शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

वसंतदादांशी गद्दारी करणा-यांना पक्षद्रोहा शिवाय दुसरं काय सुचणार? - चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2017 16:15 IST

ज्यांच्या काकांनी स्व.वसंतदादा पाटील यांच्या पाठित खंजीर खुपसला त्यांना पक्षद्रोहा शिवाय काय सुचनार,असा घणाघाती आरोप महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर केला.

ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. ८ -   माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांना पक्षासोबत द्रोह कधी मान्य नव्हता. ज्यांच्या काकांनी स्व.वसंतदादा पाटील यांच्या पाठित खंजीर खुपसला त्यांना पक्षद्रोहा शिवाय काय सुचणार? असा घणाघाती आरोप महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जळगावात बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला.माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका खासगी वाहिनीवर बोलतांना स्व.गोपीनाथ मुंडे यांच्यासह काही नेते काँग्रेसमध्ये जाणार होते तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या नावाचे वलय पाहून जन्मतारखेत बदल केल्याचा गौप्यस्फोट केला होता, याबाबत विचारल्यानंतर चंद्रकांत पाटील सांगितले की, अजित पवार यांना इतक्या वर्षानंतर या घटनेची आठवण कशी झाली. मुळात आता हे सर्वजण सैरभैर झाले आहेत. ज्यावेळी व्यक्ती सैरभैर होतो त्यावेळी तो अशा कथा तयार करतात. अजित पवार यांनी देखील अशीच कथा तयार केली आहे. ज्यांच्या काकांनी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठित खंजीर खुपसला, त्यांना द्रोहाशिवाय काय सुचनार, असा टोला त्यांनी लगावला. स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मतारखेबाबत अजित पवाराचे वक्तव्य हास्यास्पद आहे. मुळात स्व.गोपीनाथ मुंडे इतके छोटे नेते नव्हते.आता सामान्य माणुस हुशार झाला आहे. त्यांच्यापुढे अजित पवारासारखे गोंधळून जातात. त्यामुळे ते काय बोलतात हेच समजत नाही.हार्दिक पटेल आणा की अरविंद केजरीवाल आम्हाला फरक नाहीगुजराथमधील पाटीदार समाजाचे हार्दिक पटेल यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याबाबत विचारले असता, मुंबई महापालिकेत शिवसेनेला फटका बसणार आहे. त्यामुळे ते हादरले आहेत. हार्दिक पटेल यांना शिवसेनेत प्रवेश देऊन ते खेळी करीत आहेत. शिवसेनेने हार्दिक पटेल यांना आणावे नाही तर अरविंद केजरीवाल यांना आम्हाला विशेष फरक पडणार नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

सेनेचे मतदभेद दूर करण्यासाठी मी आहे, सर्व बरोबर करेनशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता सेना व भाजपा हे एका विचाराचे पक्ष आहेत. काळाच्या ओघात दोघांच्या वेगवेगळ्या चुली झाल्या. सेना व भाजपामधील भांडण हे कुटुंबातील आहे. सेना व भाजपात मतभेदच आहेत, मनभेद नाही. आणि झालेले मतभेद दूर करण्यासाठी मी आहे, सर्व ठीक करेन असे त्यांनी सांगितले.