शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

राष्ट्रीय महामार्गाची रुंदी नेमकी किती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आकाश नेवे जळगाव : राष्ट्रीय महामार्गाची रुंदी नेमकी किती आहे, याबाबतच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे दोन कागदपत्रांमध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्क

आकाश नेवे

जळगाव : राष्ट्रीय महामार्गाची रुंदी नेमकी किती आहे, याबाबतच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे दोन कागदपत्रांमध्ये वेगवेगळ्या नोंदी आहेत. एका खासगी कंपनीने महामार्ग चौपदरीकरणासंदर्भात केलेल्या अहवालात शहरातून जाणाऱ्या मार्गाची रुंदी ही ४५ मीटर असल्याचे म्हटले आहे. तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या एका पत्रानुसार या रस्त्याची रुंदी ही ६० मीटर आहे. हा रस्ता भविष्यातील रहदारीला अपूर्ण पडेल, याच शक्यतेवर महामार्ग शहराच्या बाहेरून वळवण्यात आला आहे.

महामार्गाच्या कामासाठी एका खासगी कंपनीने चौपदरीकरणाचे सर्वेक्षण केले होते. त्यात शहरातून जाणारा रस्ता हा ४५ मीटर असल्याचे म्हटले आहे. तसेच काही ठिकाणी तो ४० मीटर तर काही ठिकाणी ६० मीटर आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळाली असल्याचेही त्यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे. मात्र त्याचसोबत २१ जून २०१७ ला जळगाव बायपास संदर्भात नागपूर कार्यालयाने तत्कालीन मुख्य व्यवस्थापकांना पत्र लिहिले होते. त्यात एल.एन. मालवीय यांच्या रिपोर्टचा आधार घेत हा रस्ता पूर्ण ६० मीटरचा असून त्यानुसार येथे चार लेनचा रस्ता करता येऊ शकतो, असेदेखील म्हटले आहे. तसेच या पत्रात काही ठिकाणी रस्त्यांचे वळण पूर्ण करण्यासाठी सरकारी जमिनीचा काही भाग ताब्यात घ्यावा लागेल, असेही म्हटले आहे.

याबाबत शहरातील आर्किटेक्ट शिरीष बर्वे यांनी राष्ट्रीय हरित न्यायालयाला २०१७ मध्ये एक पत्रदेखील लिहिले होते. त्या पत्रातही त्यांनी या खासगी कंपनीने अर्धवट माहितीच्या आधारे रिपोर्ट तयार केला असल्याचा उल्लेख केला आहे.

४७ वर्षात रस्त्याचा विकासच नाही

पाळधी ते तरसोद या टप्प्यात ६० मीटरचा रस्ता आहे. हा रस्ता १९७० च्या सुमारास फक्त ९ मीटर होता. त्यानंतर रहदारी वाढली, शहर वाढले तरीदेखील हा रस्ता फक्त ९ मीटरचाच राहिला. त्या डांबरीकरणाच्या पलीकडे त्याचा विकास कधीही करण्यात आला नाही. शहरात समांतर रस्त्यांची समस्या कायमच राहिली. प्रमुख चौक हे अपघातप्रवण बनले. मात्र २०१७ पर्यंत या रस्त्याचा विकासच झाला नाही. त्यानंतर शहरांतर्गत चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.