शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

राष्ट्रीय महामार्गाची रुंदी नेमकी किती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आकाश नेवे जळगाव : राष्ट्रीय महामार्गाची रुंदी नेमकी किती आहे, याबाबतच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे दोन कागदपत्रांमध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्क

आकाश नेवे

जळगाव : राष्ट्रीय महामार्गाची रुंदी नेमकी किती आहे, याबाबतच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे दोन कागदपत्रांमध्ये वेगवेगळ्या नोंदी आहेत. एका खासगी कंपनीने महामार्ग चौपदरीकरणासंदर्भात केलेल्या अहवालात शहरातून जाणाऱ्या मार्गाची रुंदी ही ४५ मीटर असल्याचे म्हटले आहे. तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या एका पत्रानुसार या रस्त्याची रुंदी ही ६० मीटर आहे. हा रस्ता भविष्यातील रहदारीला अपूर्ण पडेल, याच शक्यतेवर महामार्ग शहराच्या बाहेरून वळवण्यात आला आहे.

महामार्गाच्या कामासाठी एका खासगी कंपनीने चौपदरीकरणाचे सर्वेक्षण केले होते. त्यात शहरातून जाणारा रस्ता हा ४५ मीटर असल्याचे म्हटले आहे. तसेच काही ठिकाणी तो ४० मीटर तर काही ठिकाणी ६० मीटर आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळाली असल्याचेही त्यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे. मात्र त्याचसोबत २१ जून २०१७ ला जळगाव बायपास संदर्भात नागपूर कार्यालयाने तत्कालीन मुख्य व्यवस्थापकांना पत्र लिहिले होते. त्यात एल.एन. मालवीय यांच्या रिपोर्टचा आधार घेत हा रस्ता पूर्ण ६० मीटरचा असून त्यानुसार येथे चार लेनचा रस्ता करता येऊ शकतो, असेदेखील म्हटले आहे. तसेच या पत्रात काही ठिकाणी रस्त्यांचे वळण पूर्ण करण्यासाठी सरकारी जमिनीचा काही भाग ताब्यात घ्यावा लागेल, असेही म्हटले आहे.

याबाबत शहरातील आर्किटेक्ट शिरीष बर्वे यांनी राष्ट्रीय हरित न्यायालयाला २०१७ मध्ये एक पत्रदेखील लिहिले होते. त्या पत्रातही त्यांनी या खासगी कंपनीने अर्धवट माहितीच्या आधारे रिपोर्ट तयार केला असल्याचा उल्लेख केला आहे.

४७ वर्षात रस्त्याचा विकासच नाही

पाळधी ते तरसोद या टप्प्यात ६० मीटरचा रस्ता आहे. हा रस्ता १९७० च्या सुमारास फक्त ९ मीटर होता. त्यानंतर रहदारी वाढली, शहर वाढले तरीदेखील हा रस्ता फक्त ९ मीटरचाच राहिला. त्या डांबरीकरणाच्या पलीकडे त्याचा विकास कधीही करण्यात आला नाही. शहरात समांतर रस्त्यांची समस्या कायमच राहिली. प्रमुख चौक हे अपघातप्रवण बनले. मात्र २०१७ पर्यंत या रस्त्याचा विकासच झाला नाही. त्यानंतर शहरांतर्गत चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.