शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

धुळगाव कधी होणार पुन्हा जळगाव...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:21 IST

वार्तापत्र महापालिकेत खाविआच्या अनेक वर्षांच्या सत्तेला कंटाळून २०१८ मध्ये जळगावकरांनी मनपात भाजपला ऐतिहासिक बहुमत देत सत्ता दिली. विचार हाच ...

वार्तापत्र

महापालिकेत खाविआच्या अनेक वर्षांच्या सत्तेला कंटाळून २०१८ मध्ये जळगावकरांनी मनपात भाजपला ऐतिहासिक बहुमत देत सत्ता दिली. विचार हाच की प्रचारादरम्यान ज्या आत्मविश्वासाने भाजपच्या नेत्यांनी वर्षभरात जळगाव शहराचा चेहरामोहरा बदलवण्याची भाषा केली होती त्याच भाषेला जळगावकर भाळले, विशेष म्हणजे शहरात अमृत योजनेंतर्गत पाणी पुरवठा व भुयारी गटार योजनेचे काम सुरु होते. अशा परिस्थितीतही भाजपच्या नेत्यांनी शहराचा चेहरामोहरा बदलण्याची घोषणा केली ते ही केवळ वर्षभराच्या आत, मात्र आज भाजपची सत्ता येऊन पुढील महिन्यात अडीच वर्ष पूर्ण होणार आहेत. या अडीच वर्षात शहराचा चेहरामोहरा सत्ताधाऱ्यांनी खरच बदलवून दाखविला आहे. आज शहरातील प्रत्येक रस्त्यावर प्रचंड धूळ उडत आहे. ती याआधी इतक्या प्रमाणात उडत नव्हती, मुख्य रस्त्यालगत असलेल्या दुकानदारांना दिवसातून पाचवेळा दुकान साफ करावे लागत आहे, ते याआधी कधीही होत नव्हते हे सत्ताधाऱ्यांनी करून दाखविले, शहराचा चेहरामोहराच काय सत्ताधाऱ्यांनी जळगाव शहराचे नाव बदलवून दाखविण्याची किमया केली असून, जळगाव आता धुळगाव म्हणून ओळखले जात आहे. शहरातील रस्ते अजून वर्षभर तरी होण्याची शक्यता नाही, कारण सत्ताधाऱ्यांचे मते शहरात अमृतचे काम सुरु असल्याने नवीन रस्ते होऊ शकत नाही. मात्र, मनपा निवडणुकीच्या वेळेस देखील अमृतचे काम सुरु होते. शासनाने अमृत दरम्यान रस्ते करू नये असे तेव्हाही म्हटले होतेच. मात्र, आश्वासने व घोषणा करताना शासनाचा हा निर्णय सत्ताधाऱ्यांना दिसला नाही. आता शहरातील नागरिकांचा संयम सुटू लागला आहे. वातावरणात या धुळीमुळे धुलिकणांचे प्रमाण वाढत आहे. खराब रस्त्यांमुळे नागरिकांना मणक्यांचे विकार होत असून, धुळीमुळे श्वसनाचे विकार देखील होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आता तरी सत्ताधाऱ्यांनी शहरातील रस्त्यांबाबतीत गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. जळगावकरांसह शहरात येणाऱ्या बाहेरील नागरिकांसाठी देखील आता रस्त्यांची समस्याच महत्वाची वाटत आहे. मात्र, मनपाला मिळालेल्या ४२ कोटींचे नियोजन सत्ताधाऱ्यांना करता आले नाही. केले तर त्यात शहराची मुख्य समस्येला बगल देत, रस्त्यांसाठी केवळ १६ कोटींची तरतूद केली तर इतर निधीतून मोकळ्या जागांना कंपाऊंड वॉल तयार करण्याची तरतुद केली. मोकळ्या जागा जशा कोणी खाऊन जाणार आहे. सत्ताधाऱ्यांना अजूनही मुख्य समस्या कळत नाहीत. पहिल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात सत्ताधाऱ्यांनी जळगावला धुळगाव केले असून, आता पुढील अडीच वर्षात धुळगावचे जळगाव करण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी न केल्यास जळगावकरांचा संताप इव्हीएम मशीनवर निघून सत्ताधाऱ्यांना बेदखल देखील करू शकतात, त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी मुख्य समस्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे.