुळे नागरिकांना मणक्यांचे विकार होत असून, धुळीमुळे श्वसनाचे विकार देखील होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आता तरी सत्ताधाऱ्यांनी शहरातील रस्त्यांबाबतीत गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. जळगावकरांसह शहरात येणाऱ्या बाहेरील नागरिकांसाठी देखील आता रस्त्यांची समस्याच महत्वाची वाटत आहे. मात्र, मनपाला मिळालेल्या ४२ कोटींचे नियोजन सत्ताधाऱ्यांना करता आले नाही. केले तर त्यात शहराची मुख्य समस्येला बगल देत, रस्त्यांसाठी केवळ १६ कोटींची तरतूद केली तर इतर निधीतून मोकळ्या जागांना कंपाऊंड वॉल तयार करण्याची तरतुद केली. मोकळ्या जागा जशा कोणी खाऊन जाणार आहे. सत्ताधाऱ्यांना अजूनही मुख्य समस्या कळत नाहीत. पहिल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात सत्ताधाऱ्यांनी जळगावला धुळगाव केले असून, आता पुढील अडीच वर्षात धुळगावचे जळगाव करण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी न केल्यास जळगावकरांचा संताप इव्हीएम मशीनवर निघून सत्ताधाऱ्यांना बेदखल देखील करू शकतात, त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी मुख्य समस्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे.