शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

जुन्या अपार्टमेंटबाबत मनपा काय निर्णय घेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:16 IST

लेकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपा प्रशासनाने शहरात अमृत पाणी पुरवठा योजनेंतर्गत एका अपार्टमेंटमध्ये एकच नळ कनेक्शन देण्याचा निर्णय ...

लेकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मनपा प्रशासनाने शहरात अमृत पाणी पुरवठा योजनेंतर्गत एका अपार्टमेंटमध्ये एकच नळ कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, शहरात अनेक भागात जुने अपार्टमेंट असून, या ठिकाणी पाण्याची टाकी किंवा समदेखील तयार करणे कठीण आहे. त्यामुळे अशा अपार्टमेंटमधील रहिवाशांना स्वतंत्र नळ कनेक्शन देण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अमृत योजनेच्या कामातही मनपा प्रशासनाच्या चुकांच्या प्रतापामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. आता अमृत योजनेचे काम अंतिम टप्प्यात असताना अनेक बाबीं मनपाने स्पष्ट न केल्याने नागरिकही संभ्रमात आहेत.

नवीन अपार्टमेंटचे बांधकाम होत असताना, आता त्या ठिकाणी अपार्टमेंटचा ठेकेदार स्वतंत्र सम किंवा पाण्याची टाकी तयार करतो. मात्र, याआधी म्हणजेच २० वर्षांपूर्वी झालेल्या अपार्टमेंटमध्ये सम किंवा पाण्याची टाकीदेखील तयार करण्यात आलेली नाही. अशा ठिकाणच्या अपार्टमेंटमध्ये एकच कनेक्शन देणे कठीण आहे. अशा ठिकाणी फ्लॅटधारकांना स्वतंत्र कनेक्शन देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. यासह सम किंवा पाण्याची टाकी तयार करणेही अशा अपार्टमेंटधारकांना शक्य नाही. त्यामुळे जुन्या अपार्टमेंटधारकांबाबत मनपा प्रशासनाने स्वतंत्र विचार करणे गरजेचे आहे. याबाबत नागरिकदेखील संभ्रमात आहेत.

या येऊ शकतात अडचणी

जमिनी लगत, भूमीगत टाकी तयार केल्यास जुन्या इमारतींना धोका आहे. एकाच साठवण टाकीतून पाण्याचे असमान वितरण आणि वापर झाल्याने वाद होण्याची शक्यता आहे. नवीन टाकीच्या बांधकाम खर्चाची जबाबदारी कोणाची राहील, यावरूनही वाद होण्याची शक्यता आहे. संयुक्तिक नळ संयोजनची पाणीपट्टी भरण्यास अपार्टमेंटमधील कुणी नकार दिल्यास कोण जबाबदार राहणार, अशा अनेक अडचणी यामुळे येणार आहेत. याबाबत मनपा प्रशासनाला निर्णय घेण्याची गरज आहे.

मुंबई-पुण्यात सुरुवातीपासूनच एकच कनेक्शन

मुंबई व पुण्यात अनेक वर्षांपासून अपार्टमेंट सिस्टिम आहे. त्यामुळे त्या ठिकाणच्या महानगरपालिकांनी अनेक वर्षांपूर्वींच अपार्टमेंटधारकांना एकच कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला होता, तो निर्णय आजही कायम आहे. जुन्या अपार्टमेंटमध्येदेखील सम किंवा टाक्या तयार केल्या आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी अपार्टमेंटला एकच कनेक्शन आहे. मात्र, ज्या चाळी आहेत, त्या ठिकाणी स्वतंत्र कनेक्शन देण्यात आले आहे. दरम्यान, जळगाव शहरात काही वर्षांपासून अपार्टमेंट संस्कृती रुजू लागली आहे. नव्याने बांधकाम झालेल्या अपार्टमेंटमध्येच सम किंवा टाक्या तयार करण्यात येत आहेत. मात्र, जुने बांधकाम असलेल्यांना हे शक्यच होणार नाही.

मनपाची भूमिका स्पष्टच नाही

मनपा प्रशासनाची अमृत योजनेच्या कामासोबतच त्यानंतरच्या कामांबाबतदेखील भूमिका स्पष्ट नाही. योजना पूर्ण झाल्यानंतर वॉटर मीटरची गरज निर्माण होईल याबाबत मनपाने कोणतेही नियोजन केले नव्हते. जळगाव फर्स्टचे संचालक डॉ. राधेश्याम चौधरी यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मनपाला जाग आली. त्यामुळे मनपाने आता कुठे वॉटर मीटरच्या नियोजनाला सुरुवात केली आहे. तसेच स्थायी समितीच्या सभेत नितीन लढ्ढा व भाजपचे नगरसेवक सचिन पाटील यांनी अपार्टमेंटबाबतचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मनपाला याबाबतची जाग आली. त्यामुळे मनपा प्रशासनाची वॉटर मीटर असो वा अपार्टमेंटला कनेक्शन देण्याचा विषय असो, सर्व प्रकरणात मनपाची भूमिका स्पष्टच झालेली नाही.